शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव स्पर्धेतून बाहेर!
2
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
3
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
4
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
5
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
6
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
7
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
8
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
9
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
10
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
11
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
12
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
13
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
14
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
15
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
16
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
17
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
18
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
19
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
20
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत

४७४ गावांचा पाणीपुरवठा ठप्प

By admin | Updated: May 11, 2017 00:59 IST

भर उन्हाळ्यात आणि पाणी टंचाईच्या काळात महावितरणने जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजनेची वीज कापली.

वीज जोडणी कापली : महावितरणची ग्रामपंचायतींकडे सात कोटींची देयके थकीत लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : भर उन्हाळ्यात आणि पाणी टंचाईच्या काळात महावितरणने जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजनेची वीज कापली. सात कोटींच्या थकबाकीसाठी वीज वितरणने हे पाऊल उचलल्याने या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे पाणी पुरवठा योजनेचे तब्बल १६ कोटी ७० लाखांचे वीज बिल थकले होते. वारंवार सूचना देऊनही ग्रामपंचायतींनी देयकाचा बरणा केलाच नाही. चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना मिळालेल्या निधीतून ही थकबाकी भरणे अपेक्षित होते. चौदाव्या वित्त आयोगातून प्राधान्याने पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्याचे शासन आदेशही होते. मात्र ग्रामपंचायतींनी हा निधी दुसऱ्याच ‘अर्थपूर्ण’ योजनांवर खर्च केला. परिणामी वीज बिलाची थकबाकी कायम राहिली. ही थकबाकी सतत वाढतच आहे. थकित देयकांसाठी वीज वितरणने आधी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला होता. मात्र प्रशासनाने चक्क हात वर केले. सर्वच गटविकास अधिकाऱ्यांनीही थकित देयक भरण्यास असमर्थता दर्शविली. ग्रामपंचायती तर आधीच देयक भरण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यामुळे अखेर वीज वितरण कंपनीने टोकाचा निर्णय घेऊन थकबाकीदार पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा कापण्यास सुरूवात केली. यात जिल्ह्यातील ७०८ पाणी पुरवठा योजनांचे वीज जोडणी कापण्यात आली. या कारवाईचा धसका घेऊन काही ग्रामपंचायतींनी नंतर थकीत देयक अदा केले. त्यांची वीज जोडणी पूर्ववत करून देण्यात आली. यानतंरही अद्याप ४७४ ग्रामपंचायतींनी देयकाचा भरणाच केला नाही. परिणामी या गावांतील वीज पुरवठा बंद असल्याने पाणी पुरवठा योजनाही ठप्प पडल्या आहे. अशा ग्रामपंचायतींकडे अद्याप सात कोटी ५५ लाख रूपयांची थकबाकी कायमच आहे. तेथील नागरिक पाण्यासाठी आटापिटा करीत आहे. मात्र उन्हाळ्यात त्यांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. १२४ योजना कायम बंद जिल्ह्यातील तब्बल १२४ ग्रामपंचायतींनी पाणी पुरवठा योजनेच्या देयकापोटी अद्याप एक खडकूही महावितरणकडे जमा केला नाही. त्यांना वारंवार सूचना देऊनही अप्योग झाला नाही. अखेर वीज वितरणने या १२४ ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा कायमस्वरूपी बंद केला आहे. त्यामुळे या १२४ गावांतील ग्रामस्थांना भर उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तेथील सरपंच, सदस्य व सचिवांविरूद्ध गावकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. वीज वितरणने थकबाकीदार ग्रामपंचायतींना पाच टप्प्यात मुद्दल भरण्याची मुभा दिली. त्यानंतरही वीज देयक न भरल्यास वीज जोडणी कापण्याचे आदेश आहे. त्यानुसार कंपनीने कारवाई केली आहे. - विजय भटकर, अधीक्षक अभियंता, वीज कंपनी.