शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

जिल्ह्यातील ४७४ तलाठी झाले आॅनलाईन

By admin | Updated: November 19, 2014 22:47 IST

राष्ट्रीय भुमी अभिलेख आधुनिकीकरण आणि अभिलेखे डिजिटलायझेशन कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील तब्बल ४७४ तलाठ्यांनी आॅनलाईन कामकाज सुरू केले आहेत. तर ५४ तलाठ्याकडेच लॅपटॉप

डिजिटल अभिलेखे : ५४ तलाठी अद्यापही परंपरागत यवतमाळ : राष्ट्रीय भुमी अभिलेख आधुनिकीकरण आणि अभिलेखे डिजिटलायझेशन कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील तब्बल ४७४ तलाठ्यांनी आॅनलाईन कामकाज सुरू केले आहेत. तर ५४ तलाठ्याकडेच लॅपटॉप नसल्याने ते परंपरागत पध्दतीचाच वापर करीत आहेत. जिल्हा प्रशासनाने महसूल विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविलेल्या अहवालात ही बाब पुढे आली आहे. महसूल विभागाचे संपूर्ण कामकाजच आॅनलाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याची सुरूवात तलाठी साजापासून करण्यात आली आहे. तलाठ्याचे दफ्तर आॅनलाईन करण्यात येत आहे. यासाठी कार्यरत असलेल्या ५२८ तलाठ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिवाय त्यांना लॅपटॉप घेण्याची सूचना दिली होती. त्यानुसार ४७४ तलाठ्यांनी लॅपटॉप घेतले आहे. त्याचा वापर केला जात आहे. जिल्ह्यात २ हजार ३२ गावे असून ६२८ साजा आहेत. त्यासाठी ६४९ तलाठ्यांचे पद निर्माण केले आहे. प्रत्यक्षात मात्र ५२८ कार्यरत आहेत. यातील दोन तलाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत. ज्या तलाठ्यांनी लॅपटॉप बाळगणे सुरू केले आहेत त्यापैकी २२७ जणांकडे प्रिंटर आणि ४४० जणांकडे डाटा कार्ड आहेत. यामाध्यमातून ते तहसील कार्यालयासोबत आॅनलाईन जोडले गेले आहेत. याशिवाय प्रत्येक तलाठ्याला डिजीटल सिग्नेचरही देण्यात आली आहे. ३६८ तलाठी याचा वापर करत आहेत. आणखी २०३ तलाठ्यांची डिजीटल स्वाक्षरी प्रलंबित आहे. आतापर्यंत ५१० तलाठ्यांनी ई-चावडी करण्यासाठी प्रस्ताव दिले आहेत. लवकरच याची प्रक्रिया पुर्ण करून रखडलेल्या प्रशासकीय कामकाजाला गती देण्यात येणार आहे. आॅनलाईनच्या माध्यमातून ई- फेरफार, ई-सातबारा, पेरेपत्रक आणि तत्सम प्रमाण पत्र पुरविण्याची सुविधाही दिली जाणार आहे. त्यासाठी सर्व तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याचे डीएससी (डिजीटल स्वाक्षरी) प्राप्त करून देण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे. संपूर्ण कार्यक्रम एनआयएसकडून राबविला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)