शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
4
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
5
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
6
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
7
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
8
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
9
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
11
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
12
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
13
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
14
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
15
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
16
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
17
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
18
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
19
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
20
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?

राज्यातील ४५ तालुके पाण्यासाठी आसुसलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 12:26 IST

आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून वरुणराजाने पाठ फिरविली. विदर्भासह राज्यातील ४५ तालुक्यात पावसाचा थेंबही नाही.

ठळक मुद्देपिके करपू लागलीतीन आठवडे कोरडे

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून वरुणराजाने पाठ फिरविली. विदर्भासह राज्यातील ४५ तालुक्यात पावसाचा थेंबही नाही. पाऊस नसल्याने पीक वाचविण्यासाठी श्ोतकऱ्यांना धडपड करावी लागत आहे. त्यातही भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.राज्यभरात एक कोटी हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. विदर्भात ४० लाख हेक्टर क्षेत्रात पेरा आहे. चांगल्या पावसाच्या अंदाजाने शेतकऱ्यांनी यावर्षी कापूस आणि सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली. आॅगस्टपर्यंत हे पीक जेमतेम होते. आॅगस्टच्या अखेरच्या आठवडयात पावसाने राज्याकडे पाठ फिरविली. २० ते २५ दिवसांपासून पाऊसच नाही. ओलिताची सोय आहे तेथे वीज उपलब्ध नाही. यामुळे ओलित करायचे कसे, हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.

अपुरा पाऊस झालेल तालुकेनांदगाव, देवळी (नाशिक), जळगाव, मुक्तीनगर, अमळनेर, धरणगाव (जळगाव), उरण (रायगड), शिरपूर, शिंदखेड (धुळे), शहदा (नंदूरबार), नगर, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, नेवासे, राहूरी, संगमनेर, कोपरगाव, राहता (नगर), शिरूर, बारामती (पुणे), पंढरपूर (सोलापूर), आटपाडी (सांगली), औरंगाबाद, पैठण, वैजापूर (औरंगाबाद), जालना, अंबेड, बदनापूर, धनसावंगी (जालना), पाटोदा, अष्टी, धारूर (बिड), परभणी, पाथरी, जिंतूर, मानवत (परभणी), हिंगोली (हिंगोली), देऊळगावराजा (बुलडाणा) या तालुक्यांमध्ये पावसाचा थेंबही नाही

तीन तालुक्यात निम्मा पाऊसगत तीन वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्याच्या तीन तालुक्यात कमी पाऊस पडतो आहे. यावर्षी पुन्हा कमी पावसाची नोंद झाली आहे. या ठिकाणी ५० टक्केच्या आतमध्ये पाऊस नोंदविला गेला आहे. त्यामध्ये कळंब तालुक्यात ४८ टक्के, राळेगाव ४८ टक्के, यवतमाळ ५४ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.

यावर्षी नैऋत्य मोसमी वारे न येता पश्चिम आणि पूर्वेकडून अरबी समुद्रातून वारे आले. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस पडला. यात एकसमान दाब नव्हता. यामुळे कुठे जास्त तर कुठे कमी पाऊस झाला. याला निसर्गाचा असमतोल कारणीभूत आहे.-सुरेश चोपणे, हवामान अभ्यासक

टॅग्स :agricultureशेती