शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीत विमा कंपनीकडे ४५ लाख तक्रारी; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

By रूपेश उत्तरवार | Updated: October 21, 2022 17:16 IST

मदतीसाठी हवे १,००८ कोटी; १५ जिल्ह्यांमध्ये अधिसूचना जारी

यवतमाळ : संपूर्ण राज्यभरात निसर्गाचा प्रकोप थांबायला तयार नाही. या परिस्थितीत पीक विमा उतरविलेल्या ४५ लाख शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे तत्काळ मदतीसाठी तक्रारी दाखल केल्या आहेत. यातील ३२ लाख तक्रारींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यासाठी शेतकऱ्यांना एक हजार आठ कोटी रुपये लागणार आहेत. दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करावी, अशा राज्य शासनाच्या सूचना आहेत. प्रत्यक्षात अजूनही मदत मिळालेली नाही.

पावसाने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जुलैपासून सुरु झालेला पाऊस ऑक्टोबरपर्यंत थांबायला तयार नाही. ऑक्टोबर महिन्यात पावसाची फाईल बंद होते. मात्र, परतीच्या पावसाने ही फाईल उघडण्याची वेळ आली आहे. पिके मातीमोल होत असल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

राज्यात ९१ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. यातील ४५ लाख ७२ हजार ९५८ शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. यातील ३२ लाख ३४ हजार १०१ तक्रारींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. १३ लाख तक्रारींचे पंचनामे व्हायचे आहेत. सर्वेक्षण करताना ३२ लाख तक्रारींपैकी १३ लाख ३५ हजार ९८५ तक्रारी नुकसानभरपाईसाठी पात्र ठरलेल्या आहेत. त्यासाठी एक हजार आठ कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना द्यावे लागणार आहेत.

राज्यात पाच विमा कंपन्यांकडे पीक विम्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये स्थानिक परिस्थिती निसर्ग प्रकोप निर्माण झाला, तर ७२ तासांत तक्रारी दाखल करता येतात. पीक विमा कंपन्यांची साईट बंद असल्याने ऑफलाइन तक्रारी करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पंचनामे झाल्यानंतर तत्काळ २५ टक्के नुकसानभरपाईची रक्कम देणे बंधनकारक आहे. १९१ तालुक्यांतील मंडळांमध्ये ही अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. याठिकाणी पंचनामे अपूर्ण आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला मदतीची आवश्यकता आहे. या परिस्थितीत कंपनीने दिवाळीपूर्वी मदत द्यावी, अशा सूचना आहेत. त्यादृष्टीने राज्यस्तरावरून आढावा घेतला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा झाली नाही.

यवतमाळ जिल्ह्यातून ९० टक्के तक्रारी

यवतमाळ जिल्ह्यातील चार लाख १५ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. यातील चार लाख दोन हजार ५७२ शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यापैकी साडेतीन लाख तक्रारींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. ९० टक्के तक्रारी असल्याने याठिकाणी अधिसूचना निघाली नाही. सर्वच शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे.

सर्वेक्षण बाकी असलेले मंडळ

*जिल्हा - मंडळ*

  • नागपूर - २२२
  • चंद्रपूर - ३०
  • परभणी - ८
  • अकोला - २४
  • वर्धा - १४७
  • अमरावती - ७०
  • लातूर - ६
  • उस्मानाबाद - १५
  • गडचिरोली - १३
  • सोलापूर - ३१
  • नांदेड - २४८
टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेतीFarmerशेतकरी