शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

नैसर्गिक आपत्तीत विमा कंपनीकडे ४५ लाख तक्रारी; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

By रूपेश उत्तरवार | Updated: October 21, 2022 17:16 IST

मदतीसाठी हवे १,००८ कोटी; १५ जिल्ह्यांमध्ये अधिसूचना जारी

यवतमाळ : संपूर्ण राज्यभरात निसर्गाचा प्रकोप थांबायला तयार नाही. या परिस्थितीत पीक विमा उतरविलेल्या ४५ लाख शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे तत्काळ मदतीसाठी तक्रारी दाखल केल्या आहेत. यातील ३२ लाख तक्रारींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यासाठी शेतकऱ्यांना एक हजार आठ कोटी रुपये लागणार आहेत. दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करावी, अशा राज्य शासनाच्या सूचना आहेत. प्रत्यक्षात अजूनही मदत मिळालेली नाही.

पावसाने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जुलैपासून सुरु झालेला पाऊस ऑक्टोबरपर्यंत थांबायला तयार नाही. ऑक्टोबर महिन्यात पावसाची फाईल बंद होते. मात्र, परतीच्या पावसाने ही फाईल उघडण्याची वेळ आली आहे. पिके मातीमोल होत असल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

राज्यात ९१ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. यातील ४५ लाख ७२ हजार ९५८ शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. यातील ३२ लाख ३४ हजार १०१ तक्रारींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. १३ लाख तक्रारींचे पंचनामे व्हायचे आहेत. सर्वेक्षण करताना ३२ लाख तक्रारींपैकी १३ लाख ३५ हजार ९८५ तक्रारी नुकसानभरपाईसाठी पात्र ठरलेल्या आहेत. त्यासाठी एक हजार आठ कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना द्यावे लागणार आहेत.

राज्यात पाच विमा कंपन्यांकडे पीक विम्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये स्थानिक परिस्थिती निसर्ग प्रकोप निर्माण झाला, तर ७२ तासांत तक्रारी दाखल करता येतात. पीक विमा कंपन्यांची साईट बंद असल्याने ऑफलाइन तक्रारी करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पंचनामे झाल्यानंतर तत्काळ २५ टक्के नुकसानभरपाईची रक्कम देणे बंधनकारक आहे. १९१ तालुक्यांतील मंडळांमध्ये ही अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. याठिकाणी पंचनामे अपूर्ण आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला मदतीची आवश्यकता आहे. या परिस्थितीत कंपनीने दिवाळीपूर्वी मदत द्यावी, अशा सूचना आहेत. त्यादृष्टीने राज्यस्तरावरून आढावा घेतला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा झाली नाही.

यवतमाळ जिल्ह्यातून ९० टक्के तक्रारी

यवतमाळ जिल्ह्यातील चार लाख १५ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. यातील चार लाख दोन हजार ५७२ शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यापैकी साडेतीन लाख तक्रारींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. ९० टक्के तक्रारी असल्याने याठिकाणी अधिसूचना निघाली नाही. सर्वच शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे.

सर्वेक्षण बाकी असलेले मंडळ

*जिल्हा - मंडळ*

  • नागपूर - २२२
  • चंद्रपूर - ३०
  • परभणी - ८
  • अकोला - २४
  • वर्धा - १४७
  • अमरावती - ७०
  • लातूर - ६
  • उस्मानाबाद - १५
  • गडचिरोली - १३
  • सोलापूर - ३१
  • नांदेड - २४८
टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेतीFarmerशेतकरी