शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

नैसर्गिक आपत्तीत विमा कंपनीकडे ४५ लाख तक्रारी; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

By रूपेश उत्तरवार | Updated: October 21, 2022 17:16 IST

मदतीसाठी हवे १,००८ कोटी; १५ जिल्ह्यांमध्ये अधिसूचना जारी

यवतमाळ : संपूर्ण राज्यभरात निसर्गाचा प्रकोप थांबायला तयार नाही. या परिस्थितीत पीक विमा उतरविलेल्या ४५ लाख शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे तत्काळ मदतीसाठी तक्रारी दाखल केल्या आहेत. यातील ३२ लाख तक्रारींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यासाठी शेतकऱ्यांना एक हजार आठ कोटी रुपये लागणार आहेत. दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करावी, अशा राज्य शासनाच्या सूचना आहेत. प्रत्यक्षात अजूनही मदत मिळालेली नाही.

पावसाने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जुलैपासून सुरु झालेला पाऊस ऑक्टोबरपर्यंत थांबायला तयार नाही. ऑक्टोबर महिन्यात पावसाची फाईल बंद होते. मात्र, परतीच्या पावसाने ही फाईल उघडण्याची वेळ आली आहे. पिके मातीमोल होत असल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

राज्यात ९१ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. यातील ४५ लाख ७२ हजार ९५८ शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. यातील ३२ लाख ३४ हजार १०१ तक्रारींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. १३ लाख तक्रारींचे पंचनामे व्हायचे आहेत. सर्वेक्षण करताना ३२ लाख तक्रारींपैकी १३ लाख ३५ हजार ९८५ तक्रारी नुकसानभरपाईसाठी पात्र ठरलेल्या आहेत. त्यासाठी एक हजार आठ कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना द्यावे लागणार आहेत.

राज्यात पाच विमा कंपन्यांकडे पीक विम्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये स्थानिक परिस्थिती निसर्ग प्रकोप निर्माण झाला, तर ७२ तासांत तक्रारी दाखल करता येतात. पीक विमा कंपन्यांची साईट बंद असल्याने ऑफलाइन तक्रारी करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पंचनामे झाल्यानंतर तत्काळ २५ टक्के नुकसानभरपाईची रक्कम देणे बंधनकारक आहे. १९१ तालुक्यांतील मंडळांमध्ये ही अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. याठिकाणी पंचनामे अपूर्ण आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला मदतीची आवश्यकता आहे. या परिस्थितीत कंपनीने दिवाळीपूर्वी मदत द्यावी, अशा सूचना आहेत. त्यादृष्टीने राज्यस्तरावरून आढावा घेतला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा झाली नाही.

यवतमाळ जिल्ह्यातून ९० टक्के तक्रारी

यवतमाळ जिल्ह्यातील चार लाख १५ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. यातील चार लाख दोन हजार ५७२ शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यापैकी साडेतीन लाख तक्रारींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. ९० टक्के तक्रारी असल्याने याठिकाणी अधिसूचना निघाली नाही. सर्वच शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे.

सर्वेक्षण बाकी असलेले मंडळ

*जिल्हा - मंडळ*

  • नागपूर - २२२
  • चंद्रपूर - ३०
  • परभणी - ८
  • अकोला - २४
  • वर्धा - १४७
  • अमरावती - ७०
  • लातूर - ६
  • उस्मानाबाद - १५
  • गडचिरोली - १३
  • सोलापूर - ३१
  • नांदेड - २४८
टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेतीFarmerशेतकरी