शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

आणेवारी ४४ टक्के

By admin | Updated: November 15, 2014 02:07 IST

जिल्ह्याची पीक आणेवारी अखेर ४४ टक्के निघाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल करणार आहेत.

यवतमाळ : जिल्ह्याची पीक आणेवारी अखेर ४४ टक्के निघाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल करणार आहेत. आणेवारी ४४ टक्के निघाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे. यवतमाळ जिल्ह्याची पीक परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यानंतरही पिकांची नजरआणेवारी तलाठ्यांनी ५४ टक्के काढली होती. या नजर आणेवारीवर आणि ती काढण्याच्या पद्धतीवर तीव्र टीका झाली. शेतकरी बुडला असताना आणेवारी ५४ टक्के कशी असा प्रश्न उपस्थित केला गेला होता. त्यानंतर प्रशासनाने सावधगिरीने पीक आणेवारी काढली. त्याला वास्तवतेचा टच दिला. शेतीच्या बांधावर जाऊन ‘लोकमत’ प्रतिनिधींनी वृत्तांकन केले. शेती आणि शेतकऱ्यांची वास्तव स्थिती उघड केली. त्याची दखल घेऊन अमरावतीचे विभागीय महसूल आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी थेट यवतमाळ जिल्ह्यातील शेतीच्या बांधावर पोहोचून पीक परिस्थितीची पाहणी करीत शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली होती. त्यांनी वटफळी, कोलुरा, उत्तरवाढोणा, सोनखास, लासीना या गावांना भेटी दिल्या होत्या. त्यांनाही शेतकऱ्यांनी या तोट्याच्या शेतीचा हिशेब समजावून सांगितला. त्यानंतर वास्तव आणेवारीची चक्रे फिरली. सुरुवातीला नजर आणेवारी ५४ टक्के होती आता ही आणेवारी ४४ टक्के निघाली आहे.त्यात सर्वात कमी ३६ टक्के आणेवारी ही नेर तालुक्याची तर सर्वात जास्त ४८ टक्के आणेवारी वणी तालुक्याची आहे. जिल्ह्यातील दोन हजार १४८ गावांपैकी दोन हजार ५० महसुली गावांची ही सरासरी ४४ टक्के आणेवारी काढली गेली आहे. यानंतर १५ जानेवारीला अंतिम पीक आणेवारी काढली जाणार आहे. त्यावेळीही आणेवारीची स्थिती हीच राहिल्यास शेतकऱ्यांना दुष्काळ सदृश स्थितीतील सोईसुविधांचा लाभ मिळणार आहे. त्यात शेतसारा माफी, करमाफी, कृषीपंपाच्या वीज बिलात ३३ टक्के सवलत, पीक कर्जाचे रुपांतरण या सुविधा शासनाकडून दिल्या जातील. बँकेला सक्तीची कर्ज वसुली करता येणार नाही. यावेळी ४४ टक्के निघालेली आणेवारी ही वास्तव आहे. प्रत्यक्षात शेतीची अवस्था या पेक्षाही वाईट आहे. शेतकऱ्यांना एकरी दोन क्ंिवटलही सोयाबीन झालेले नाही. कपाशीची अवस्थाही अशीच आहे. (शहर वार्ताहर)