शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

आणेवारी ४४ टक्के

By admin | Updated: November 15, 2014 02:07 IST

जिल्ह्याची पीक आणेवारी अखेर ४४ टक्के निघाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल करणार आहेत.

यवतमाळ : जिल्ह्याची पीक आणेवारी अखेर ४४ टक्के निघाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल करणार आहेत. आणेवारी ४४ टक्के निघाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे. यवतमाळ जिल्ह्याची पीक परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यानंतरही पिकांची नजरआणेवारी तलाठ्यांनी ५४ टक्के काढली होती. या नजर आणेवारीवर आणि ती काढण्याच्या पद्धतीवर तीव्र टीका झाली. शेतकरी बुडला असताना आणेवारी ५४ टक्के कशी असा प्रश्न उपस्थित केला गेला होता. त्यानंतर प्रशासनाने सावधगिरीने पीक आणेवारी काढली. त्याला वास्तवतेचा टच दिला. शेतीच्या बांधावर जाऊन ‘लोकमत’ प्रतिनिधींनी वृत्तांकन केले. शेती आणि शेतकऱ्यांची वास्तव स्थिती उघड केली. त्याची दखल घेऊन अमरावतीचे विभागीय महसूल आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी थेट यवतमाळ जिल्ह्यातील शेतीच्या बांधावर पोहोचून पीक परिस्थितीची पाहणी करीत शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली होती. त्यांनी वटफळी, कोलुरा, उत्तरवाढोणा, सोनखास, लासीना या गावांना भेटी दिल्या होत्या. त्यांनाही शेतकऱ्यांनी या तोट्याच्या शेतीचा हिशेब समजावून सांगितला. त्यानंतर वास्तव आणेवारीची चक्रे फिरली. सुरुवातीला नजर आणेवारी ५४ टक्के होती आता ही आणेवारी ४४ टक्के निघाली आहे.त्यात सर्वात कमी ३६ टक्के आणेवारी ही नेर तालुक्याची तर सर्वात जास्त ४८ टक्के आणेवारी वणी तालुक्याची आहे. जिल्ह्यातील दोन हजार १४८ गावांपैकी दोन हजार ५० महसुली गावांची ही सरासरी ४४ टक्के आणेवारी काढली गेली आहे. यानंतर १५ जानेवारीला अंतिम पीक आणेवारी काढली जाणार आहे. त्यावेळीही आणेवारीची स्थिती हीच राहिल्यास शेतकऱ्यांना दुष्काळ सदृश स्थितीतील सोईसुविधांचा लाभ मिळणार आहे. त्यात शेतसारा माफी, करमाफी, कृषीपंपाच्या वीज बिलात ३३ टक्के सवलत, पीक कर्जाचे रुपांतरण या सुविधा शासनाकडून दिल्या जातील. बँकेला सक्तीची कर्ज वसुली करता येणार नाही. यावेळी ४४ टक्के निघालेली आणेवारी ही वास्तव आहे. प्रत्यक्षात शेतीची अवस्था या पेक्षाही वाईट आहे. शेतकऱ्यांना एकरी दोन क्ंिवटलही सोयाबीन झालेले नाही. कपाशीची अवस्थाही अशीच आहे. (शहर वार्ताहर)