शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
3
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
4
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
5
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
6
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
7
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
8
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
9
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

नेर तालुक्यात ४३२ मिमी पाऊस

By admin | Updated: July 14, 2016 02:32 IST

मागील पाच दिवसांपासूनच्या पावसाची तालुक्यात ४३२ मिमी एवढी नोंद करण्यात आली आहे.

जनजीवन प्रभावित : पाच वर्षातील सर्वात मोठी झड, मांगलादेवी येथे भिंत कोसळली नेर : मागील पाच दिवसांपासूनच्या पावसाची तालुक्यात ४३२ मिमी एवढी नोंद करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन प्रभावित झाले होते. पाच वर्षातील सर्वात मोठी झड असल्याचे सांगितले जाते. पावसाळ््यातील सुरूवातीचे नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजा चिंताग्रस्त होता. पेरणीचा कालावधी संपत असतानाही पावसाला सुरूवात झाली नव्हती. दरम्यान काही भागात झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. पुढे १० ते १५ दिवस पाऊस नसल्याने काही लोकांची पेरणी उलटली. उशिरा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या मात्र पेरण्या साधल्या गेल्या. मागील पाच दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे पिकं बहरली आहे. काही शेतांमध्ये तण वाढले असले तरी काढणीसाठी उपाययोजना केल्या जात आहे. तीन दिवस शेतात कुठलीही कामे झाली नसल्याने मजूर मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. पावसामुळे तालुक्यातील मांगलादेवी येथे भिंत कोसळून एक वृद्धा दगावली. काही शेतांमध्ये पाणी शिरल्याने थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले. उमर्ठा येथे पूल वाहून गेला. अनेक रस्त्याच्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले. सततच्या पावसामुळे संपूर्ण बाजारपेठ थंडावली होती. रेलचेल थांबली होती. मंगळवारी पावसाचा जोर कमी झाल्याने जनजीवन सुरळीत झाले. सन २०१३ नंतर पावसाची ही सर्वात मोठी झड असल्याचे सांगितले जाते. तालुक्यात २०१२ मध्ये १४४ मिमी, २०१३ मध्ये २९८ मध्ये मिमी, २०१४ मध्ये १०६ मिमी तर २०१५ मध्ये १८० मिमी पावसाची नोंद जून महिन्यात झाली होती. यावर्षी जुलैच्या सुरूवातील एकूण ४३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने पाणी समस्या सुटली आहे. (तालुका प्रतिनिधी)