शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

४३ बॅग सोयाबीन उगवलेच नाही

By admin | Updated: August 7, 2014 00:03 IST

एक दोन नव्हे तर तब्बल ४३ बॅग सोयाबीन बियाणे पेरणीनंतर उगवलेच नाही. ही घटना तालुक्यातील सावंगी ठाणेगाव येथे घडली. अखेर संबंधित शेतकऱ्याने या प्रकरणी जिल्हा कृषी अधीक्षकांकडे तक्रार केली.

घाटंजी : एक दोन नव्हे तर तब्बल ४३ बॅग सोयाबीन बियाणे पेरणीनंतर उगवलेच नाही. ही घटना तालुक्यातील सावंगी ठाणेगाव येथे घडली. अखेर संबंधित शेतकऱ्याने या प्रकरणी जिल्हा कृषी अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यावरून कृषी अधीक्षकांनी या शेताला भेट देऊन पाहणी केली. अजय राजाराम येल्टीवार असे बियाण्यांची उगवण न झाल्याने व्यथीत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची तालुक्यातील सावंगी ठाणेगाव येथे शेती आहे. पावसाच्या लहरीपणाने यंदा दुबार तिबार पेरणी करावी लागली. त्यातच पुन्हा महागडे बियाणे खरेदी करून शेतकरी येल्टीवार यांनी शेतात पेरणी केली. त्यानंतर पाऊसही चांगला आला. मात्र ४३ पैकी एकही बॅग सोयाबीन बियाणे उगवले नाही. या संदर्भात त्यांनी सुरुवातीला सारस कंपनीच्या विक्रेत्याकडे पाठपुरावा केला. मात्र त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. अखेर त्यांनी या प्रकरणी येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. त्यांनीही या तक्रारीवर कुठलीही कारवाई केली नाही. त्यानंतर सदर शेतकऱ्याला घाटंजी येथे गतीमान कडधान्य विकास कार्यक्रमांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा होणार असल्याची माहिती मिळाली. तसेच या कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, जिल्हा कृषी अधीक्षक काशिनाथ गायकवाड उपस्थित राहणार असल्याचे कळले. त्यावरून सदर शेतकऱ्याने प्रशिक्षण कार्यशाळेत हजेरी लावली. तसेच याबाबत सामाजिक न्यायमंत्री मोघे आणि कृषी अधीक्षक गायकवाड यांना तक्रार देऊन पाहणी करण्याची विनंती केली. त्यावरून कृषी अधीक्षक गायकवाड यांनी शेतकऱ्यांसमवेत तेथे जावून पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत तालुका कृषी अधिकारी राजेंद्र माळोदे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय पवार, डॉ.पार्लावार, डॉ.प्रशांत नाईक उपस्थित होते. सदर शेतकऱ्याला न्याय मिळतो की नाही, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)