शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

४३ बॅग सोयाबीन उगवलेच नाही

By admin | Updated: August 7, 2014 00:03 IST

एक दोन नव्हे तर तब्बल ४३ बॅग सोयाबीन बियाणे पेरणीनंतर उगवलेच नाही. ही घटना तालुक्यातील सावंगी ठाणेगाव येथे घडली. अखेर संबंधित शेतकऱ्याने या प्रकरणी जिल्हा कृषी अधीक्षकांकडे तक्रार केली.

घाटंजी : एक दोन नव्हे तर तब्बल ४३ बॅग सोयाबीन बियाणे पेरणीनंतर उगवलेच नाही. ही घटना तालुक्यातील सावंगी ठाणेगाव येथे घडली. अखेर संबंधित शेतकऱ्याने या प्रकरणी जिल्हा कृषी अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यावरून कृषी अधीक्षकांनी या शेताला भेट देऊन पाहणी केली. अजय राजाराम येल्टीवार असे बियाण्यांची उगवण न झाल्याने व्यथीत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची तालुक्यातील सावंगी ठाणेगाव येथे शेती आहे. पावसाच्या लहरीपणाने यंदा दुबार तिबार पेरणी करावी लागली. त्यातच पुन्हा महागडे बियाणे खरेदी करून शेतकरी येल्टीवार यांनी शेतात पेरणी केली. त्यानंतर पाऊसही चांगला आला. मात्र ४३ पैकी एकही बॅग सोयाबीन बियाणे उगवले नाही. या संदर्भात त्यांनी सुरुवातीला सारस कंपनीच्या विक्रेत्याकडे पाठपुरावा केला. मात्र त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. अखेर त्यांनी या प्रकरणी येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. त्यांनीही या तक्रारीवर कुठलीही कारवाई केली नाही. त्यानंतर सदर शेतकऱ्याला घाटंजी येथे गतीमान कडधान्य विकास कार्यक्रमांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा होणार असल्याची माहिती मिळाली. तसेच या कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, जिल्हा कृषी अधीक्षक काशिनाथ गायकवाड उपस्थित राहणार असल्याचे कळले. त्यावरून सदर शेतकऱ्याने प्रशिक्षण कार्यशाळेत हजेरी लावली. तसेच याबाबत सामाजिक न्यायमंत्री मोघे आणि कृषी अधीक्षक गायकवाड यांना तक्रार देऊन पाहणी करण्याची विनंती केली. त्यावरून कृषी अधीक्षक गायकवाड यांनी शेतकऱ्यांसमवेत तेथे जावून पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत तालुका कृषी अधिकारी राजेंद्र माळोदे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय पवार, डॉ.पार्लावार, डॉ.प्रशांत नाईक उपस्थित होते. सदर शेतकऱ्याला न्याय मिळतो की नाही, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)