शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

आर्णीतील ४२ कोटींच्या नळ योजनेचा मार्ग मोकळा

By admin | Updated: December 3, 2015 02:43 IST

विविध कारणांमुळे अडचणीत आलेल्या येथील ४२ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेवर अखेर सोमवारी एकमत झाले.

अखेर एकमत : नगरपरिषदेची सभा आर्णी : विविध कारणांमुळे अडचणीत आलेल्या येथील ४२ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेवर अखेर सोमवारी एकमत झाले. योजनेचे काम सुरू व्हावे यासाठीचा ठराव सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. आता या योजनेच्या कामाला गती मिळणार आहे. गेली दोन वर्षांपासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने या योजनेच्या कामामध्ये अडथळा येत होता. नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेता पालिकेतील पदाधिकारी आणि सदस्यांनी या योजनेसाठी हो भरला. नगरसेवक अनिल आडे, छोटू देशमुख, प्रवीण मुनगीनवार, नारायण चलपेलवार, रेखा ढाले आदींनी सदर योजना त्वरित सुरू व्हावी यासाठीचा ठराव घ्यायला लावला. नगराध्यक्ष आरीज बेग यांच्यासह उपस्थित सर्व नगरसेवकांनी या ठरावाला संमती दर्शविली. यानंतर मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांनी रितसर निविदा प्रक्रिया पार पाडली. याशिवाय सभेमध्ये विविध विषय चर्चिले गेले. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत ३० लाख ८१ रुपये प्राप्त झाले आहे. ५८४ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रति शौचालय १२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. कृषी विभागामार्फत शेतकरी हिताच्या योजना राबविल्या जाव्या, अशी मागणी प्रवीण मुनगीनवार यांनी केली. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जावा असे नारायण चलपेलवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी श्रावण मडावी, शाहीन पठाण, गणेश हिरोळे, अनिताताई भगत, ज्योतीताई थोरकर, मंगला ठाकरे, अंजली खंदार, कौशल्याबाई इंगळे, रेखा ढाले, जावेद सोलंकी, शेखर लोळगे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, नगराध्यक्ष आरीज बेग यांनी या पाणी पुरवठा योजनेला गती देण्याचे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)