शहरं
Join us  
Trending Stories
1
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
2
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
3
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
4
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
5
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
6
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
7
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
8
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
9
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
10
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
11
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
12
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
13
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
14
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
15
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
16
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
17
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
18
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
19
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
20
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता

आर्णीतील ४२ कोटींच्या नळ योजनेचा मार्ग मोकळा

By admin | Updated: December 3, 2015 02:43 IST

विविध कारणांमुळे अडचणीत आलेल्या येथील ४२ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेवर अखेर सोमवारी एकमत झाले.

अखेर एकमत : नगरपरिषदेची सभा आर्णी : विविध कारणांमुळे अडचणीत आलेल्या येथील ४२ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेवर अखेर सोमवारी एकमत झाले. योजनेचे काम सुरू व्हावे यासाठीचा ठराव सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. आता या योजनेच्या कामाला गती मिळणार आहे. गेली दोन वर्षांपासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने या योजनेच्या कामामध्ये अडथळा येत होता. नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेता पालिकेतील पदाधिकारी आणि सदस्यांनी या योजनेसाठी हो भरला. नगरसेवक अनिल आडे, छोटू देशमुख, प्रवीण मुनगीनवार, नारायण चलपेलवार, रेखा ढाले आदींनी सदर योजना त्वरित सुरू व्हावी यासाठीचा ठराव घ्यायला लावला. नगराध्यक्ष आरीज बेग यांच्यासह उपस्थित सर्व नगरसेवकांनी या ठरावाला संमती दर्शविली. यानंतर मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांनी रितसर निविदा प्रक्रिया पार पाडली. याशिवाय सभेमध्ये विविध विषय चर्चिले गेले. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत ३० लाख ८१ रुपये प्राप्त झाले आहे. ५८४ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रति शौचालय १२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. कृषी विभागामार्फत शेतकरी हिताच्या योजना राबविल्या जाव्या, अशी मागणी प्रवीण मुनगीनवार यांनी केली. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जावा असे नारायण चलपेलवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी श्रावण मडावी, शाहीन पठाण, गणेश हिरोळे, अनिताताई भगत, ज्योतीताई थोरकर, मंगला ठाकरे, अंजली खंदार, कौशल्याबाई इंगळे, रेखा ढाले, जावेद सोलंकी, शेखर लोळगे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, नगराध्यक्ष आरीज बेग यांनी या पाणी पुरवठा योजनेला गती देण्याचे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)