शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

४२ कोटींची खरेदी

By admin | Updated: October 22, 2014 23:23 IST

दुष्काळ, नापिकी, सोयाबीनचा दगा आदी सर्व विवंचना बाजूला ठेवत वर्षातील सर्वात मोठ्या सणाला प्रत्येकाने बंपर खरेदी केली. कर्मचारी मनसोक्त तर शेतकरी हात राखून खरेदी करीत असल्याचे

दीपोत्सव : कार, सोने-चांदी आणि कपड्यांवर भर यवतमाळ : दुष्काळ, नापिकी, सोयाबीनचा दगा आदी सर्व विवंचना बाजूला ठेवत वर्षातील सर्वात मोठ्या सणाला प्रत्येकाने बंपर खरेदी केली. कर्मचारी मनसोक्त तर शेतकरी हात राखून खरेदी करीत असल्याचे बाजारात दिसत होते. दिवाळीच्या पर्वात जिल्हाभरात थोडीथोडकी नव्हे तब्बल ४२ कोटी रुपयांची उलाढाल झाली. वाहन, सोने-चांदी, कापड आणि किराणा आदी खरेदीवर प्रत्येकाचा भर होता. दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. साडेतीन मुहूर्तातील एक शुभ मुहूर्त. या प्रकाशपर्वात सर्व दु:ख विसरुन प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे खरेदी करतो. कर्मचारी असो की शेतकरी, गरीब असो की श्रीमंत सर्वच जण दिवाळीच्या बाजारात खरेदीसाठी गर्दी करतात. गेल्या आठ दिवसांपासून यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील सर्व मोठ्या बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली आहे. आठ दिवसापूर्वी कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी बाजारात दिसत होती. गेल्या दोन दिवसांपासून ग्रामीण भागातील मजूर आणि शेतकरीही खरेदी करताना दिसत आहे. बुधवारी नरक चतुदर्शीच्या दिवशी तर संपूर्ण दुकाने हाऊसफुल्ल झाली होती. कोणत्याही दुकानात पाय ठेवायला जागा नव्हती. रस्ते गर्दीने ओसंडून वाहत होते. प्रत्येकाच्या हातात खरेदी केलेल्या साहित्याच्या मोठ्ठाल्या पिशव्या दिसत होत्या. धनत्रयोदशी, नरक चतुदर्शी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असा दिवाळी हा पाच दिवसाचा सण आहे. या शुभपर्वावर खरेदी करणाऱ्यांची धूम असते. वाहन खरेदीसाठी शुभमुहूर्ताची अनेकांना प्रतीक्षा असते. दिवाळीच्या या पर्वात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या शो-रूममध्ये मोठी गर्दी दिसत होती. कंपन्यांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना लागू केल्या आहे. अनेकांनी तर दिवाळीच्या पूर्वी वाहनांची बुकींग करून ठेवली आहे. यात सर्वाधिक वाहने दुचाकी आहे. मोटरसायकल, मोपेड आदींचा समावेश आहे. जिल्ह्यातील ३० शो-रूममध्ये १४०० दुचाकी वाहनांची बुकींग करण्यात आल्याची माहिती आहे. या वाहनांची किंमत सुमारे सात कोटींच्या घरात आहे. दुचाकी पाठोपाठ चारचाकी वाहनांचीही मोठी खरेदी केली. आलिशान आणि महागडी वाहने खरेदी करण्याकडे शहरी ग्राहकांचा कल वाढला आहे. अशा ५५ वाहनांचे बुकींग आधीच करण्यात आले होते. अनेकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी वाहन आपल्या घरी नेले. या वाहनांची किंमत दोन कोटी २५ लाख रुपयांच्या घरात आहे. या सोबतच कापड, किराणा, सोने, फटाके आणि इतर साहित्याची मनसोक्त खरेदी करण्यात ग्राहक व्यस्त होते. या गर्दीत मात्र शेतकरी आपल्या खिशाचा सल्ला घेत खरेदी करताना दिसत होता. आवश्यक तेवढी खरेदी करून तो समाधान मानत होता. (शहर वार्ताहर)