शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

जिल्हा परिषदेत पहिल्या टप्प्यात ४१ बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:06 IST

जिल्हा परिषदेने पहिल्या टप्प्यात ४१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आता बदलीचा दुसरा टप्पा १४ आणि १५ मे रोजी राबविला जाणार आहे.

ठळक मुद्देसमुपदेशन : १४ व १५ मे रोजी जत्रा भरणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेने पहिल्या टप्प्यात ४१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आता बदलीचा दुसरा टप्पा १४ आणि १५ मे रोजी राबविला जाणार आहे.जिल्हा परिषदेच्या तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे वेळापत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी आखून दिले. त्यानुसार पहिल्या टप्पयात ९ मे रोजी पाणीपुरवठा, सिंचन, बांधकाम, कृषी, पशुसंवर्धन, वित्त आणि महिला व बालकल्याण विभागातील तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने प्रशासकीय व विनंती बदल्या करण्यात आल्या. यात बांधकाम आणि पशुसंवर्धन विभागातील प्रत्येकी १२ कर्मचाऱ्यांची बदली झाली. याशिवाय महिला व बालकल्याण विभागातील पाच, कृषीमधील तीन आणि पाणीपुरवठा विभागातील एका कर्मचाऱ्याची बदली करण्यात आली. सिंचन विभागातील मात्र एकाही कर्मचाऱ्याची पहिल्या टप्प्यात बदली झाली नाही.आता दुसऱ्या टप्प्यात १४ मे रोजी सामान्य प्रशासन व पंचायत विभागातील, तर १५ मे रोजी प्राथमिक शिक्षण विभाग व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहे. यात सर्वाधिक उत्सुकता आहे ती शिक्षकांच्या बदल्यांची. कारण गेल्या तीन वर्षांपासून काही ना काही कारणाने या बदल्या रखडल्या होत्या. यावर्षीही काही संघटनांनी राज्य स्तरावर मोर्चा काढून बदलीला विरोध दर्शविला होता. मात्र शासन आणि प्रशासन बदली धोरणावर ठाम आहे. त्यामुळे १५ मे रोजी होणाऱ्या शिक्षक बदल्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.किमान ४००० हजार शिक्षकांच्या बदल्याजिल्ह्यात सात हजार ७६६ प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी पाच हजार ३३३ शिक्षक बदलीपात्र ठरले आहेत. या सर्वांच्या १५ मे रोजी समुपदेशनाने बदल्या केल्या जाणार आहे. यात किमान चार हजार ते चार हजार २०० शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यात मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, विषय शिक्षक आणि सहायक शिक्षकांचा समावेश असणार आहे. याशिवाय ऊर्दू माध्यमाचे १६९ शिक्षक बदलीपात्र आहेत. त्यांच्याही बदल्या होणार आहेत.

टॅग्स :Transferबदली