शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

जिल्हा परिषदेत पहिल्या टप्प्यात ४१ बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:06 IST

जिल्हा परिषदेने पहिल्या टप्प्यात ४१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आता बदलीचा दुसरा टप्पा १४ आणि १५ मे रोजी राबविला जाणार आहे.

ठळक मुद्देसमुपदेशन : १४ व १५ मे रोजी जत्रा भरणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेने पहिल्या टप्प्यात ४१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आता बदलीचा दुसरा टप्पा १४ आणि १५ मे रोजी राबविला जाणार आहे.जिल्हा परिषदेच्या तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे वेळापत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी आखून दिले. त्यानुसार पहिल्या टप्पयात ९ मे रोजी पाणीपुरवठा, सिंचन, बांधकाम, कृषी, पशुसंवर्धन, वित्त आणि महिला व बालकल्याण विभागातील तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने प्रशासकीय व विनंती बदल्या करण्यात आल्या. यात बांधकाम आणि पशुसंवर्धन विभागातील प्रत्येकी १२ कर्मचाऱ्यांची बदली झाली. याशिवाय महिला व बालकल्याण विभागातील पाच, कृषीमधील तीन आणि पाणीपुरवठा विभागातील एका कर्मचाऱ्याची बदली करण्यात आली. सिंचन विभागातील मात्र एकाही कर्मचाऱ्याची पहिल्या टप्प्यात बदली झाली नाही.आता दुसऱ्या टप्प्यात १४ मे रोजी सामान्य प्रशासन व पंचायत विभागातील, तर १५ मे रोजी प्राथमिक शिक्षण विभाग व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहे. यात सर्वाधिक उत्सुकता आहे ती शिक्षकांच्या बदल्यांची. कारण गेल्या तीन वर्षांपासून काही ना काही कारणाने या बदल्या रखडल्या होत्या. यावर्षीही काही संघटनांनी राज्य स्तरावर मोर्चा काढून बदलीला विरोध दर्शविला होता. मात्र शासन आणि प्रशासन बदली धोरणावर ठाम आहे. त्यामुळे १५ मे रोजी होणाऱ्या शिक्षक बदल्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.किमान ४००० हजार शिक्षकांच्या बदल्याजिल्ह्यात सात हजार ७६६ प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी पाच हजार ३३३ शिक्षक बदलीपात्र ठरले आहेत. या सर्वांच्या १५ मे रोजी समुपदेशनाने बदल्या केल्या जाणार आहे. यात किमान चार हजार ते चार हजार २०० शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यात मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, विषय शिक्षक आणि सहायक शिक्षकांचा समावेश असणार आहे. याशिवाय ऊर्दू माध्यमाचे १६९ शिक्षक बदलीपात्र आहेत. त्यांच्याही बदल्या होणार आहेत.

टॅग्स :Transferबदली