शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

चार दिवसांत ४०० कोटी जमा

By admin | Updated: November 14, 2016 01:38 IST

गत चार दिवसांपासून चिल्लर पैशासाठी सर्वसामान्य नागरिक रांगेत उभे आहेत. मात्र त्यांना चिल्लरच मिळत नाही.

यवतमाळ : गत चार दिवसांपासून चिल्लर पैशासाठी सर्वसामान्य नागरिक रांगेत उभे आहेत. मात्र त्यांना चिल्लरच मिळत नाही. एटीएममध्ये पैसे टाकण्यासाठी चिल्लर नोटा नाही. यामुळे पहाटे सहापासूनच बँकेत रांगा लागल्याचे चित्र यवतमाळात होते. याचा परिणाम रविवारच्या बाजारहाटावरही झाला. पैसेच नसल्याने बाजारात शुकशुकाट होता. चार दिवसात बँकामध्ये ४०० कोटी जमा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पाचशे आणि एक हजार रूपयांच्या जुन्या नोटा जमा करण्यासाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली आहे. नोटा जमा होत आहे. मात्र चिल्लरच मिळत नसल्याने गोंधळ उडाला आहे. जिल्ह्यातील २५७ बँक शाखांमध्ये ४०० कोटी रूपये जमा झाल्याचा प्राथमिक अंदाज विविध शाखांच्या व्यवस्थापनाकडून मिळाला आहे. याचे स्पष्ट चित्र ३० डिसेंबरनंतर पुढे येणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या १४३ शाखा आहेत. सहकारी बँकांच्या ८९ शाखा आहेत. तर २५ शाखा ग्रामीण बँकेच्या आहेत. या २५७ शाखांपुढे सर्वसामान्य नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गत चार दिवसांपासून रांगा कायम आहेत. रविवारी सुटी असल्याने सर्वाधिक गर्दी बँकांच्या शाखांपुढे पाहायला मिळाली. महिला सहाकारी बँकेत ठोक नोटा जमा केल्या, मात्र चिल्लर चलन वितरित केले नाही. यामुळे ग्राहक संतप्त होते. याची नोंद अग्रणी बँक व्यवस्थापनाने घेतली आहे. रविवारी काही एटीएम सुरू झाले. मात्र बहुतांश एटीएम बंद होते. हे एटीएम सुरळीत होण्यासाठी दोन ते तीन आठवडे लागणार आहेत. (शहर वार्ताहर)