शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

चार दिवसांत ४०० कोटी जमा

By admin | Updated: November 14, 2016 01:38 IST

गत चार दिवसांपासून चिल्लर पैशासाठी सर्वसामान्य नागरिक रांगेत उभे आहेत. मात्र त्यांना चिल्लरच मिळत नाही.

यवतमाळ : गत चार दिवसांपासून चिल्लर पैशासाठी सर्वसामान्य नागरिक रांगेत उभे आहेत. मात्र त्यांना चिल्लरच मिळत नाही. एटीएममध्ये पैसे टाकण्यासाठी चिल्लर नोटा नाही. यामुळे पहाटे सहापासूनच बँकेत रांगा लागल्याचे चित्र यवतमाळात होते. याचा परिणाम रविवारच्या बाजारहाटावरही झाला. पैसेच नसल्याने बाजारात शुकशुकाट होता. चार दिवसात बँकामध्ये ४०० कोटी जमा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पाचशे आणि एक हजार रूपयांच्या जुन्या नोटा जमा करण्यासाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली आहे. नोटा जमा होत आहे. मात्र चिल्लरच मिळत नसल्याने गोंधळ उडाला आहे. जिल्ह्यातील २५७ बँक शाखांमध्ये ४०० कोटी रूपये जमा झाल्याचा प्राथमिक अंदाज विविध शाखांच्या व्यवस्थापनाकडून मिळाला आहे. याचे स्पष्ट चित्र ३० डिसेंबरनंतर पुढे येणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या १४३ शाखा आहेत. सहकारी बँकांच्या ८९ शाखा आहेत. तर २५ शाखा ग्रामीण बँकेच्या आहेत. या २५७ शाखांपुढे सर्वसामान्य नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गत चार दिवसांपासून रांगा कायम आहेत. रविवारी सुटी असल्याने सर्वाधिक गर्दी बँकांच्या शाखांपुढे पाहायला मिळाली. महिला सहाकारी बँकेत ठोक नोटा जमा केल्या, मात्र चिल्लर चलन वितरित केले नाही. यामुळे ग्राहक संतप्त होते. याची नोंद अग्रणी बँक व्यवस्थापनाने घेतली आहे. रविवारी काही एटीएम सुरू झाले. मात्र बहुतांश एटीएम बंद होते. हे एटीएम सुरळीत होण्यासाठी दोन ते तीन आठवडे लागणार आहेत. (शहर वार्ताहर)