शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

४० हजार मेट्रिक टन खतसाठा

By admin | Updated: May 21, 2017 00:29 IST

जिल्ह्यात गेल्यावर्षीचेच तब्बल ४० हजार मेट्रिक टन खत शिल्लक आहे.

गरज केवळ पावणे दोन लाखाची : जिल्ह्यातून खत टंचाई होणार हद्दपार लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यात गेल्यावर्षीचेच तब्बल ४० हजार मेट्रिक टन खत शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी खत टंचाईची शक्यता दुरावली आहे. जिल्ह्याला खरीप हंगामासाठी एक लाख ७३ हजार ६०० मेट्रिक टन खताची गरज आहे. त्यात ४० हजार मेट्रिक टन खत शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी खत टंचाई हद्दपार होणार आहे. खरिपासाठी जिल्ह्याला ७२ हजार ३०० मेट्रिक टन युरिया, १३ हजार २०० मेट्रिक टन एमओपी, २८ हजार मेट्रिक टन एसएसपी, १३ हजार ६०० मेट्रिक टन डीएपी, तर ४६ हजार ५०० मेट्रिक टन संयुक्त खत मंजूर झाले आहे. हे खत जिल्ह्यात येण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात खत टंचाई जाणवण्याची शक्यता दुरावली आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १३ लाख ५१ हजार हेक्टर आहे. त्यापैकी खरिपात नऊ लाख २० हजार हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने बियाणे, खत आणि लावगडीचे नियोजन केले जात आहे. मात्र शेतकऱ्यांची सर्व भीस्त मृगावर अवलंबून राहणार आहे. कारण जिल्ह्यात केवळ १७ टक्केच शेती ओलिताखाली आहे. उर्वरित ८३ टक्के शेती अद्याप निसर्गावर अवलंबून आहे. विहिरी, बोअरव्दारे ५० हजार हेक्टरचे सिंचन जिल्ह्यातील शेती निसर्गाच्या पावसावर अवलंबून आहे. सिंचनाच्या सुविधा तोकड्या आहेत. कोणताही प्रकल्प पूर्ण क्षमतेने ओलीत करीत नाही. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी ओलितासाठी शेतात विहीर, बोअर खोदली. या विहिरी आणि बोअरव्दारे ४९ हजार हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. विविध प्रकल्पांच्या कालव्यांव्दारे प्रत्यक्षात केवळ २४ हजार ५०० हेक्टर शेतीच ओलिताखाली येऊ शकली आहे. चार लाख हेक्टवर कापूस यावर्षीच्या खरिपात जवळपास चार लाख पाच हजार हेक्टरवर कपाशी, तर दोन लाख ५० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होणार आहे. बीटी कपाशी बियाण्याची तब्बल २१ लाख ५० हजार पॉकिटे, तर सोयाबीनचे एक लाख १६ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे. महाबिजचे सोयाबीनचे १८ हजार क्विंटल बियाणे तूर्तास उपलब्ध आहे.