शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

४० हजार मेट्रिक टन खतसाठा

By admin | Updated: May 21, 2017 00:29 IST

जिल्ह्यात गेल्यावर्षीचेच तब्बल ४० हजार मेट्रिक टन खत शिल्लक आहे.

गरज केवळ पावणे दोन लाखाची : जिल्ह्यातून खत टंचाई होणार हद्दपार लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यात गेल्यावर्षीचेच तब्बल ४० हजार मेट्रिक टन खत शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी खत टंचाईची शक्यता दुरावली आहे. जिल्ह्याला खरीप हंगामासाठी एक लाख ७३ हजार ६०० मेट्रिक टन खताची गरज आहे. त्यात ४० हजार मेट्रिक टन खत शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी खत टंचाई हद्दपार होणार आहे. खरिपासाठी जिल्ह्याला ७२ हजार ३०० मेट्रिक टन युरिया, १३ हजार २०० मेट्रिक टन एमओपी, २८ हजार मेट्रिक टन एसएसपी, १३ हजार ६०० मेट्रिक टन डीएपी, तर ४६ हजार ५०० मेट्रिक टन संयुक्त खत मंजूर झाले आहे. हे खत जिल्ह्यात येण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात खत टंचाई जाणवण्याची शक्यता दुरावली आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १३ लाख ५१ हजार हेक्टर आहे. त्यापैकी खरिपात नऊ लाख २० हजार हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने बियाणे, खत आणि लावगडीचे नियोजन केले जात आहे. मात्र शेतकऱ्यांची सर्व भीस्त मृगावर अवलंबून राहणार आहे. कारण जिल्ह्यात केवळ १७ टक्केच शेती ओलिताखाली आहे. उर्वरित ८३ टक्के शेती अद्याप निसर्गावर अवलंबून आहे. विहिरी, बोअरव्दारे ५० हजार हेक्टरचे सिंचन जिल्ह्यातील शेती निसर्गाच्या पावसावर अवलंबून आहे. सिंचनाच्या सुविधा तोकड्या आहेत. कोणताही प्रकल्प पूर्ण क्षमतेने ओलीत करीत नाही. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी ओलितासाठी शेतात विहीर, बोअर खोदली. या विहिरी आणि बोअरव्दारे ४९ हजार हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. विविध प्रकल्पांच्या कालव्यांव्दारे प्रत्यक्षात केवळ २४ हजार ५०० हेक्टर शेतीच ओलिताखाली येऊ शकली आहे. चार लाख हेक्टवर कापूस यावर्षीच्या खरिपात जवळपास चार लाख पाच हजार हेक्टरवर कपाशी, तर दोन लाख ५० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होणार आहे. बीटी कपाशी बियाण्याची तब्बल २१ लाख ५० हजार पॉकिटे, तर सोयाबीनचे एक लाख १६ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे. महाबिजचे सोयाबीनचे १८ हजार क्विंटल बियाणे तूर्तास उपलब्ध आहे.