शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
5
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
6
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
7
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
8
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
9
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
10
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
11
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
12
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
13
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
14
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
15
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
16
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
17
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
18
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
19
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
20
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला

४० हजार हेक्टरवरील भुईमूगाला बसला फटका

By admin | Updated: June 3, 2017 00:45 IST

मे महिन्यातील वाढत्या तापमानाचा जिल्ह्यातील ४० हजार हेक्टरवरील भुईमूगाला तडाखा बसला.

तापमान व उकाड्याचा कहर : शेतकऱ्यांना बियाण्यांचा संशय लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : मे महिन्यातील वाढत्या तापमानाचा जिल्ह्यातील ४० हजार हेक्टरवरील भुईमूगाला तडाखा बसला. अनेक शेतकऱ्यांना बियाणेच सदोष असल्याचा संशय येत असून कृषी विभागाने चौकशी समिती गठित केली आहे. सर्वाधिक महागडे पीक म्हणून भुईमूुगाकडे बघितले जाते. ओलिताची सोय असणारे शेतकरी उनहाळ्यात भुईमूगाची लागवड करतात. यावर्षी मुबलक पाणी आणि अनुदानावर मोठ्या प्रमाणात बियाणे मिळाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भुईमूगाची लागवड केली. दरवर्षी साधारणत: आठ ते दहा हजार हेक्टरवर होणारी भूईमुगाची लागवड यावर्षी तब्बल ४० हजार हेक्टरवर पोहोचली. यामुळे जिल्ह्यात चांगले उत्पादन हाईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात शेंगांची काढणी करताना झाडाला शेंगाच नसल्याचे दिसून आले. यामुळे शेतकरी अवाक झाले. ज्या झाडाला किमान १५ ते २० शेंगा पकडणे अपेक्षित होते, त्याला केवळ एक ते दोनच शेंगा लागल्या. परिणामी शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघणे अवघड झाले. अनेक झाडांना एकही शेंग न लागणे, कमी शेंगा लागणे, दाणे परिपक्व न होणे, अशा शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी दररोज वाढत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे बियाण्याबाबतच संशय व्यक्त केला. खासगी आणि शासकीय बियाणे कंपन्याच्या बियाण्यांचा यात समावेश आहे. कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाचे पथक दाखल शेतकऱ्यांनी बियाण्यांबाबत संशय व्यक्त करताच त्यांच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राचे पथक विविध भागात तपासणी करीत आहे. नेमक्या कशामुळे शेंगांची संख्या घटली, याचा हे पथक शोध घेत आहे. वाढलेल्या तापमानाने फूलगळ भुईमूगाची लागवड २५ जानेवारीपर्यंत करणे अपेक्षित असते. तथापि १५ फेब्रुवारीपर्यंत लागवड करता येते, असे खासगी बियाणे कंपन्या सांगतात. यामुळे शेतकऱ्यांनी १५ फेबु्रवारीपर्यंत लागवड केली. मार्च महिन्यात पीक फुलावर होते. हे पीक ३० अंशापर्यंतचे तापमान सहन करू शकते. प्रत्यक्षात तापमान ३५ अंशाच्यावर गेले. यामुळे फूलगळ मोठ्या प्रमाणात झाली. त्याचा फटका शेंगांना बसला आहे.