शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार हेक्टरवरील भुईमूगाला बसला फटका

By admin | Updated: June 3, 2017 00:45 IST

मे महिन्यातील वाढत्या तापमानाचा जिल्ह्यातील ४० हजार हेक्टरवरील भुईमूगाला तडाखा बसला.

तापमान व उकाड्याचा कहर : शेतकऱ्यांना बियाण्यांचा संशय लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : मे महिन्यातील वाढत्या तापमानाचा जिल्ह्यातील ४० हजार हेक्टरवरील भुईमूगाला तडाखा बसला. अनेक शेतकऱ्यांना बियाणेच सदोष असल्याचा संशय येत असून कृषी विभागाने चौकशी समिती गठित केली आहे. सर्वाधिक महागडे पीक म्हणून भुईमूुगाकडे बघितले जाते. ओलिताची सोय असणारे शेतकरी उनहाळ्यात भुईमूगाची लागवड करतात. यावर्षी मुबलक पाणी आणि अनुदानावर मोठ्या प्रमाणात बियाणे मिळाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भुईमूगाची लागवड केली. दरवर्षी साधारणत: आठ ते दहा हजार हेक्टरवर होणारी भूईमुगाची लागवड यावर्षी तब्बल ४० हजार हेक्टरवर पोहोचली. यामुळे जिल्ह्यात चांगले उत्पादन हाईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात शेंगांची काढणी करताना झाडाला शेंगाच नसल्याचे दिसून आले. यामुळे शेतकरी अवाक झाले. ज्या झाडाला किमान १५ ते २० शेंगा पकडणे अपेक्षित होते, त्याला केवळ एक ते दोनच शेंगा लागल्या. परिणामी शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघणे अवघड झाले. अनेक झाडांना एकही शेंग न लागणे, कमी शेंगा लागणे, दाणे परिपक्व न होणे, अशा शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी दररोज वाढत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे बियाण्याबाबतच संशय व्यक्त केला. खासगी आणि शासकीय बियाणे कंपन्याच्या बियाण्यांचा यात समावेश आहे. कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाचे पथक दाखल शेतकऱ्यांनी बियाण्यांबाबत संशय व्यक्त करताच त्यांच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राचे पथक विविध भागात तपासणी करीत आहे. नेमक्या कशामुळे शेंगांची संख्या घटली, याचा हे पथक शोध घेत आहे. वाढलेल्या तापमानाने फूलगळ भुईमूगाची लागवड २५ जानेवारीपर्यंत करणे अपेक्षित असते. तथापि १५ फेब्रुवारीपर्यंत लागवड करता येते, असे खासगी बियाणे कंपन्या सांगतात. यामुळे शेतकऱ्यांनी १५ फेबु्रवारीपर्यंत लागवड केली. मार्च महिन्यात पीक फुलावर होते. हे पीक ३० अंशापर्यंतचे तापमान सहन करू शकते. प्रत्यक्षात तापमान ३५ अंशाच्यावर गेले. यामुळे फूलगळ मोठ्या प्रमाणात झाली. त्याचा फटका शेंगांना बसला आहे.