शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या गट, गणांवर ४० आक्षेप

By admin | Updated: October 28, 2016 01:56 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती गट व गणांचे प्रारूप प्रसिद्ध झाले. त्यावर आक्षेप मागविगण्यात आले.

भौगोलिक सीमाच पुसल्या : नकाशावर नद्या, जंगल दाखविलेच नाहीयवतमाळ : जिल्हा परिषद, पंचायत समिती गट व गणांचे प्रारूप प्रसिद्ध झाले. त्यावर आक्षेप मागविगण्यात आले. ४० आक्षेप निवडणूक विभागाकडे दाखल झालेले आहेत. यात प्रामुख्याने गट व गणांची फाळणी करताना आयोगाच्या निर्देशांना डावलल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. भौगोलिक सीमारेषा पुसण्याचे काम काही तालुक्यात झाले. यात रस्ते, नद्या, नाले आणि जंगल या नैसर्गिक मर्यादा पकडून सीमा निश्चित केल्या नाही, असा आक्षेप घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील १६ तालुक्यापैकी महागाव तालुक्यातील गट आणि गणांच्या प्रारूपावर सर्वाधिक १२ आक्षेप दाखल झाले आहे. तर नेर, पुसद, मारेगाव, कळंब या चार तालुक्यातून एकही आक्षेप आलेला नाही. निवडणूक आयोगाने गट व गणांची रचना करताना भौगोलिकदृष्ट्या सलग असला पाहिजे. रस्ते, नद्या, नाले इत्यादी नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन त्याची सीमा निश्चित कारावी, शिवाय मोकळ््या जागांसह सर्व जागा कोणत्याना कोणत्या गट, गणात गणली जाईल याची दक्षता घ्यावी. गण तयार करताना प्रगणक गट फोडू नये, असेही निर्देश दिले. अपवादात्मक परिस्थितीत प्रगणक गट फोडल्यास प्रगणक गटाचे सर्वेक्षण करून तेथील जणगणनेचे विभाजन कसे होते हे निश्चित करावे. त्यासोबतच प्रगणक गट फोडल्यास भौगोलिक सीमा योग्य प्रकारे दाखविल्या जातील याची दक्षता घ्यावी. कुठल्याही परिस्थितीत गणाच्या निश्चितीत ग्रामपंचायत सीमांचा भंग होऊ नये, असे सांगण्यात आले. गणाची रचनाही उत्तर दिशेकडून सुरू करून इशान्येकडे त्यानंतर पुर्वेकडे, पुर्वेकडून पश्चिमेकडे रचना करत दक्षीणेकडे त्याचा शेवट करावा. त्यापद्धतीने गणाला क्रमाक द्यावे, असे स्पष्ट केले आहे. त्या उपरही अनेक गट आणि गणांमध्ये भौगोलिक सीमारेषा पाळण्यात आल्याचे दिसत नाही. गट आणि गणांचा नकाशा तयार करताना त्यावर या भौगोलिक सीमा स्पष्टपणे दाखविण्यात आलेल्या नाही. त्यामुळे काही ठिकाणी गोंधळाची स्थिती आहे. आता प्राप्त आक्षेपावर उत्तर तयार करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे. उत्तरासह हे आक्षेप विभागीय आयुक्तांकडे सुनावणीसाठी ठेवले जाणार आहे. गट आणि गणांची अंतिम रचनाही २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. मात्र गट, गणांच्या प्रारुपातील चुकांमुळे अनेकांचे राजकीय समिकरण धोक्यात आले आहे. त्यामुळे आयुक्तांकडील सुनावणीत न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी इच्छुक उमेदवारांकडून सुरू आहे. (कार्यालय प्रतिनिधी)