शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

४० गावात विजेचा लपंडाव

By admin | Updated: May 15, 2016 01:59 IST

महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत. तालुक्यातील तब्बल ४० गावांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून वीज पुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे.

नागरिक त्रस्त : साखरा, ब्राह्मणगाव परिसरात आठ दिवसांपासून समस्याउमरखेड : महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत. तालुक्यातील तब्बल ४० गावांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून वीज पुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वीज वितरणचे कर्मचारी मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. तालुक्यातील साखरा व ब्राह्मणगाव येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रावर जवळपास ४० गावांची जबाबदारी आहे. मात्र या चाळीसही गावात गेल्या आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या विरोधात तालुक्यात रोष निर्माण झाला आहे. ब्राह्मणगाव व साखरा या दोन ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत चालगणी, साखरा, खरूस, लोहरा, कारखेड, देवसरी, दिघडी, उंचवडद, चातारी, बोरी कोपरा, मानकेश्वर, सिंदगी, परजना, हरदडा, सोईट या गावांना विद्युत पुरवठा केला जातो. वीज पुरवठ्यावर अवलंबून असलेले छोट्या उद्योगांना महावितरण कंपनीमुळे मोठा फटका बसला आहे. घरगुती वापरातील विजेची उपकरणे विजेच्या लपंडावामुळे निरूपयोगी ठरत आहे. आधीच या गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे. त्यात विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे कसेबसे उपलब्ध होणारे पाणीही आता मिळेनासे झाले आहे. सध्या चालू असलेल्या प्रचंड तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. त्यातच वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे अनेकांना उष्माघाताचा फटका बसत आहे. वीज खंडित राहिल्यामुळे त्याचा परिणाम लघुउद्योग, गिरणी, महासेवा केंद्र यांच्यावर होत आहे. गावातील पाणीपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे भीषण पाणीटंचाईत नागरिकांचा जीव पाण्यासाठी कासावीस झाला आहे. व्यापारी वर्गात वीज वितरण कंपनीविरूद्ध रोष निर्माण झाला आहे. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, बालके, वृद्ध, तरुण, महिला अशा सगळ्यांचेच जगणे कठीण झाले आहे. रात्रीच्या वेळेस हमखास वीजपुरवठा खंडित होत असल्याने कमालीच्या उष्णतामानामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. मे महिना असल्यामुळे सूर्य आग ओकत आहे. आधीच निसर्गाचा प्रकोप सुरू असून त्यात वीजही नसल्याने गर्मीमुळे जगणे मुश्कील झाले आहे. रात्री-अपरात्री जाणाऱ्या विजेमुळे वीज वितरण कंपनीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन ब्राह्मणगाववासीयांचे हाल थांबवावे, अशी मागणी करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)छोटे व्यवसाय मोडकळीसतालुक्यातील तब्बल ४० गावांना अनियमित वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे या गावांमधील छोटे व्यवसाय प्रभावित झाले आहे. पीठ गिरण्या बंद पडल्या आहेत. इस्त्री व्यवसाय कोळशाविना ठप्प पडला आहे. झेरॉक्सची दुकाने तर व्यावसायिकांनी काही दिवसांपुरती बंद ठेवणेच पसंत केले आहे. वारंवार खंडित होणाऱ्या आणि अनपेक्षितपणे येणाऱ्या विजेमुळे वीज उपकरणे निकामी होत आहे. त्याचा फटका छोट्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे.