शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

५०७ लाभार्थी घरकुलापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:09 IST

बेघरांना घर मिळावे या उदात्त हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना अमलात आणली. भारतातील बऱ्याच नगरपालिका व महानगरपालिकेत असंख्य लोकांचे या योजनेमुळे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. पुसद नगरपालिकेनेसुद्धा या योजनेअंतर्गत ५०७ लाभार्थ्यांची घरकुलासाठी निवड केली.

ठळक मुद्देपुसद नगरपालिका : निधी उपलब्ध तरी कारभार सुस्त

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : नगरपालिकेच्या सुस्त कारभारामुळे ५०७ लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित रहावे लागले. पालिकेकडे दोन कोटी दोन लाख ८० हजार रुपयांचा निधी जमा असतानाही दोन महिन्यांपासून या लाभार्थ्यांना घरकुल मिळालेले नाही.बेघरांना घर मिळावे या उदात्त हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना अमलात आणली. भारतातील बऱ्याच नगरपालिका व महानगरपालिकेत असंख्य लोकांचे या योजनेमुळे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. पुसद नगरपालिकेनेसुद्धा या योजनेअंतर्गत ५०७ लाभार्थ्यांची घरकुलासाठी निवड केली. त्या प्रत्येक लाभार्थ्यासाठी ४० हजार रुपये या प्रमाणे दोन कोटी दोन लाख ८० हजार रुपयांचा निधी नगरपरिषदेच्या खात्यात जून महिन्यात जमा झाला आहे. परंतु अद्याप पावेतो या पैशाचे वाटप लाभार्थ्यांना नगरपालिका प्रशासनाने केलेले नाही.एकीकडे ५०७ लाभार्थी आता आपले पक्के घर होईल ही आस लावून आहे. तर दुसरीकडे नगरपरिषदेच्या सुस्त प्रशासनामुळे त्यांना हक्काचे घरकूल मिळण्यास विलंब होत आहे.सप्टेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. अशी अवस्था असताना दोन महिन्यांपासून लाभार्थ्यांना घरकुलाचे हक्काचे पैसे मिळालेले नाही.पुसद नगरपरिषदेच्या खात्यात पैसा जमा असूनही ते वाटप करण्याबाबत प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. ही बाब प्रशासकीय दृष्ट्या अतिशय गंभीर आहे. तेव्हा नगरपरिषद प्रशासनाने त्वरित लाभार्थ्यांना पहिला हप्ता त्यांच्या खात्यात जमा करावा, अशी मागणी राष्टÑवादीचे नगरसेवक निशांत बयास यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे. आता किमान नगरसेवकाच्या मागणीचा तरी प्रशासन विचार करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.गरिबांना आचारसंहितेचा धसकाघरकूल मंजूर झाले. मात्र योजनेचा पैसा हाती न आल्याने गोरगरिबांचे घरकुलाचे स्वप्न अर्धवट आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुसदच्या ५०७ लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी दोन कोटी पेक्षा अधिक निधी नगरपरिषदेच्या खात्यात जमा आहे. मात्र तीन महिन्यापूर्वीच पैसा आलेला असतानाही नगरपरिषद प्रशासनाने लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा वाटा पोहोचविला नाही. लवकरच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू झाल्यास निधी देण्याबाबतचा निर्णय घेणे नगरपरिषद प्रशासनाला आणखी कठीण जाणार आहे. याबाबीचा लाभार्थ्यांनी धसका घेतला आहे. आचारसंहितेपूर्वीच निधी प्रत्येकाच्या खात्यात जमा करावा, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना