शहरं
Join us  
Trending Stories
1
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
2
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
3
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
4
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
5
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
6
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
7
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
8
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
9
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
10
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
11
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
12
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
13
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
14
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
15
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
16
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
17
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
18
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतक झळकावणाऱ्या टॉप ५ महिला क्रिकेटपटू!
19
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
20
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल

३८०० बेनाम रूईगाठींचे गौडबंगाल

By admin | Updated: October 1, 2015 02:20 IST

वणी येथील कॉटन प्रक्रिया उद्योगात सध्या रूईच्या त्या ३८०० बेनाम गाठींची चर्चा होत आहे. या गाठी सीसीआयच्या असाव्या, असा संशय आहे.

साडेपाच कोटींचा मुद्देमाल : सीसीआयवर संशय, अर्ध्या किंमतीत विक्रीची होती तयारीयवतमाळ : वणी येथील कॉटन प्रक्रिया उद्योगात सध्या रूईच्या त्या ३८०० बेनाम गाठींची चर्चा होत आहे. या गाठी सीसीआयच्या असाव्या, असा संशय आहे. साडेपाच ते सहा कोटी रुपये किंमत असलेल्या या गाठी काही महिन्यांपूर्वी अर्ध्या किंमतीत विकण्याची आॅफर अनेकांना दिली गेल्याने या गाठी ‘मार्जीन’मधील कापसातून बनविल्या गेल्या असाव्या, असा अंदाज वर्तविला जात आहे.वणी-पांढरकवडा हा कापसाचा स्ट्राँग बेल्ट आहे. पांढरकवड्यातील कापूस तर सर्वाधिक लांबीमुळे जगात क्रमांक एकचा मानला जातो. कापसाचे दर्जेदार व सर्वाधिक उत्पादन वणी-पांढरकवड्यात होत असल्याने तेथे खरेदीही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात केली जाते. दरवर्षी सीसीआय व पणन महासंघामार्फत कापसाची खरेदी होते. गतवर्षीच्या खरीप हंगामातील कापूस खरेदी संपली. मात्र त्यातील ३८०० रूईगाठींची चर्चा आजही कायम आहे. सूत्रानुसार, या ३८०० रूईगाठी वणी भागातीलच एका राजकीय नेत्याच्या गोदामात अनेक महिने साठा करुन ठेवल्या गेल्या. या नेत्याने हे गोदाम भाड्याने दिले आहे. विशेष असे, या नेत्याने गेल्या वर्षी कापसाचे एक बोंडही खरेदी केले नाही. मग त्याच्याकडे या गाठी आल्या कोठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनेक महिने या गाठी पडून राहिल्यानंतर त्या खुल्या बाजारात विकणे धोक्याचे असल्याचे लक्षात आले. म्हणून सहा कोटी रुपये किंमत असलेल्या या गाठी अवघ्या अडीच-तीन कोटीत विकण्याची तयारी केली गेली होती. त्यासाठी जिल्ह्यातच नव्हे तर आदिलाबादपर्यंत अनेकांना या गाठींची अर्ध्या किंमतीची आॅफर दिली गेली. मात्र बाजारात भाव पडल्याने आणि पकडले जाण्याच्या भीतीने या गाठी घेण्यास कुणी रस दाखविला नाही. अर्ध्या किंमतीत गाठी विकण्याची तयारी पाहता या गाठींमध्ये नक्कीच काही तरी काळेबेरे असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. सूत्रानुसार, या ३८०० गाठी सीसीआयच्या ‘मार्जीन’मधील कापसाच्या असाव्या. गैरमार्गानेच आलेल्या कापसातील या गाठी असल्याने त्या अर्ध्या किंमतीत विकण्याची तयारी दर्शविली असावी, असे दिसते. या गाठींमध्ये राजकीय हितसंबंधही गुंतलेले असल्याचे स्पष्ट• होते. अनेक महिने या गाठी राजकीय नेत्याच्या गोदामात पडून होत्या. अर्ध्या किंमतीतही त्याला खरेदीदार नसल्याचे पाहून या गाठी गोदामातून बाहेर काढून सीमापार नेल्या गेल्या असाव्या, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)