शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

३८०० बेनाम रूईगाठींचे गौडबंगाल

By admin | Updated: October 1, 2015 02:20 IST

वणी येथील कॉटन प्रक्रिया उद्योगात सध्या रूईच्या त्या ३८०० बेनाम गाठींची चर्चा होत आहे. या गाठी सीसीआयच्या असाव्या, असा संशय आहे.

साडेपाच कोटींचा मुद्देमाल : सीसीआयवर संशय, अर्ध्या किंमतीत विक्रीची होती तयारीयवतमाळ : वणी येथील कॉटन प्रक्रिया उद्योगात सध्या रूईच्या त्या ३८०० बेनाम गाठींची चर्चा होत आहे. या गाठी सीसीआयच्या असाव्या, असा संशय आहे. साडेपाच ते सहा कोटी रुपये किंमत असलेल्या या गाठी काही महिन्यांपूर्वी अर्ध्या किंमतीत विकण्याची आॅफर अनेकांना दिली गेल्याने या गाठी ‘मार्जीन’मधील कापसातून बनविल्या गेल्या असाव्या, असा अंदाज वर्तविला जात आहे.वणी-पांढरकवडा हा कापसाचा स्ट्राँग बेल्ट आहे. पांढरकवड्यातील कापूस तर सर्वाधिक लांबीमुळे जगात क्रमांक एकचा मानला जातो. कापसाचे दर्जेदार व सर्वाधिक उत्पादन वणी-पांढरकवड्यात होत असल्याने तेथे खरेदीही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात केली जाते. दरवर्षी सीसीआय व पणन महासंघामार्फत कापसाची खरेदी होते. गतवर्षीच्या खरीप हंगामातील कापूस खरेदी संपली. मात्र त्यातील ३८०० रूईगाठींची चर्चा आजही कायम आहे. सूत्रानुसार, या ३८०० रूईगाठी वणी भागातीलच एका राजकीय नेत्याच्या गोदामात अनेक महिने साठा करुन ठेवल्या गेल्या. या नेत्याने हे गोदाम भाड्याने दिले आहे. विशेष असे, या नेत्याने गेल्या वर्षी कापसाचे एक बोंडही खरेदी केले नाही. मग त्याच्याकडे या गाठी आल्या कोठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनेक महिने या गाठी पडून राहिल्यानंतर त्या खुल्या बाजारात विकणे धोक्याचे असल्याचे लक्षात आले. म्हणून सहा कोटी रुपये किंमत असलेल्या या गाठी अवघ्या अडीच-तीन कोटीत विकण्याची तयारी केली गेली होती. त्यासाठी जिल्ह्यातच नव्हे तर आदिलाबादपर्यंत अनेकांना या गाठींची अर्ध्या किंमतीची आॅफर दिली गेली. मात्र बाजारात भाव पडल्याने आणि पकडले जाण्याच्या भीतीने या गाठी घेण्यास कुणी रस दाखविला नाही. अर्ध्या किंमतीत गाठी विकण्याची तयारी पाहता या गाठींमध्ये नक्कीच काही तरी काळेबेरे असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. सूत्रानुसार, या ३८०० गाठी सीसीआयच्या ‘मार्जीन’मधील कापसाच्या असाव्या. गैरमार्गानेच आलेल्या कापसातील या गाठी असल्याने त्या अर्ध्या किंमतीत विकण्याची तयारी दर्शविली असावी, असे दिसते. या गाठींमध्ये राजकीय हितसंबंधही गुंतलेले असल्याचे स्पष्ट• होते. अनेक महिने या गाठी राजकीय नेत्याच्या गोदामात पडून होत्या. अर्ध्या किंमतीतही त्याला खरेदीदार नसल्याचे पाहून या गाठी गोदामातून बाहेर काढून सीमापार नेल्या गेल्या असाव्या, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)