शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

३८०० बेनाम रूईगाठींचे गौडबंगाल

By admin | Updated: October 1, 2015 02:20 IST

वणी येथील कॉटन प्रक्रिया उद्योगात सध्या रूईच्या त्या ३८०० बेनाम गाठींची चर्चा होत आहे. या गाठी सीसीआयच्या असाव्या, असा संशय आहे.

साडेपाच कोटींचा मुद्देमाल : सीसीआयवर संशय, अर्ध्या किंमतीत विक्रीची होती तयारीयवतमाळ : वणी येथील कॉटन प्रक्रिया उद्योगात सध्या रूईच्या त्या ३८०० बेनाम गाठींची चर्चा होत आहे. या गाठी सीसीआयच्या असाव्या, असा संशय आहे. साडेपाच ते सहा कोटी रुपये किंमत असलेल्या या गाठी काही महिन्यांपूर्वी अर्ध्या किंमतीत विकण्याची आॅफर अनेकांना दिली गेल्याने या गाठी ‘मार्जीन’मधील कापसातून बनविल्या गेल्या असाव्या, असा अंदाज वर्तविला जात आहे.वणी-पांढरकवडा हा कापसाचा स्ट्राँग बेल्ट आहे. पांढरकवड्यातील कापूस तर सर्वाधिक लांबीमुळे जगात क्रमांक एकचा मानला जातो. कापसाचे दर्जेदार व सर्वाधिक उत्पादन वणी-पांढरकवड्यात होत असल्याने तेथे खरेदीही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात केली जाते. दरवर्षी सीसीआय व पणन महासंघामार्फत कापसाची खरेदी होते. गतवर्षीच्या खरीप हंगामातील कापूस खरेदी संपली. मात्र त्यातील ३८०० रूईगाठींची चर्चा आजही कायम आहे. सूत्रानुसार, या ३८०० रूईगाठी वणी भागातीलच एका राजकीय नेत्याच्या गोदामात अनेक महिने साठा करुन ठेवल्या गेल्या. या नेत्याने हे गोदाम भाड्याने दिले आहे. विशेष असे, या नेत्याने गेल्या वर्षी कापसाचे एक बोंडही खरेदी केले नाही. मग त्याच्याकडे या गाठी आल्या कोठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनेक महिने या गाठी पडून राहिल्यानंतर त्या खुल्या बाजारात विकणे धोक्याचे असल्याचे लक्षात आले. म्हणून सहा कोटी रुपये किंमत असलेल्या या गाठी अवघ्या अडीच-तीन कोटीत विकण्याची तयारी केली गेली होती. त्यासाठी जिल्ह्यातच नव्हे तर आदिलाबादपर्यंत अनेकांना या गाठींची अर्ध्या किंमतीची आॅफर दिली गेली. मात्र बाजारात भाव पडल्याने आणि पकडले जाण्याच्या भीतीने या गाठी घेण्यास कुणी रस दाखविला नाही. अर्ध्या किंमतीत गाठी विकण्याची तयारी पाहता या गाठींमध्ये नक्कीच काही तरी काळेबेरे असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. सूत्रानुसार, या ३८०० गाठी सीसीआयच्या ‘मार्जीन’मधील कापसाच्या असाव्या. गैरमार्गानेच आलेल्या कापसातील या गाठी असल्याने त्या अर्ध्या किंमतीत विकण्याची तयारी दर्शविली असावी, असे दिसते. या गाठींमध्ये राजकीय हितसंबंधही गुंतलेले असल्याचे स्पष्ट• होते. अनेक महिने या गाठी राजकीय नेत्याच्या गोदामात पडून होत्या. अर्ध्या किंमतीतही त्याला खरेदीदार नसल्याचे पाहून या गाठी गोदामातून बाहेर काढून सीमापार नेल्या गेल्या असाव्या, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)