शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
4
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
5
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
6
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
9
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
10
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
11
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
14
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
15
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
16
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
17
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
20
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!

३८ जणांची अखेर कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 05:00 IST

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या व सुरवातीला पॉझिटिव्ह अहवाल आलेले ३८ जण १४ दिवसांच्या कालावधीनंतर उपचारामुळे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. या ३८ पैकी ३ जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. तर उर्वरित ३५ जण गृह विलगीकरणात राहणार आहेत.

ठळक मुद्देआता जिल्ह्यात केवळ सात कोरोनाबाधित

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन महिन्यात जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या शंभरीवर पोहोचली होती. मात्र, आरोग्य यंत्रणेच्या कष्टाने आणि यशस्वी उपचारांमुळे ही संख्या थेट दहाच्याही आत आली आहे. गेल्या आठवडाभरापासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असताना आयसोलेशन वॉर्डात दाखल असलेल्या ४५ पैकी तब्बल ३८ जणांना शनिवारी सुट्टी देण्यात आली. त्यामुळे आता यवतमाळात केवळ सात कोरोनाग्रस्त उरले आहेत.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या व सुरवातीला पॉझिटिव्ह अहवाल आलेले ३८ जण १४ दिवसांच्या कालावधीनंतर उपचारामुळे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. या ३८ पैकी ३ जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. तर उर्वरित ३५ जण गृह विलगीकरणात राहणार आहेत.जिल्ह्यात आता अ‍ॅक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४५ वरून सात इतकी कमी झाली आहे. २४, २५ आणि २६ एप्रिल यादरम्यान सर्वात जास्त पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडली होती. त्यानंतर रुग्णवाढीचा वेग कमी झाला असला तरी एक-दोन, एक-दोन पॉझिटिव्ह रुग्ण येणे सुरू होते. त्यामुळे जिल्ह्याचा एकूण आकडा पाहता-पाहता ९८ वर गेला होता. यापैकी तब्बल ९१ जणांना बरे करण्यात आरोग्य विभागाला लक्षणीय यश आले आहे.सुरवातीला केवळ यवतमाळ शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. मात्र नंतर नेर आणि उमरखेड (धानोरा) येथे रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली. उमरखेड येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व ‘हाय रिस्क’ व ‘लो रिस्क’ अशा ६८ लोकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहे. तसेच नेर येथील ‘हाय रिस्क’ व ‘लो रिस्क’ अशा ७६ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठवले असता यापैकी ३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर ७३ अहवाल निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. उमरखेड, महागाव, नेर आणि सर्व यवतमाळ जिल्ह्यासाठी ही बाब समाधानकारक ठरली आहे.जिल्हा कोरोनामुक्त होणार - ना. राठोडयवतमाळ जिल्ह्यासाठी ही अतिशय दिलासादायक बाब असून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाचे कौतुक केले आहे. जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या