लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन महिन्यात जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या शंभरीवर पोहोचली होती. मात्र, आरोग्य यंत्रणेच्या कष्टाने आणि यशस्वी उपचारांमुळे ही संख्या थेट दहाच्याही आत आली आहे. गेल्या आठवडाभरापासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असताना आयसोलेशन वॉर्डात दाखल असलेल्या ४५ पैकी तब्बल ३८ जणांना शनिवारी सुट्टी देण्यात आली. त्यामुळे आता यवतमाळात केवळ सात कोरोनाग्रस्त उरले आहेत.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या व सुरवातीला पॉझिटिव्ह अहवाल आलेले ३८ जण १४ दिवसांच्या कालावधीनंतर उपचारामुळे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. या ३८ पैकी ३ जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. तर उर्वरित ३५ जण गृह विलगीकरणात राहणार आहेत.जिल्ह्यात आता अॅक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४५ वरून सात इतकी कमी झाली आहे. २४, २५ आणि २६ एप्रिल यादरम्यान सर्वात जास्त पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडली होती. त्यानंतर रुग्णवाढीचा वेग कमी झाला असला तरी एक-दोन, एक-दोन पॉझिटिव्ह रुग्ण येणे सुरू होते. त्यामुळे जिल्ह्याचा एकूण आकडा पाहता-पाहता ९८ वर गेला होता. यापैकी तब्बल ९१ जणांना बरे करण्यात आरोग्य विभागाला लक्षणीय यश आले आहे.सुरवातीला केवळ यवतमाळ शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. मात्र नंतर नेर आणि उमरखेड (धानोरा) येथे रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली. उमरखेड येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व ‘हाय रिस्क’ व ‘लो रिस्क’ अशा ६८ लोकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहे. तसेच नेर येथील ‘हाय रिस्क’ व ‘लो रिस्क’ अशा ७६ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठवले असता यापैकी ३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर ७३ अहवाल निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. उमरखेड, महागाव, नेर आणि सर्व यवतमाळ जिल्ह्यासाठी ही बाब समाधानकारक ठरली आहे.जिल्हा कोरोनामुक्त होणार - ना. राठोडयवतमाळ जिल्ह्यासाठी ही अतिशय दिलासादायक बाब असून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाचे कौतुक केले आहे. जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
३८ जणांची अखेर कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 05:00 IST
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या व सुरवातीला पॉझिटिव्ह अहवाल आलेले ३८ जण १४ दिवसांच्या कालावधीनंतर उपचारामुळे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. या ३८ पैकी ३ जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. तर उर्वरित ३५ जण गृह विलगीकरणात राहणार आहेत.
३८ जणांची अखेर कोरोनावर मात
ठळक मुद्देआता जिल्ह्यात केवळ सात कोरोनाबाधित