शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
4
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
5
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
6
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
7
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
8
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
9
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
10
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
11
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
12
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
13
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
14
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
15
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
16
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
17
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
18
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
19
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
20
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

३८ जणांची अखेर कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 05:00 IST

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या व सुरवातीला पॉझिटिव्ह अहवाल आलेले ३८ जण १४ दिवसांच्या कालावधीनंतर उपचारामुळे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. या ३८ पैकी ३ जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. तर उर्वरित ३५ जण गृह विलगीकरणात राहणार आहेत.

ठळक मुद्देआता जिल्ह्यात केवळ सात कोरोनाबाधित

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन महिन्यात जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या शंभरीवर पोहोचली होती. मात्र, आरोग्य यंत्रणेच्या कष्टाने आणि यशस्वी उपचारांमुळे ही संख्या थेट दहाच्याही आत आली आहे. गेल्या आठवडाभरापासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असताना आयसोलेशन वॉर्डात दाखल असलेल्या ४५ पैकी तब्बल ३८ जणांना शनिवारी सुट्टी देण्यात आली. त्यामुळे आता यवतमाळात केवळ सात कोरोनाग्रस्त उरले आहेत.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या व सुरवातीला पॉझिटिव्ह अहवाल आलेले ३८ जण १४ दिवसांच्या कालावधीनंतर उपचारामुळे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. या ३८ पैकी ३ जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. तर उर्वरित ३५ जण गृह विलगीकरणात राहणार आहेत.जिल्ह्यात आता अ‍ॅक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४५ वरून सात इतकी कमी झाली आहे. २४, २५ आणि २६ एप्रिल यादरम्यान सर्वात जास्त पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडली होती. त्यानंतर रुग्णवाढीचा वेग कमी झाला असला तरी एक-दोन, एक-दोन पॉझिटिव्ह रुग्ण येणे सुरू होते. त्यामुळे जिल्ह्याचा एकूण आकडा पाहता-पाहता ९८ वर गेला होता. यापैकी तब्बल ९१ जणांना बरे करण्यात आरोग्य विभागाला लक्षणीय यश आले आहे.सुरवातीला केवळ यवतमाळ शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. मात्र नंतर नेर आणि उमरखेड (धानोरा) येथे रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली. उमरखेड येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व ‘हाय रिस्क’ व ‘लो रिस्क’ अशा ६८ लोकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहे. तसेच नेर येथील ‘हाय रिस्क’ व ‘लो रिस्क’ अशा ७६ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठवले असता यापैकी ३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर ७३ अहवाल निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. उमरखेड, महागाव, नेर आणि सर्व यवतमाळ जिल्ह्यासाठी ही बाब समाधानकारक ठरली आहे.जिल्हा कोरोनामुक्त होणार - ना. राठोडयवतमाळ जिल्ह्यासाठी ही अतिशय दिलासादायक बाब असून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाचे कौतुक केले आहे. जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या