शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

जिल्ह्यात ३५ हजार शिधापत्रिका बोगस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 22:31 IST

धान्य वाटपाची प्रक्रिया आॅनलाईन झाल्यापासून जिल्ह्यातील ४७ हजार शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचलच केली नाही. यापैकी १२ हजार शिधापत्रिका पुरवठा विभागाने रद्द केल्या असून इतर ३५ हजार शिधापत्रिका बोगस असल्याचा संशय आहे.

ठळक मुद्देधान्याची उचल नाही : १२ हजार शिधापत्रिका केल्या रद्द, दोन कोटींचा खर्च वाचणार

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : धान्य वाटपाची प्रक्रिया आॅनलाईन झाल्यापासून जिल्ह्यातील ४७ हजार शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचलच केली नाही. यापैकी १२ हजार शिधापत्रिका पुरवठा विभागाने रद्द केल्या असून इतर ३५ हजार शिधापत्रिका बोगस असल्याचा संशय आहे.संपूर्ण जिल्ह्यात पाच लाख ३० हजार शिधापत्रिकाधारक आहेत. या शिधापत्रिकेवर प्रत्येक कुटुंबाला सरासरी २० किलो धान्य दिले जाते. पूर्वी धान्यात अफरातफर केली जात होती. त्यामुळे आता पॉस मशीन लावण्यात आली. ही मशीन आल्यापासून किती कोट्याची उचल झाली आणि कुठल्या कुटुंबानी धान्याची उचल केली नाही, याची संपूर्ण माहिती जिल्हा पुरवठा यंत्रणेकडे पोहोचते. यातून अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत.जिल्ह्यातील ४७ हजार शिधापत्रिकाधारकांनी गत तीन महिन्यांपासून धान्याची उचलच केली नाही. यामुळे पुरवठा विभाग चक्रावून गेला आहे. यातील १२ हजार शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत, तर ३५ हजार शिधापत्रिकांची छाननी सुरू करण्यात आली आहे. हे ३५ हजार ग्राहक कुठले आहेत, त्यांनी धान्याची उचल का केली नाही, ते उच्चवर्गीय आहेत काय, त्यांना धान्याची आवश्यकता नाही काय, असे असेल तर अशा ग्राहकांना शुभ्र शिधापत्रिका वितरित केल्या जाणार आहे. यामुळे धान्याच्या अफरातफरीला ब्रेक लागणार आहे. त्यासाठी तपासणी सुरू असून बोगस शिधापत्रिकाधारकांचे आणि विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.नऊ लाख ६० हजार किलो धान्य वाचलेआॅनलाईन प्रक्रियेमुळे धान्य उचल न करणाऱ्या ग्राहकांचा हा आकडा पुढे आला. यामुळे शासनाचे दर महिन्याला वितरित होणारे नऊ लाख ६० हजार क्विंटल धान्य वाचले. यामुळे दर महिन्याचा दोन कोटी २० लाख ८० हजार रूपयांचा खर्च वाचणार आहे. शासनाच्या तिजोरीतून होणारी ही लूट थांबण्यास मदत होणार आहे.जिल्ह्यातील ३५ हजार शिधापत्रिकांची छाननी सुरू आहे. यात संबंधित नागरिक अस्तित्वातच नसतील, तर अशा शिधापत्रिका रद्द करू. श्रीमंतांना शुभ्र पत्रिका दिल्या जाईल.- शालिग्राम भराडीजिल्हा पुरवठा अधिकारी, यवतमाळ