शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पीक विम्याचे ३५ कोटी मिळाले

By admin | Updated: September 9, 2014 00:39 IST

सन २०१३ च्या खरिपातील पीक विम्यापोटी जिल्ह्याला ३४ कोटी ६८ लाख ६८ हजार १७० रुपये प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रक्कम जिल्ह्याला मिळाली. राज्यासाठी एकूण ८४ कोटी रुपये मिळाले आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक : शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम आॅनलाईन जमायवतमाळ : सन २०१३ च्या खरिपातील पीक विम्यापोटी जिल्ह्याला ३४ कोटी ६८ लाख ६८ हजार १७० रुपये प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रक्कम जिल्ह्याला मिळाली. राज्यासाठी एकूण ८४ कोटी रुपये मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम आॅनलाईन जमा केली जात आहे. जिल्ह्यातील सुमारे ९७ हजार ९०६ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना शासनाने गतवर्षी राबविली. पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून राबविलेल्या या योजनेच्या रकमेला काही दिवसांपूर्वीच मंजूरी मिळाली. प्रत्यक्षात रक्कम उपलब्ध झाली नव्हती. आता प्राप्त झालेल्या रकमेतून संबंधित शेतकऱ्यांना वितरण केले जात आहे. मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, कापूस, तूर या पिकांसाठी योजनेचा लाभ दिला जात आहे.जिल्ह्यात सर्वाधिक उमरखेड तालुक्यातील २९ हजार ७४९ शेतकऱ्यांना ९ कोटी ५२ लाख ८४० रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्या खालोखाल महागाव तालुक्याच्या १६ हजार १२ शेतकऱ्यांना २ कोटी ६० लाख ५८ हजार ८९१ रुपयांचे वाटप होणार आहे. दारव्हा तालुक्यातील १४ हजार ८५८ शेतकऱ्यांना ३ कोटी ८१ लाख ७५ हजार ९०४ तर आर्णी तालुक्यातील ११ हजार २४ शेतकऱ्यांना ७ कोटी २२ लाख १६ हजार ३८३ रुपयांचे वाटप होणार आहे.यवतमाळ तालुक्यातील ३ हजार ७३, कळंब ५ हजार २४१, राळेगाव ३ हजार ५७७, घाटंजी ४५५, नेर ५८१, बाभूळगाव ३ हजार ३९९, पुसद २ हजार ५१५, दिग्रस १ हजार ४१, पांढरकवडा ३ हजार ९०५, वणी १३२, मारेगाव २६४ आणि झरीजामणी तालुक्यातील २ हजार ८० शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. पीक विम्याचा सर्वाधिक लाभ घेणारे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे. ७३ हजार ४३८ शेतकऱ्यांना या पिकाचा विमा मिळणार आहे. त्या खालोखाल कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या ७ हजार ७३३ एवढी आहे, अशी माहिती येथील विश्रामगृहावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे उपस्थित होते. (वार्ताहर)