शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याचे ३५ कोटी मिळाले

By admin | Updated: September 9, 2014 00:39 IST

सन २०१३ च्या खरिपातील पीक विम्यापोटी जिल्ह्याला ३४ कोटी ६८ लाख ६८ हजार १७० रुपये प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रक्कम जिल्ह्याला मिळाली. राज्यासाठी एकूण ८४ कोटी रुपये मिळाले आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक : शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम आॅनलाईन जमायवतमाळ : सन २०१३ च्या खरिपातील पीक विम्यापोटी जिल्ह्याला ३४ कोटी ६८ लाख ६८ हजार १७० रुपये प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रक्कम जिल्ह्याला मिळाली. राज्यासाठी एकूण ८४ कोटी रुपये मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम आॅनलाईन जमा केली जात आहे. जिल्ह्यातील सुमारे ९७ हजार ९०६ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना शासनाने गतवर्षी राबविली. पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून राबविलेल्या या योजनेच्या रकमेला काही दिवसांपूर्वीच मंजूरी मिळाली. प्रत्यक्षात रक्कम उपलब्ध झाली नव्हती. आता प्राप्त झालेल्या रकमेतून संबंधित शेतकऱ्यांना वितरण केले जात आहे. मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, कापूस, तूर या पिकांसाठी योजनेचा लाभ दिला जात आहे.जिल्ह्यात सर्वाधिक उमरखेड तालुक्यातील २९ हजार ७४९ शेतकऱ्यांना ९ कोटी ५२ लाख ८४० रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्या खालोखाल महागाव तालुक्याच्या १६ हजार १२ शेतकऱ्यांना २ कोटी ६० लाख ५८ हजार ८९१ रुपयांचे वाटप होणार आहे. दारव्हा तालुक्यातील १४ हजार ८५८ शेतकऱ्यांना ३ कोटी ८१ लाख ७५ हजार ९०४ तर आर्णी तालुक्यातील ११ हजार २४ शेतकऱ्यांना ७ कोटी २२ लाख १६ हजार ३८३ रुपयांचे वाटप होणार आहे.यवतमाळ तालुक्यातील ३ हजार ७३, कळंब ५ हजार २४१, राळेगाव ३ हजार ५७७, घाटंजी ४५५, नेर ५८१, बाभूळगाव ३ हजार ३९९, पुसद २ हजार ५१५, दिग्रस १ हजार ४१, पांढरकवडा ३ हजार ९०५, वणी १३२, मारेगाव २६४ आणि झरीजामणी तालुक्यातील २ हजार ८० शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. पीक विम्याचा सर्वाधिक लाभ घेणारे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे. ७३ हजार ४३८ शेतकऱ्यांना या पिकाचा विमा मिळणार आहे. त्या खालोखाल कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या ७ हजार ७३३ एवढी आहे, अशी माहिती येथील विश्रामगृहावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे उपस्थित होते. (वार्ताहर)