शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

३३७ शाळा बंदची प्रक्रिया सुरू

By admin | Updated: February 23, 2016 02:49 IST

कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळा बंद करण्याचा शासन निर्णय आॅगस्ट महिन्यात आल्यानंतर शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली

अविनाश साबापुरे ल्ल यवतमाळ कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळा बंद करण्याचा शासन निर्णय आॅगस्ट महिन्यात आल्यानंतर शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली होती. हा निर्णय स्थगित करण्यासाठीही बरेच प्रयत्न झाले. मात्र, विरोध अव्हेरून अखेर शासनाने या शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांची यादी शिक्षण आयुक्तांनी तातडीने मागविली असून पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. संचमान्यतेच्या निकषानुसार, आता २० पेक्षा कमी विद्यार्थी असणाऱ्या शाळांसाठी शिक्षक नेमण्यास शासन तयार नाही. त्यामुळे अशा शाळांतील शिक्षकांना इतरत्र हलविण्यात येणार आहे. तर तेथील विद्यार्थ्यांना जवळपासच्या दुसऱ्या शाळेत दाखल करण्यात येणार आहे. परिणामत: १ ते २० पर्यंत पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय २८ आॅगस्ट २०१५ रोजीच निर्गमित झाला होता. आता खुद्द शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी अशा शाळांची जंत्रीच लेखी स्वरुपात २६ फेब्रुवारीच्या आत मागविली आहे. त्यामुळे या शाळा बंद करण्याच्या कार्यवाहीला गती आलेली आहे. या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील तब्बल ३३७ शाळांना बसणार असून तेथील साधारण ६१८ शिक्षकांचे इतरत्र समायोजन करावे लागणार आहे. सध्या या ३३७ शाळांमधून गोरगरिबांची अडीच हजार मुले प्राथमिक शिक्षण घेत आहेत. त्यांना शासन जवळपासच्या दुसऱ्या गावातील शाळेत दाखल करून घेणार आहे. परंतु, बंद होणाऱ्या जिल्ह्यातील शेकडो शाळा तांडा, पोड अशा ठिकाणी आहेत. त्यातील बहुतांश ठिकाणी परिवहन महामंडळाची बसही पोहोचत नाही. कित्येक ठिकाणी तर जाण्या-येण्यासाठी रस्ताही नाही. अशा ठिकाणच्या विद्यार्थ्यांना शासनाने दुसऱ्या गावातील शाळेत न्यायचे म्हटले तरी त्रासदायक ठरणार आहे.प्रगत महाराष्ट्रासाठी गरिबांचा बळी२० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत शिक्षणाचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे, असे शिक्षण आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे. सध्या शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. त्यात या अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्याऐवजी अप्रगत शाळाच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कमी पटसंख्येच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही आयुक्तांनी म्हटले आहे. मात्र, हे दर्जेदार शिक्षण परगावातील शाळेतच मिळेल, असा जावईशोध लावण्यात आला आहे. मागास गावातील शाळांमध्ये सुविधा देण्याऐवजी या शाळाच आता बंद करण्यात येणार आहे.४कळंब ३५ ४मारेगाव ३३ ४झरी ३३ ४पांढरकवडा ३०४राळेगाव २९ ४वणी २८ ४घाटंजी २७४बाभूळगाव २६४यवतमाळ १८ ४पुसद १७ ४नेर १२ ४दारव्हा १२ ४महागाव ११ ४आर्णी १० ४उमरखेड १० ४दिग्रस ०६