शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

३२ हजार शेतकऱ्यांना पीक विम्यातून डच्चू

By admin | Updated: April 3, 2017 00:18 IST

नैसर्गिक आपत्तीत मदत मिळावी म्हणून जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांनी रबी पिकांचा विमा उतरविला.

अडीच कोटींचा लाभ : पाच हजार शेतकरी पात्र यवतमाळ : नैसर्गिक आपत्तीत मदत मिळावी म्हणून जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांनी रबी पिकांचा विमा उतरविला. मात्र केवळ पाच हजार शेतकरीच मदतीस पात्र ठरले. ३२ हजार शेतकऱ्यांना डच्चू देण्यात आला. राष्ट्रीय कृषी विमा कंपनीने रबीचा पीक विमा जाहीर केला. यात जिल्ह्यातील पाच हजार शेतकरी विमा मिळण्यास पात्र ठरले. त्यांना अडीच कोटींची मदत दिली जाणार आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, निसर्गाच्या लहरीपणातून पिकांना वाचविण्यासाठी २०१५-२०१६ मध्ये ३८ हजार ५२ शेतकऱ्यांनी रबी पिकांचा विमा उतरविला. त्यांनी ५२ कोटींचे पीक संरक्षीत केले होते. २०१५-२०१६ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला. यामुळे पीक विमा उतरविणारे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत होते. आता गहू, हरभरा व भुईमूगासाठी विम्याचा लाभ दिला जाणार आहे. गव्हाकरिता १० तालुके, हरभऱ्याकरिता केवळ दोन तालुके, तर भुईमूगासाठी एकाच तालुक्यातील शेतकरी पात्र ठरले. गहू पिकाकरिता तीन हजार ३८९ शेतकऱ्यांना २९३९ हेक्टरकरिता एक कोटी ४९ लाख १९ हजार ३०४ रूपयांची मदत मिळणार आहे. यात यवतमाळ, केळापूर, घाटंजी, वणी, मारेगाव, झरी, दिग्रस, नेर, आर्णी आणि पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. (शहर वार्ताहर) भुईमूगाकरिता तीन शेतकरी पात्र हरभऱ्याकरिता केळापूर आणि पुसद या दोनच तालुक्यातील दोन हजार ६९ शेतकऱ्यांना एक हजार ६७२ हेक्टरसाठी विमा दिला जाणार आहे. त्यांना ७५ लाख ४५ हजार ३९८ रूपये नुकसान भरपाई मिळणार आहे. भुईमूगाच्या विम्याकरिता केवळ तीन शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत. त्यांना एक लाख २६ हजार ८४० रूपयांचा विमा दावा मिळणार आहे.