शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

३२ हजार शेतकऱ्यांना पीक विम्यातून डच्चू

By admin | Updated: April 3, 2017 00:18 IST

नैसर्गिक आपत्तीत मदत मिळावी म्हणून जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांनी रबी पिकांचा विमा उतरविला.

अडीच कोटींचा लाभ : पाच हजार शेतकरी पात्र यवतमाळ : नैसर्गिक आपत्तीत मदत मिळावी म्हणून जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांनी रबी पिकांचा विमा उतरविला. मात्र केवळ पाच हजार शेतकरीच मदतीस पात्र ठरले. ३२ हजार शेतकऱ्यांना डच्चू देण्यात आला. राष्ट्रीय कृषी विमा कंपनीने रबीचा पीक विमा जाहीर केला. यात जिल्ह्यातील पाच हजार शेतकरी विमा मिळण्यास पात्र ठरले. त्यांना अडीच कोटींची मदत दिली जाणार आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, निसर्गाच्या लहरीपणातून पिकांना वाचविण्यासाठी २०१५-२०१६ मध्ये ३८ हजार ५२ शेतकऱ्यांनी रबी पिकांचा विमा उतरविला. त्यांनी ५२ कोटींचे पीक संरक्षीत केले होते. २०१५-२०१६ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला. यामुळे पीक विमा उतरविणारे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत होते. आता गहू, हरभरा व भुईमूगासाठी विम्याचा लाभ दिला जाणार आहे. गव्हाकरिता १० तालुके, हरभऱ्याकरिता केवळ दोन तालुके, तर भुईमूगासाठी एकाच तालुक्यातील शेतकरी पात्र ठरले. गहू पिकाकरिता तीन हजार ३८९ शेतकऱ्यांना २९३९ हेक्टरकरिता एक कोटी ४९ लाख १९ हजार ३०४ रूपयांची मदत मिळणार आहे. यात यवतमाळ, केळापूर, घाटंजी, वणी, मारेगाव, झरी, दिग्रस, नेर, आर्णी आणि पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. (शहर वार्ताहर) भुईमूगाकरिता तीन शेतकरी पात्र हरभऱ्याकरिता केळापूर आणि पुसद या दोनच तालुक्यातील दोन हजार ६९ शेतकऱ्यांना एक हजार ६७२ हेक्टरसाठी विमा दिला जाणार आहे. त्यांना ७५ लाख ४५ हजार ३९८ रूपये नुकसान भरपाई मिळणार आहे. भुईमूगाच्या विम्याकरिता केवळ तीन शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत. त्यांना एक लाख २६ हजार ८४० रूपयांचा विमा दावा मिळणार आहे.