शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
3
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
4
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
5
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
6
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
7
Gold Silver Price 10 September: मोठ्या तेजीनंतर सोन्या-चांदीचे दर आज घसरले; पाहा १४ ते २४ कॅरेटसाठी आता किती खर्च करावा लागणार
8
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
9
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
10
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
11
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
12
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
13
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
14
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
15
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
16
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
17
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
18
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
20
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?

‘माणुसमाऱ्या’ पुलाने घेतला ३० वा बळी

By admin | Updated: December 3, 2014 22:57 IST

माणूसमाऱ्या नावाने प्रसिद्ध असलेल्या येथील धावंडा नदीवरील पुलावरुन पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे बुधवारी उघडकीस आले. आतापर्यंत या पुलाने ३० बळी घेतले असून पुलावर सुरक्षा कठडे मात्र लावण्यात

सुनील हिरास - दिग्रस माणूसमाऱ्या नावाने प्रसिद्ध असलेल्या येथील धावंडा नदीवरील पुलावरुन पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे बुधवारी उघडकीस आले. आतापर्यंत या पुलाने ३० बळी घेतले असून पुलावर सुरक्षा कठडे मात्र लावण्यात आले नाहीत. दिग्रस शहराच्या मध्यवस्तीतून धावंडा नदी वाहते. या नदीवर मल्लिकार्जून संस्थान आणि शनिमंदिर या दोन मंदिराच्यामध्ये एक पूल आहे. देवदर्शन सुलभ व्हावे यासाठी २३ वर्षापूर्वी या पुलाची निर्मिती करण्यात आली. अत्यंत वर्दळीचा हा पूल अरुंद आहे. या पुलावरून केवळ पादचाऱ्यांना जाता येते. कोणतीही दुचाकी अथवा तीनचाकी वाहन जाऊ शकत नाही. विशेष म्हणजे या पुलाखाली अशुद्ध पाणी आणि गाळ आहे. पुलावरून पाण्यात पडलेला माणूस बाहेर येऊ शकत नाही. हा धोकादायक पूल गेल्या कित्येक वर्षांपासून त्याच स्थितीत आहे. या पुलावरून पडून आजपर्यंत अनेकांना आपला प्राण गमवावा लागला. त्यामुळे या पुलाला दिग्रसमध्ये माणूसमाऱ्या पूल म्हणूनच ओळखले जाते. अरुणावती धरणाचे बॅक वॉटर या पुलाखाली स्थिरावले आहे. त्यामुळे येथे पाण्याची खोली वाढली आहे. तसेच शहरातील संपूर्ण सांडपाणी याच नदीत सोडण्यात येते. मंगळवारी दुपारी तीन युवक संभाजीनगर येथे आपल्या घराकडे जात होते. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पूल पार करताना ईश्वर दत्ता चौधरी हा या पुलावरून खाली पडला. त्याच्या सोबत असलेल्या तरुणाने त्याला वाचविण्यासाठी उडी घेतली. परंतु ईश्वरचा थांगपत्ता लागला नाही. अखेर बुधवारी सकाळी ८ वाजता ईश्वर चौधरीचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळून आले. सदर तरुणाने आत्महत्या केली की अपघात आहे, यावरून शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे याच पुलावरून १२ वर्षापूर्वी उडी घेऊन ईश्वरचे वडील दत्ता टेलर यांनीही आत्महत्या केली होती.माणूसमाऱ्या पुलाने ईश्वरचा घेतला बळी हा तिसावा आहे. यापूर्वी या पुलावरून पडून अथवा उडी घेऊन मृत्यू झाले आहे. पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही सोईसुविधा नाही. तसेच या पुलाची दुरुस्तीही केली जात नाही. आणखी किती बळी गेल्यावर हा पूल दुरुस्त होईल असे दिग्रसकर विचारत आहे.