शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

‘माणुसमाऱ्या’ पुलाने घेतला ३० वा बळी

By admin | Updated: December 3, 2014 22:57 IST

माणूसमाऱ्या नावाने प्रसिद्ध असलेल्या येथील धावंडा नदीवरील पुलावरुन पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे बुधवारी उघडकीस आले. आतापर्यंत या पुलाने ३० बळी घेतले असून पुलावर सुरक्षा कठडे मात्र लावण्यात

सुनील हिरास - दिग्रस माणूसमाऱ्या नावाने प्रसिद्ध असलेल्या येथील धावंडा नदीवरील पुलावरुन पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे बुधवारी उघडकीस आले. आतापर्यंत या पुलाने ३० बळी घेतले असून पुलावर सुरक्षा कठडे मात्र लावण्यात आले नाहीत. दिग्रस शहराच्या मध्यवस्तीतून धावंडा नदी वाहते. या नदीवर मल्लिकार्जून संस्थान आणि शनिमंदिर या दोन मंदिराच्यामध्ये एक पूल आहे. देवदर्शन सुलभ व्हावे यासाठी २३ वर्षापूर्वी या पुलाची निर्मिती करण्यात आली. अत्यंत वर्दळीचा हा पूल अरुंद आहे. या पुलावरून केवळ पादचाऱ्यांना जाता येते. कोणतीही दुचाकी अथवा तीनचाकी वाहन जाऊ शकत नाही. विशेष म्हणजे या पुलाखाली अशुद्ध पाणी आणि गाळ आहे. पुलावरून पाण्यात पडलेला माणूस बाहेर येऊ शकत नाही. हा धोकादायक पूल गेल्या कित्येक वर्षांपासून त्याच स्थितीत आहे. या पुलावरून पडून आजपर्यंत अनेकांना आपला प्राण गमवावा लागला. त्यामुळे या पुलाला दिग्रसमध्ये माणूसमाऱ्या पूल म्हणूनच ओळखले जाते. अरुणावती धरणाचे बॅक वॉटर या पुलाखाली स्थिरावले आहे. त्यामुळे येथे पाण्याची खोली वाढली आहे. तसेच शहरातील संपूर्ण सांडपाणी याच नदीत सोडण्यात येते. मंगळवारी दुपारी तीन युवक संभाजीनगर येथे आपल्या घराकडे जात होते. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पूल पार करताना ईश्वर दत्ता चौधरी हा या पुलावरून खाली पडला. त्याच्या सोबत असलेल्या तरुणाने त्याला वाचविण्यासाठी उडी घेतली. परंतु ईश्वरचा थांगपत्ता लागला नाही. अखेर बुधवारी सकाळी ८ वाजता ईश्वर चौधरीचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळून आले. सदर तरुणाने आत्महत्या केली की अपघात आहे, यावरून शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे याच पुलावरून १२ वर्षापूर्वी उडी घेऊन ईश्वरचे वडील दत्ता टेलर यांनीही आत्महत्या केली होती.माणूसमाऱ्या पुलाने ईश्वरचा घेतला बळी हा तिसावा आहे. यापूर्वी या पुलावरून पडून अथवा उडी घेऊन मृत्यू झाले आहे. पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही सोईसुविधा नाही. तसेच या पुलाची दुरुस्तीही केली जात नाही. आणखी किती बळी गेल्यावर हा पूल दुरुस्त होईल असे दिग्रसकर विचारत आहे.