शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

‘माणुसमाऱ्या’ पुलाने घेतला ३० वा बळी

By admin | Updated: December 3, 2014 22:57 IST

माणूसमाऱ्या नावाने प्रसिद्ध असलेल्या येथील धावंडा नदीवरील पुलावरुन पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे बुधवारी उघडकीस आले. आतापर्यंत या पुलाने ३० बळी घेतले असून पुलावर सुरक्षा कठडे मात्र लावण्यात

सुनील हिरास - दिग्रस माणूसमाऱ्या नावाने प्रसिद्ध असलेल्या येथील धावंडा नदीवरील पुलावरुन पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे बुधवारी उघडकीस आले. आतापर्यंत या पुलाने ३० बळी घेतले असून पुलावर सुरक्षा कठडे मात्र लावण्यात आले नाहीत. दिग्रस शहराच्या मध्यवस्तीतून धावंडा नदी वाहते. या नदीवर मल्लिकार्जून संस्थान आणि शनिमंदिर या दोन मंदिराच्यामध्ये एक पूल आहे. देवदर्शन सुलभ व्हावे यासाठी २३ वर्षापूर्वी या पुलाची निर्मिती करण्यात आली. अत्यंत वर्दळीचा हा पूल अरुंद आहे. या पुलावरून केवळ पादचाऱ्यांना जाता येते. कोणतीही दुचाकी अथवा तीनचाकी वाहन जाऊ शकत नाही. विशेष म्हणजे या पुलाखाली अशुद्ध पाणी आणि गाळ आहे. पुलावरून पाण्यात पडलेला माणूस बाहेर येऊ शकत नाही. हा धोकादायक पूल गेल्या कित्येक वर्षांपासून त्याच स्थितीत आहे. या पुलावरून पडून आजपर्यंत अनेकांना आपला प्राण गमवावा लागला. त्यामुळे या पुलाला दिग्रसमध्ये माणूसमाऱ्या पूल म्हणूनच ओळखले जाते. अरुणावती धरणाचे बॅक वॉटर या पुलाखाली स्थिरावले आहे. त्यामुळे येथे पाण्याची खोली वाढली आहे. तसेच शहरातील संपूर्ण सांडपाणी याच नदीत सोडण्यात येते. मंगळवारी दुपारी तीन युवक संभाजीनगर येथे आपल्या घराकडे जात होते. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पूल पार करताना ईश्वर दत्ता चौधरी हा या पुलावरून खाली पडला. त्याच्या सोबत असलेल्या तरुणाने त्याला वाचविण्यासाठी उडी घेतली. परंतु ईश्वरचा थांगपत्ता लागला नाही. अखेर बुधवारी सकाळी ८ वाजता ईश्वर चौधरीचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळून आले. सदर तरुणाने आत्महत्या केली की अपघात आहे, यावरून शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे याच पुलावरून १२ वर्षापूर्वी उडी घेऊन ईश्वरचे वडील दत्ता टेलर यांनीही आत्महत्या केली होती.माणूसमाऱ्या पुलाने ईश्वरचा घेतला बळी हा तिसावा आहे. यापूर्वी या पुलावरून पडून अथवा उडी घेऊन मृत्यू झाले आहे. पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही सोईसुविधा नाही. तसेच या पुलाची दुरुस्तीही केली जात नाही. आणखी किती बळी गेल्यावर हा पूल दुरुस्त होईल असे दिग्रसकर विचारत आहे.