शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

‘माणुसमाऱ्या’ पुलाने घेतला ३० वा बळी

By admin | Updated: December 3, 2014 22:57 IST

माणूसमाऱ्या नावाने प्रसिद्ध असलेल्या येथील धावंडा नदीवरील पुलावरुन पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे बुधवारी उघडकीस आले. आतापर्यंत या पुलाने ३० बळी घेतले असून पुलावर सुरक्षा कठडे मात्र लावण्यात

सुनील हिरास - दिग्रस माणूसमाऱ्या नावाने प्रसिद्ध असलेल्या येथील धावंडा नदीवरील पुलावरुन पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे बुधवारी उघडकीस आले. आतापर्यंत या पुलाने ३० बळी घेतले असून पुलावर सुरक्षा कठडे मात्र लावण्यात आले नाहीत. दिग्रस शहराच्या मध्यवस्तीतून धावंडा नदी वाहते. या नदीवर मल्लिकार्जून संस्थान आणि शनिमंदिर या दोन मंदिराच्यामध्ये एक पूल आहे. देवदर्शन सुलभ व्हावे यासाठी २३ वर्षापूर्वी या पुलाची निर्मिती करण्यात आली. अत्यंत वर्दळीचा हा पूल अरुंद आहे. या पुलावरून केवळ पादचाऱ्यांना जाता येते. कोणतीही दुचाकी अथवा तीनचाकी वाहन जाऊ शकत नाही. विशेष म्हणजे या पुलाखाली अशुद्ध पाणी आणि गाळ आहे. पुलावरून पाण्यात पडलेला माणूस बाहेर येऊ शकत नाही. हा धोकादायक पूल गेल्या कित्येक वर्षांपासून त्याच स्थितीत आहे. या पुलावरून पडून आजपर्यंत अनेकांना आपला प्राण गमवावा लागला. त्यामुळे या पुलाला दिग्रसमध्ये माणूसमाऱ्या पूल म्हणूनच ओळखले जाते. अरुणावती धरणाचे बॅक वॉटर या पुलाखाली स्थिरावले आहे. त्यामुळे येथे पाण्याची खोली वाढली आहे. तसेच शहरातील संपूर्ण सांडपाणी याच नदीत सोडण्यात येते. मंगळवारी दुपारी तीन युवक संभाजीनगर येथे आपल्या घराकडे जात होते. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पूल पार करताना ईश्वर दत्ता चौधरी हा या पुलावरून खाली पडला. त्याच्या सोबत असलेल्या तरुणाने त्याला वाचविण्यासाठी उडी घेतली. परंतु ईश्वरचा थांगपत्ता लागला नाही. अखेर बुधवारी सकाळी ८ वाजता ईश्वर चौधरीचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळून आले. सदर तरुणाने आत्महत्या केली की अपघात आहे, यावरून शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे याच पुलावरून १२ वर्षापूर्वी उडी घेऊन ईश्वरचे वडील दत्ता टेलर यांनीही आत्महत्या केली होती.माणूसमाऱ्या पुलाने ईश्वरचा घेतला बळी हा तिसावा आहे. यापूर्वी या पुलावरून पडून अथवा उडी घेऊन मृत्यू झाले आहे. पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही सोईसुविधा नाही. तसेच या पुलाची दुरुस्तीही केली जात नाही. आणखी किती बळी गेल्यावर हा पूल दुरुस्त होईल असे दिग्रसकर विचारत आहे.