शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

राज्यातील ३०७ कृषी उत्पन्न बाजार समित्या २१ ऑगस्ट रोजी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 16:07 IST

राज्यभरातील ३०७ कृषी उत्पन्न बाजार समित्या व ६१५ उपबाजार समित्यांनी शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देनव्या कायद्याला विरोध ‘एपीएमसी’च्या अस्तित्वावरच गदा, शेतकऱ्यांचेही नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे व्यापार आणि व्यवहार (प्रचलन व सुविधा) अध्यादेश २०२० ची अंमलबजावणी राज्यात केली जात आहे. हा कायदा शेतकरी व बाजार समित्यांच्या जीवावर उठणारा असल्याचे सांगत राज्यभरातील ३०७ कृषी उत्पन्न बाजार समित्या व ६१५ उपबाजार समित्यांनी शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा जिल्ह्यातील कळंब बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ‘कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यापाऱ्यांवरील नियंत्रण संपुष्टात’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १२ ऑगस्ट रोजी सर्व प्रथम वृत्त प्रकाशित करून या नव्या कायद्याकडे राज्यभरातील सहकार, पणन क्षेत्र व शेतकऱ्यांचे लक्ष वेधले होते. या नव्या कायद्यामुळे शासन खेडा खरेदीला प्रोत्साहन देत असून त्यातून शेतकऱ्यांची प्रचंड लूट होण्याची तसेच बाजार समित्यांचे अस्तित्वच धोक्यात येण्याची भीती वृत्तात वर्तविली होती.

‘लोकमत’च्या वृत्तानंतर राज्यभरातील सहकार क्षेत्र, बाजार समित्यांचे पदाधिकारी, संचालक, कर्मचारी व शेतकरी जागृत झाले. त्यांनीही या कायद्याच्या अंमलबजावणीला तीव्र विरोध दर्शविला आहे. या कायद्याची राज्यात अंमलबजावणी करू नये अशी मागणी राज्य सरकारकडे केली जात आहे.

कायद्यातील अटी अत्यंत जाचकहा नवा कायदा कसा अन्यायकारक आहे, याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्यातील अटी अत्यंत जाचक आहे, शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्या बाजार समित्या अडचणीत येणार आहे. हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाहीच हे सरकारला पटवून देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी भविष्यातही आणखी वेगवेगळ्या टप्प्यावर व नव्या स्वरूपात आंदोलने केली जाणार असल्याचे प्रवीण देशमुख यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :agricultureशेती