शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ३०७ कृषी उत्पन्न बाजार समित्या २१ ऑगस्ट रोजी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 16:07 IST

राज्यभरातील ३०७ कृषी उत्पन्न बाजार समित्या व ६१५ उपबाजार समित्यांनी शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देनव्या कायद्याला विरोध ‘एपीएमसी’च्या अस्तित्वावरच गदा, शेतकऱ्यांचेही नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे व्यापार आणि व्यवहार (प्रचलन व सुविधा) अध्यादेश २०२० ची अंमलबजावणी राज्यात केली जात आहे. हा कायदा शेतकरी व बाजार समित्यांच्या जीवावर उठणारा असल्याचे सांगत राज्यभरातील ३०७ कृषी उत्पन्न बाजार समित्या व ६१५ उपबाजार समित्यांनी शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा जिल्ह्यातील कळंब बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ‘कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यापाऱ्यांवरील नियंत्रण संपुष्टात’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १२ ऑगस्ट रोजी सर्व प्रथम वृत्त प्रकाशित करून या नव्या कायद्याकडे राज्यभरातील सहकार, पणन क्षेत्र व शेतकऱ्यांचे लक्ष वेधले होते. या नव्या कायद्यामुळे शासन खेडा खरेदीला प्रोत्साहन देत असून त्यातून शेतकऱ्यांची प्रचंड लूट होण्याची तसेच बाजार समित्यांचे अस्तित्वच धोक्यात येण्याची भीती वृत्तात वर्तविली होती.

‘लोकमत’च्या वृत्तानंतर राज्यभरातील सहकार क्षेत्र, बाजार समित्यांचे पदाधिकारी, संचालक, कर्मचारी व शेतकरी जागृत झाले. त्यांनीही या कायद्याच्या अंमलबजावणीला तीव्र विरोध दर्शविला आहे. या कायद्याची राज्यात अंमलबजावणी करू नये अशी मागणी राज्य सरकारकडे केली जात आहे.

कायद्यातील अटी अत्यंत जाचकहा नवा कायदा कसा अन्यायकारक आहे, याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्यातील अटी अत्यंत जाचक आहे, शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्या बाजार समित्या अडचणीत येणार आहे. हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाहीच हे सरकारला पटवून देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी भविष्यातही आणखी वेगवेगळ्या टप्प्यावर व नव्या स्वरूपात आंदोलने केली जाणार असल्याचे प्रवीण देशमुख यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :agricultureशेती