शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

मागील वर्षीच्या तुलनेत ३०० मि.मी. पाऊस कमी

By admin | Updated: July 5, 2014 01:40 IST

रोहिणी बरसला नाही, मृग कोरडा गेला. आर्द्राही जवळपास कोरडा गेला.

पुसद : रोहिणी बरसला नाही, मृग कोरडा गेला. आर्द्राही जवळपास कोरडा गेला. सुरुवातीचे तीनही नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातातून जाण्यातच जमा आहे. मागील वर्षी जून महिन्यात पूस धरण ओव्हरफ्लो झाले होते. यावर्षी जुलै उजाडला तरी पूस धरणात केवळ १८ टक्केच पाणीसाठा आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळाचे चिन्ह दिसू लागले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आत्तापर्यंत तब्बल ३५० मि.मी. पाऊस कमी पडला आहे. सध्या तालुक्यात भर पावसाळ्यात भीषण पाणींटंचाई निर्माण झाली असून पाच गावांना आजही टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. उन्हाळ्यात धो-धो कासळलेल्या पावसाने आता पावसाळ्यातील तिनही नक्षत्रे कोरडे गेल्याने तालुक्यात दुष्काळाची चिन्हे दिसू लागली आहेत. यावर्षी फेब्रुवारी ते १५ मे या कालावधीत कधी नव्हे तो प्रचंड पाऊस व गारपीट झाली. मोठ्या प्रमाणात झालेल्या या गारपिटीने रबी हंगाम वाया गेला. उन्हाळ्यात शेतकऱ्यांचा कर्दनकाळ ठरलेल्या या पावसाने पावसाळ्यात मात्र चांगलीच दडी मारली आहे. जिल्ह्यात सरासरी ८१३ मि.मी. एवढा पाऊस पावसाळ्यात पडतो. मागील वर्षी जून महिन्यातच पुसद तालुक्यातील पूस धरणासह गाव तलाव, शेततळे, वनतळे, विहिरी, इंधन विहिरी व अन्य पेयजलांचे स्रोत तुडुंब भरले होते. यावर्षी मात्र अद्यापही पावसाने पाहिजे तशी हजेरी न लावल्याने पाण्याचे स्रोत कोरडे पडले आहेत. मागील वर्षी १४ जून रोजी ओव्हरफ्लो झालेले पूस धरणात यावर्षी केवळ १८ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. पुसद तालुक्यात काऱ्होळ, अनसिंग, उल्हासवाडी, म्हैसमाळ, नारवाडी या पाच गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अनेक ठिकाणच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांनाही आता घरघर लागली आहे. गांभीर्याची बाब म्हणजे काही ठिकाणी पाणी मिळणेही दुरापास्त झाले आहे. यातच जून संपला तरी सुद्धा पाऊस न आल्याने अनेकांनी स्थलांतरण केले आहे. प्रशासनाने तलावामध्ये असलेले पाणी पिण्यासाठी राखीव ठेवलेले आहे. मजुरांना रोजगार नाही. शेतकऱ्यांचीही आर्थिक स्थिती बिघडली आहे. याचा सर्व परिणाम बाजारपेठेतील देवानघेवानीवर झाला आहे. बाजारपेठा ठप्प पडल्या आहे. शाळा-महाविद्यालयांना सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांचे महागडे साहित्य कसे खरेदी करावे, याची काळजी शेतकरी, शेतमजूर यांना पडली आहे. बियाण्यांसाठी तजवीज करावी की मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवावा या विवंचनेत शेतकरी सध्या सापडला आहे. (तालुका प्रतिनिधी)