शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मागील वर्षीच्या तुलनेत ३०० मि.मी. पाऊस कमी

By admin | Updated: July 5, 2014 01:40 IST

रोहिणी बरसला नाही, मृग कोरडा गेला. आर्द्राही जवळपास कोरडा गेला.

पुसद : रोहिणी बरसला नाही, मृग कोरडा गेला. आर्द्राही जवळपास कोरडा गेला. सुरुवातीचे तीनही नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातातून जाण्यातच जमा आहे. मागील वर्षी जून महिन्यात पूस धरण ओव्हरफ्लो झाले होते. यावर्षी जुलै उजाडला तरी पूस धरणात केवळ १८ टक्केच पाणीसाठा आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळाचे चिन्ह दिसू लागले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आत्तापर्यंत तब्बल ३५० मि.मी. पाऊस कमी पडला आहे. सध्या तालुक्यात भर पावसाळ्यात भीषण पाणींटंचाई निर्माण झाली असून पाच गावांना आजही टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. उन्हाळ्यात धो-धो कासळलेल्या पावसाने आता पावसाळ्यातील तिनही नक्षत्रे कोरडे गेल्याने तालुक्यात दुष्काळाची चिन्हे दिसू लागली आहेत. यावर्षी फेब्रुवारी ते १५ मे या कालावधीत कधी नव्हे तो प्रचंड पाऊस व गारपीट झाली. मोठ्या प्रमाणात झालेल्या या गारपिटीने रबी हंगाम वाया गेला. उन्हाळ्यात शेतकऱ्यांचा कर्दनकाळ ठरलेल्या या पावसाने पावसाळ्यात मात्र चांगलीच दडी मारली आहे. जिल्ह्यात सरासरी ८१३ मि.मी. एवढा पाऊस पावसाळ्यात पडतो. मागील वर्षी जून महिन्यातच पुसद तालुक्यातील पूस धरणासह गाव तलाव, शेततळे, वनतळे, विहिरी, इंधन विहिरी व अन्य पेयजलांचे स्रोत तुडुंब भरले होते. यावर्षी मात्र अद्यापही पावसाने पाहिजे तशी हजेरी न लावल्याने पाण्याचे स्रोत कोरडे पडले आहेत. मागील वर्षी १४ जून रोजी ओव्हरफ्लो झालेले पूस धरणात यावर्षी केवळ १८ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. पुसद तालुक्यात काऱ्होळ, अनसिंग, उल्हासवाडी, म्हैसमाळ, नारवाडी या पाच गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अनेक ठिकाणच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांनाही आता घरघर लागली आहे. गांभीर्याची बाब म्हणजे काही ठिकाणी पाणी मिळणेही दुरापास्त झाले आहे. यातच जून संपला तरी सुद्धा पाऊस न आल्याने अनेकांनी स्थलांतरण केले आहे. प्रशासनाने तलावामध्ये असलेले पाणी पिण्यासाठी राखीव ठेवलेले आहे. मजुरांना रोजगार नाही. शेतकऱ्यांचीही आर्थिक स्थिती बिघडली आहे. याचा सर्व परिणाम बाजारपेठेतील देवानघेवानीवर झाला आहे. बाजारपेठा ठप्प पडल्या आहे. शाळा-महाविद्यालयांना सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांचे महागडे साहित्य कसे खरेदी करावे, याची काळजी शेतकरी, शेतमजूर यांना पडली आहे. बियाण्यांसाठी तजवीज करावी की मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवावा या विवंचनेत शेतकरी सध्या सापडला आहे. (तालुका प्रतिनिधी)