शहरं
Join us  
Trending Stories
1
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
2
Shiv Sena MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
3
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
4
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
5
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
6
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
7
Uddhav- Raj Thackeray PC: थोड्याच वेळात उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार; पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष
8
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
9
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
10
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
11
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
12
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
13
शेतकरी ते नोकरदार... बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत 'हे' ८ नियम १ जानेवारीपासून बदलणार
14
शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर
15
नमो भारत ट्रेनमधील 'तो' अश्लील चाळा पडणार महागात! तरुण-तरुणीवर FIR; किती शिक्षा होणार?
16
अगदी बाबाची कॉपी! वडिलांसारखीच हँडसम आहेत हृतिकची मुलं, हृदान-हृहानचे डान्स मूव्ह्ज पाहून चाहते प्रेमात
17
सुधीर मुनंगटीवार यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले, नाराजी दूर होणार?
18
अमेरिकेत 'एपस्टीन फाइल्स'चा महास्फोट! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'तसले' गंभीर आरोप; रिपोर्टने खळबळ
19
इंडिगोची 'दादागिरी' आता चालणार नाही; सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना दाखवला हिरवा कंदील
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ सुरुच, आज किती आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट रेट?
Daily Top 2Weekly Top 5

मागील वर्षीच्या तुलनेत ३०० मि.मी. पाऊस कमी

By admin | Updated: July 5, 2014 01:40 IST

रोहिणी बरसला नाही, मृग कोरडा गेला. आर्द्राही जवळपास कोरडा गेला.

पुसद : रोहिणी बरसला नाही, मृग कोरडा गेला. आर्द्राही जवळपास कोरडा गेला. सुरुवातीचे तीनही नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातातून जाण्यातच जमा आहे. मागील वर्षी जून महिन्यात पूस धरण ओव्हरफ्लो झाले होते. यावर्षी जुलै उजाडला तरी पूस धरणात केवळ १८ टक्केच पाणीसाठा आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळाचे चिन्ह दिसू लागले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आत्तापर्यंत तब्बल ३५० मि.मी. पाऊस कमी पडला आहे. सध्या तालुक्यात भर पावसाळ्यात भीषण पाणींटंचाई निर्माण झाली असून पाच गावांना आजही टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. उन्हाळ्यात धो-धो कासळलेल्या पावसाने आता पावसाळ्यातील तिनही नक्षत्रे कोरडे गेल्याने तालुक्यात दुष्काळाची चिन्हे दिसू लागली आहेत. यावर्षी फेब्रुवारी ते १५ मे या कालावधीत कधी नव्हे तो प्रचंड पाऊस व गारपीट झाली. मोठ्या प्रमाणात झालेल्या या गारपिटीने रबी हंगाम वाया गेला. उन्हाळ्यात शेतकऱ्यांचा कर्दनकाळ ठरलेल्या या पावसाने पावसाळ्यात मात्र चांगलीच दडी मारली आहे. जिल्ह्यात सरासरी ८१३ मि.मी. एवढा पाऊस पावसाळ्यात पडतो. मागील वर्षी जून महिन्यातच पुसद तालुक्यातील पूस धरणासह गाव तलाव, शेततळे, वनतळे, विहिरी, इंधन विहिरी व अन्य पेयजलांचे स्रोत तुडुंब भरले होते. यावर्षी मात्र अद्यापही पावसाने पाहिजे तशी हजेरी न लावल्याने पाण्याचे स्रोत कोरडे पडले आहेत. मागील वर्षी १४ जून रोजी ओव्हरफ्लो झालेले पूस धरणात यावर्षी केवळ १८ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. पुसद तालुक्यात काऱ्होळ, अनसिंग, उल्हासवाडी, म्हैसमाळ, नारवाडी या पाच गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अनेक ठिकाणच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांनाही आता घरघर लागली आहे. गांभीर्याची बाब म्हणजे काही ठिकाणी पाणी मिळणेही दुरापास्त झाले आहे. यातच जून संपला तरी सुद्धा पाऊस न आल्याने अनेकांनी स्थलांतरण केले आहे. प्रशासनाने तलावामध्ये असलेले पाणी पिण्यासाठी राखीव ठेवलेले आहे. मजुरांना रोजगार नाही. शेतकऱ्यांचीही आर्थिक स्थिती बिघडली आहे. याचा सर्व परिणाम बाजारपेठेतील देवानघेवानीवर झाला आहे. बाजारपेठा ठप्प पडल्या आहे. शाळा-महाविद्यालयांना सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांचे महागडे साहित्य कसे खरेदी करावे, याची काळजी शेतकरी, शेतमजूर यांना पडली आहे. बियाण्यांसाठी तजवीज करावी की मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवावा या विवंचनेत शेतकरी सध्या सापडला आहे. (तालुका प्रतिनिधी)