शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

एसबीआयचे २८ लाख घेऊन कर्मचारी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 06:00 IST

इपीएस-लाँजी कॅश सोल्यूशन प्रा.लि. या कंपनीत तो कार्यरत होता. या कंपनीकडे स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे टाकण्याचे कंत्राट आहे. या कंत्राटी कंपनीअंतर्गत संतोष रामचंद्र वाटेकर, उज्ज्वल अरूण बर्वे व गुरूदेव महादेव चिडे हे कर्मचारी कार्यरत आहेत. हे कर्मचारी स्टेट बँकेअंतर्गत येणाऱ्या वणी परिसरातील सहा एटीएममध्ये पैसे भरतात.

ठळक मुद्देएटीएमची रक्कम। वणीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवणी (यवतमाळ) : स्टेट बँकेच्या एटीएममध्ये टाकण्यासाठी दिलेली २८ लाख रूपयांची रक्कम घेऊन एका खासगी कंपनीचा कर्मचारी फरार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. संतोष रामचंद्र वाटेकर (३५) असे आरोपीचे नाव असून तो वणीतील विठ्ठलवाडी परिसरातील रहिवासी आहे.इपीएस-लाँजी कॅश सोल्यूशन प्रा.लि. या कंपनीत तो कार्यरत होता. या कंपनीकडे स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे टाकण्याचे कंत्राट आहे. या कंत्राटी कंपनीअंतर्गत संतोष रामचंद्र वाटेकर, उज्ज्वल अरूण बर्वे व गुरूदेव महादेव चिडे हे कर्मचारी कार्यरत आहेत. हे कर्मचारी स्टेट बँकेअंतर्गत येणाऱ्या वणी परिसरातील सहा एटीएममध्ये पैसे भरतात. एटीएममध्ये भरलेल्या पैशाची खात्री करण्याची जबाबदारी वणीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतील कॅश ऑफिसर व अकाउंंटंट यांच्यावर आहे. २० फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास स्टेट बँकेचे कॅश ऑफिसर मनिष गणवीर यांनी इपीएस-लाँजी कॅश सोल्यूशन प्रा.लि.या कंपनीचे कर्मचारी संतोष वाटेकर, गुरूदेव चिडे व उज्ज्वल बर्वे या तिघांना ८३ लाख रूपयांची रक्कम एटीएममध्ये भरण्यासाठी दिली. यापैकी गुरूदेव चिडे व उज्ज्वल बर्वे या दोघांनी वणी परिसरातील वेगवेगळ्या चार एटीएममध्ये ५५ लाख रूपये भरले. नायगाव व मारेगाव येथील एटीएममध्ये २८ लाख रूपये भरण्यासाठी संतोष वाटेकर हा सदर रक्कम घेऊन सायंकाळी ६ वाजता रवाना झाला. तेव्हापासून तो अद्यापही बेपत्ता आहे. त्याचा मोबाईलदेखील बंद आहे. याप्रकरणी स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक रवींद्र तुकाराम बरगी यांनी वणी पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष वाटेकर याच्याविरूद्ध भादंवि ४०८ अन्वये गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे.एटीएमची सुरक्षा वादाचा विषयएटीएममध्ये भरण्यासाठी दिलेली रोख रक्कम कर्मचाऱ्याने परस्पर उडविल्याचा हा प्रकार जिल्हाभरात चर्चेत आहे. मात्र वणीसह जिल्हाभरातीलच एटीएम सेंटरची सुरक्षा सतत वादाचा विषय ठरत आहे. या केंद्रांवर सुरक्षा रक्षक तैनात असले तरी खासगी एजंसीमार्फत नेमलेले हे रक्षक अनेकदा गैरहजर आढळतात. आता तर चक्क ज्यांच्या ताब्यात रोख दिली जाते, तेच बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. एटीएमची सुरक्षा वाढविण्याची गरज आहे.

टॅग्स :atmएटीएमSBIएसबीआय