शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

महागावातील २८ सोसायट्या पाच कोटींनी तोट्यात

By admin | Updated: June 21, 2014 02:13 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या धोरणाचा फटका ग्राम विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना बसत आहे.

रितेश पुरोहित महागावजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या धोरणाचा फटका ग्राम विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना बसत आहे. शेतकऱ्यांकडून वसूल झालेले कर्ज सोसायट्यांच्या थकीत कर्जात वळते केले जात असल्याने सोसायट्यांवर कर्जाचा डोंगर उभा आहे. तर बैद्यनाथ समितीच्या शिफारशीनुसार मिळालेल्या अनुदानानंतरही महागाव तालुक्यातील २८ सोसायट्या पाच कोटीने तोट्या आहे.महागाव तालुक्यातील २८ ग्राम विविध सहकारी सोसायच्या आहेत. या सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जिल्हा बँकेतून कर्ज पुरवठा केला जातो. परंतु विविध धोरणांमुळे महागाव तालुक्यातील सोसायट्या कर्जबाजारी झाल्या आहेत. राज्यातील सोसायट्यांचे पुनर्जिवन करण्यासाठी बैद्यनाथन समिती गठित करण्यात आली. या समितीने अहवाल दिला. त्यावरून महागाव तालुक्यातील साडेआठ कोटी रुपये अनुदान मिळाले. मात्र सदर रक्कम जिल्हा बँकेने सोसायट्यांना न देता कर्ज खात्यातच वळती केली. त्यामुळे सोसायट्यांना कवडीचाही फायदा झाला नाही. तालुक्यातील खडका सोसायटी ३० लाख, पोहंडूळ सोसायटी ४० लाख, हिवरा सोसायटी ४० लाख व इतर सोसायट्याही लाखो रुपयांनी तोट्यात आहे. मात्र जिल्हा बँकेचे धोरण मारक ठरत आहे.जिल्हा बँकेतून शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. एक लाखापर्यंत शून्य टक्के व्याज दर तर तीन लाखापर्यंत दोन टक्के व्याज दराने कर्ज दिले जाते. शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज मार्च महिन्यात फेडल्यानंतर शेतकऱ्यांना निलचा दाखला मिळतो. तसेच नवीन कर्जासाठी तो पात्र ठरतो. परंतु जिल्हा बँक सोसायट्यांकडे असलेल्या जुन्या कर्जातच ही रक्कम वळती करते. शेतकऱ्यांच्या खात्यात रकम जमा न होता सोसायटीच्या थकीत कर्जात जमा होते. विशेष म्हणजे थकीत कर्जावर १३ टक्के व्याज दर लावला जातो. या व्याजाचा फटका सोसायट्यांना बसतो. त्यातूनच सोसायट्या तोट्यात गेल्या आहे. शेतकऱ्यांचा पैसा सरळ शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात जमा केल्यास सोसायट्या आणि शेतकऱ्यांनाही फायदा होतो. परंतु जिल्हा बँकेचे उफराटे धोरण शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे.महागाव तालुक्यात जिल्हा बँकेच्या सहा शाखा आहेत. ७५ टक्के शेतकऱ्यांना सोसायटीच्या माध्यमातून जिल्हा बँक कर्ज देते. तालुक्यात ३५ हजार शेतकरी आहे. परंतु सोसायट्या मात्र आता डबघाईस आल्या आहेत. बैद्यनाथन समितीने केलेल्या शिफारशी स्वीकारल्यास सोसायट्यांना आर्थिक बळकटी मिळू शकते. अन्यथा ग्रामीण पत पुरवठ्याचा कणा असलेल्या या सोसायट्या कायमच्या बंद होऊ शकतात.