शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

२७ लाख नागरिक ‘आधार’च्या कक्षेत

By admin | Updated: May 16, 2017 01:28 IST

शासनाच्या विविध योजना व इतर सर्व महत्वपूर्ण कामांसाठी ‘आधार’ कार्ड आता अनिवार्य झाले आहे.

आॅनलाईन मदत : जिल्ह्यातील कार्यरत केंद्रांची यादी संकेतस्थळावर, आणखी दोन लाख नागरिकांना हवा आधारसुहास सुपासे । लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाच्या विविध योजना व इतर सर्व महत्वपूर्ण कामांसाठी ‘आधार’ कार्ड आता अनिवार्य झाले आहे. ते पाहता जिल्ह्यात गेल्या काही वर्षात आधार नोंदणीची मोहीम जोरात राबविण्यात आली. त्याचाच परिणाम म्हणून डिसेंबर २०१६ पर्यंत जिल्ह्यातील २७ लाख नागरिक आधार च्या कक्षेत आले असून मे २०१७ पर्यंत या आकड्यात आणखी भर पडली आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला आपली स्वतंत्र ओळख (युआयडी) निर्माण करण्यासाठी आधार नोंदणी करण्याची मोहीम शासनाकडून राबविण्यात येत आहे. आधार कार्ड हे शासनाच्या सर्व योजना व बँकींग कामांसाठी आवश्यक आहे. जिल्ह्यात २७ लाख म्हणजे ९२ टक्के नागरिकांची आधार नोंदणी झाली आहे. तर उर्वरित दोन लाख २४ हजार नागरिकांची आधार नोंदणी करण्यासाठी १८० केंद्र तालुका व गावस्तरावर कार्यरत असल्याचा शासनाचा दावा आहे. या सर्व केंद्रांची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यातील काही केंद्र तहसील कार्यालयात कायमस्वरुपी लावण्यात सुरू आहेत. आधार नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे व संपूर्ण प्रक्रिया व अर्जाचा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. आधार कार्डपासून वंचित असलेल्यांनी लाभ घेऊन आपली नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.आधार मदत केंद्र नागरिकांच्या आधार कार्ड विषयी विविध अडचणी लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयात आधार मदत केंद्र उघडण्यात आले आहे. नागरिकांच्या आधार कार्ड विषयी कोणत्याही अडचणी असल्यास ते ९४०५४२२२०० या मोबाईल क्रमांकावर व्हॉटस्अ‍ॅप किंवा एसएमएस द्वारा इमेज व संदेश पाठवू शकतील. संदेश पाठविताना आधार नोंदणी पावतीचा २८ आकडी क्रमांक किंवा पावती स्कॅन करून पाठवू शकता. आधार नोंदणी करताना दिलेल्या रजिस्टर नोंदणी मोबाईल वरूनच संदेश पाठवायचा आहे. इतर मोबाईल क्रमांकावरून संदेश पाठविताना कोणतेही एक ओळखपत्र स्कॅन करून पाठवावे. ज्यांच्याकडे आधार नोंदणी पावती आहे, परंतु त्यांना अद्याप आधार कार्ड मिळाले नाही, अशा नागरिकांनी या क्रमांकावर संदेश पाठवायचा आहे. परंतु या क्रमांकावर फोन करता येणार नाही, तसेच इतर कोणतीही इमेज पाठवू नये. ही सेवा केवळ यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांसाठीच आहे. ‘आधार’कार्ड काढण्याचा कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध सुरू आहे. ९३ टक्केहून अधिक नोंदणी झाली आहे. शहरी भागानंतर आता ग्रामीण भागात आम्ही स्वत: जाऊन जे नागरिक अद्यापही आधार पासून वंचित आहे, त्यांची नोंदणी करीत आहो. त्यासाठी पोलीस पाटील व इतर नागरिकांचे सहकार्य घेत आहो. आवश्यक ते प्रमाणपत्र जाग्यावर उपलब्ध करून देत आहो. - सचिन शेजाळ, तहसीलदार, यवतमाळ .