शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

२७ लाख नागरिक ‘आधार’च्या कक्षेत

By admin | Updated: May 16, 2017 01:28 IST

शासनाच्या विविध योजना व इतर सर्व महत्वपूर्ण कामांसाठी ‘आधार’ कार्ड आता अनिवार्य झाले आहे.

आॅनलाईन मदत : जिल्ह्यातील कार्यरत केंद्रांची यादी संकेतस्थळावर, आणखी दोन लाख नागरिकांना हवा आधारसुहास सुपासे । लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाच्या विविध योजना व इतर सर्व महत्वपूर्ण कामांसाठी ‘आधार’ कार्ड आता अनिवार्य झाले आहे. ते पाहता जिल्ह्यात गेल्या काही वर्षात आधार नोंदणीची मोहीम जोरात राबविण्यात आली. त्याचाच परिणाम म्हणून डिसेंबर २०१६ पर्यंत जिल्ह्यातील २७ लाख नागरिक आधार च्या कक्षेत आले असून मे २०१७ पर्यंत या आकड्यात आणखी भर पडली आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला आपली स्वतंत्र ओळख (युआयडी) निर्माण करण्यासाठी आधार नोंदणी करण्याची मोहीम शासनाकडून राबविण्यात येत आहे. आधार कार्ड हे शासनाच्या सर्व योजना व बँकींग कामांसाठी आवश्यक आहे. जिल्ह्यात २७ लाख म्हणजे ९२ टक्के नागरिकांची आधार नोंदणी झाली आहे. तर उर्वरित दोन लाख २४ हजार नागरिकांची आधार नोंदणी करण्यासाठी १८० केंद्र तालुका व गावस्तरावर कार्यरत असल्याचा शासनाचा दावा आहे. या सर्व केंद्रांची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यातील काही केंद्र तहसील कार्यालयात कायमस्वरुपी लावण्यात सुरू आहेत. आधार नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे व संपूर्ण प्रक्रिया व अर्जाचा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. आधार कार्डपासून वंचित असलेल्यांनी लाभ घेऊन आपली नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.आधार मदत केंद्र नागरिकांच्या आधार कार्ड विषयी विविध अडचणी लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयात आधार मदत केंद्र उघडण्यात आले आहे. नागरिकांच्या आधार कार्ड विषयी कोणत्याही अडचणी असल्यास ते ९४०५४२२२०० या मोबाईल क्रमांकावर व्हॉटस्अ‍ॅप किंवा एसएमएस द्वारा इमेज व संदेश पाठवू शकतील. संदेश पाठविताना आधार नोंदणी पावतीचा २८ आकडी क्रमांक किंवा पावती स्कॅन करून पाठवू शकता. आधार नोंदणी करताना दिलेल्या रजिस्टर नोंदणी मोबाईल वरूनच संदेश पाठवायचा आहे. इतर मोबाईल क्रमांकावरून संदेश पाठविताना कोणतेही एक ओळखपत्र स्कॅन करून पाठवावे. ज्यांच्याकडे आधार नोंदणी पावती आहे, परंतु त्यांना अद्याप आधार कार्ड मिळाले नाही, अशा नागरिकांनी या क्रमांकावर संदेश पाठवायचा आहे. परंतु या क्रमांकावर फोन करता येणार नाही, तसेच इतर कोणतीही इमेज पाठवू नये. ही सेवा केवळ यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांसाठीच आहे. ‘आधार’कार्ड काढण्याचा कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध सुरू आहे. ९३ टक्केहून अधिक नोंदणी झाली आहे. शहरी भागानंतर आता ग्रामीण भागात आम्ही स्वत: जाऊन जे नागरिक अद्यापही आधार पासून वंचित आहे, त्यांची नोंदणी करीत आहो. त्यासाठी पोलीस पाटील व इतर नागरिकांचे सहकार्य घेत आहो. आवश्यक ते प्रमाणपत्र जाग्यावर उपलब्ध करून देत आहो. - सचिन शेजाळ, तहसीलदार, यवतमाळ .