शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
4
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
5
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
8
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
9
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
10
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
11
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
16
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
17
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
18
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
19
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
20
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले

आर्णी नगरपरिषद क्षेत्रातील २६ अंगणवाड्या वाऱ्यावर

By admin | Updated: June 22, 2015 02:08 IST

आर्णी नगरपरिषद झाल्यावर नगरपरिषद क्षेत्रातील २६ अंगणवाड्यांचा कारभार वाऱ्यावर आहे.

आर्णी : आर्णी नगरपरिषद झाल्यावर नगरपरिषद क्षेत्रातील २६ अंगणवाड्यांचा कारभार वाऱ्यावर आहे. हा कारभार एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाकडे होता. परंतु नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर देखभाल पालिकेकडे देण्यात आली. परंतु या संदर्भातील हस्तांतरणाची प्रक्रिया अद्याप झालीच नाही. त्यामुळे या अंगणवाड्यांकडे कुणाचेही लक्ष नाही. परिणामी या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या ३१३ विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.एकात्मिक बालविकास विभागाकडून अंगणवाड्यातील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. परंतु अंगणवाडी केंद्रांची देखभाल व किरकोळ खर्च हा त्यांना करता येत नसल्यामुळे विविध प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या आहे. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास २३ फेब्रुवारी २०१४ पासून न्यायालयासमोर असलेल्या अंगणवाडी क्र.११, १३ व १६ यांचे छत उडून गेल्याने त्या बंदच आहे. अंगणवाडीमध्ये असलेल्या ० ते ६ वर्ष या वयोगटातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना उघड्यावरच पोषण आहार दिला जातो. कागदोपत्री या अंगणवाड्या चालू दाखविण्यात आल्या असल्या तरी त्यांचे कामकाज बंद आहे. या तीन अंगणवाड्यांमध्ये ३१३ विद्यार्थी आहे. त्यांची पूर्णपणे नुकसान होत आहे. एकीकडे शासनाकडून कुणीही शाळाबाह्य राहू नये, यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे मात्र हस्तांतरणाअभावी अडकून पडलेल्या अंगणवाड्यांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. नगरपरिषदेला याची दुरुस्ती करता येत नाही, असे सांगितल्या जाते. चिमुकल्यांना बालपणापासूनच शिक्षण मिळावे व त्यांची पूर्व तयारी व्हावी तसेच त्यांच्या आरोग्याकडे योग्य ते लक्ष देता यावे यासाठी अंगणवाडी महत्त्वपूर्ण ठरते. आर्थिकदृष्ट्या सबळ असणाऱ्या पालकांची मुले खासगी शाळेत जातात. परंतु समाजातील गोरगरीबांची मुले या अंगणवाड्यांमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे समाजातील वंचित घटकांबाबत शासनाच्या अधिकारी व लोकप्रतिनिधींना कोणत्याही संवेदना नसल्याची प्रतिक्रिया पालकवर्गांमधून व्यक्त होत आहे.आर्णी शहरातील न्यायालयासमोर असलेल्या एक नव्हेतर तीनही अंगणवाड्यांचे छत उडून गेले आहे. परंतु त्याकडे लक्ष देण्यात येत नाही. १५ महिने उलटूनही त्याची दखलच घेण्यात आली नाही. या बाबत संबंधितांना विचारणा केली असता हस्तांतरणच झाले नसल्यामुळे आम्ही या बाबत खर्च करू शकत नाही, असे उत्तर देण्यात आले. शहरातील लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्था या पैकी कुणीही या संदर्भात पुढाकार घ्यायला तयार नाही. तसेच या चांगल्या कामासाठी आपल्या खिशातून कुणी दोन पैसेही खर्च करण्यास तयार नसल्याचे दिसून येते. कुणीतरी या बाबत पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा पालकवर्गाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात सध्या नवीन जिल्हाधिकारी आले आहे. तेव्हापासून जिल्ह्यातील प्रशासकीय कामात कमालीची गती आली आहे. त्यांनी आर्णी शहरातीलच नव्हेतर संपूर्ण जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या कारभारावर कटाक्ष टाकावा आणि गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी पालकवर्गांमधून व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)