शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

जिल्ह्यासाठी २५४ कोटींचा ‘प्लान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 9:00 PM

जिल्हा विकासाकरिता यावर्षी नियोजन विभागाला २५४ कोटी रूपयांचा निधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, केंद्र शासनाच्या योजनेतून हा निधी थेट वळता केला जाणार आहे.

ठळक मुद्देकेंद्राचा निधी थेट मिळणार । कृषी संलग्न सेवेसाठी सर्वाधिक २३ कोटी रुपये खर्च करणार

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा विकासाकरिता यावर्षी नियोजन विभागाला २५४ कोटी रूपयांचा निधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, केंद्र शासनाच्या योजनेतून हा निधी थेट वळता केला जाणार आहे.जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून राज्य शासन दरवर्षी जिल्ह्यांना निधी वळता करते. त्याकरिता कृती आराखडाही तयार करण्यात येतो. यावर्षी आराखड्याला मंजुरी मिळाली. २५४ कोटी रूपयांमधून सर्वाधिक २८ कोटी रूपयांचा निधी सार्वजनिक आरोग्यसेवेकरिता वापरला जाणार आहे. नगरविकासाकरिता २६ कोटी, कृषी आणि संलग्न सेवेसाठी २३ कोटी रूपयांचा निधी दिला जाणार आहे.पोलीस व तुरूंग विभागातील पायाभूत सुविधांसाठी २२ कोटी ४३ लाख रूपये खर्च केले जाणार आहेत. जलसंधारणासाठी १० कोटी ७५ लाख, महिला व बालविकास विभागाच्या योजनांसाठी सात कोटी १२ लाख, मृद संधारणासाठी एक कोटी ६६ लाख, पशुसंवर्धनासाठी सहा कोटी २८ लाख, मत्स्य व्यवसायासाठी २२ लाख, वने आणि वन्यजीवनासाठी १३ कोटी ७५ लाख, सहकार विभागासाठी दोन कोटी, ग्रामीण विकासाकरिता १७ कोटी तीन लाख, लोक वाचनालय १२ लाख, सामान्य शिक्षणासाठी चार कोटी ४३ लाख, क्रीडा व युवक कल्याणासाठी चार कोटी एक लाख, व्यवसाय शिक्षणासाठी पाच कोटी ९१ लाख, तंत्र शिक्षणासाठी साडेआठ लाख यासह विविध विभागांसाठी निधी वितरित करण्यात येणार आहे.जिल्हा विकास निधीमधून वनपर्यटनावर विशेष भर दिला जाणार आहे. ईको-टुरिझम कशापद्धतीने विकसित करता येईल, यावर विविध उपाययोजना नावीन्यपूर्ण योजनेतूनही करण्यात येणार आहे. यासोबतच वृक्षारोपण आणि वनसंवर्धनासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या वृक्ष लागवड मोहिमेची यामध्ये मदत घेतली जाणार आहे.पीक संवर्धनाला केंद्र शासन देणार निधीकृषी क्षेत्राच्या विकासाकरिता थेट केंद्र शासनच निधी पुरविणार आहे. यामध्ये राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियानाच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापनाकरिता सूक्ष्म सिंचनावर भर दिला जाणार आहे. याकरिता लागणारे अनुदान केंद्र शासन पुरविणार आहे. एकात्मीक उत्पादन तेलबिया कार्यक्रम, राज्य कृषी विस्तार कार्यक्रमांना सुधारणा करण्याकरिता अर्थसहाय्य करणे या बाबींवर भर दिला जाणार आहे.