शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

२५० विद्यार्थिनींनी भोजन नाकारले

By admin | Updated: August 27, 2015 00:02 IST

आश्रमशाळांमध्ये बेचव जेवण मिळते, ही तक्रार नवीन नाही. पण, शासकीय आश्रमशाळेत पोळीमध्ये सोंडे, भातात अळ्या असाही प्रकार घडत आहे.

शासकीय आदिवासी आश्रमशाळा : पोळीत सोंडे, भातात अळ्या आणि वरण पाण्यासारखेअब्दूल मतीन पारवा आश्रमशाळांमध्ये बेचव जेवण मिळते, ही तक्रार नवीन नाही. पण, शासकीय आश्रमशाळेत पोळीमध्ये सोंडे, भातात अळ्या असाही प्रकार घडत आहे. यामुळेच संतप्त २५० विद्यार्थिनींनी जेवणावर बहिष्कार टाकत संताप व्यक्त केला. घाटंजी तालुक्याच्या जांब येथील शासकीय आश्रमशाळेत घडलेल्या या प्रकारामुळे पालक आणि गावकऱ्यांमध्ये कमालीचा रोष व्यक्त होत आहे. पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जांब येथे मुलींची निवासी आश्रमशाळा आहे. याठिकाणी ३८० विद्यार्थिनी राहतात. शासनाने ठरवून दिलेले जेवणाचे पदार्थ त्यांना कधीच मिळत नाही. याउलट निकृष्ट आणि आरोग्यासाठी घातक अशा प्रकारचे जेवण त्यांना दररोज घ्यावे लागते. बुधवारीही असाच प्रकार झाल्याने विद्यार्थिनींनी जेवणावर बहिष्कार टाकला. दुपारी ३.३० वाजतापर्यंत त्यांनी वसतिगृहाच्या प्रवेशद्वारासमोरच ठिय्या दिला. भातामध्ये आढळलेल्या अळ्या, पोळीमध्ये दृष्टीस पडलेले सोंडे यामुळे त्यांनी जेवण घेणे स्पष्ट नाकारले. वरणाचे पाणीच ताटात होते. वांग्याची भाजी होती. मात्र भाजी तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले तिखटाचे पॅकिंग २०१२-१३ मधील होते. या वस्तूची मुदतही संपली होती, असे सांगण्यात आले. नवीन सत्र सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला. या दिवसांमध्ये विद्यार्थिनींना सकाळच्या नाश्त्यात उसळ कधीही मिळाली नाही.विद्यार्थिनींनी जेवणावर बहिष्कार टाकल्यामुळे पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाचे मानकर आणि ढोले हे दोन कर्मचारी याठिकाणी दाखल झाले. त्यांनी पुढे असा प्रकार होणार नाही, असे सांगून वेळ मारून नेली. मात्र आश्रमशाळेतील हा गोंधळ प्रकल्प कार्यालयाच्या निदर्शनास अनेकदा आणून दिलेला आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. सुरक्षेचा प्रश्न वाऱ्यावर जांब गावापासून अर्धा किलोमीटर दूर अंतरावर जंगलाला लागून ही आश्रमशाळा आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी कुठलीही सोय नाही. महिलांचे वसतिगृह असताना महिला अधीक्षकांची नियुक्ती नाही. कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानांचा वापर अपवादानेच केला जातो. कार्यरत कर्मचाऱ्यांची अरेरावी सुरू असते.आदिवासी विकासमंत्री ३० ला जिल्ह्यात येणारराज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा ३० आॅगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. यावेळी त्यांच्यासमोर शासकीय व खासगी आदिवासी आश्रमशाळांमधील प्रश्न गाजणार आहे. विद्यार्थ्यांना सर्पदंश, निकृष्ट जेवण याकडे लक्ष वेधले जाईल. शौचालय घाणीने माखलेलेया आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या तुलनेत शौचालयांची संख्या अपुरी आहे. स्नानगृहाचीही परिस्थिती तिच आहे. घाणीने माखलेले शौचालय स्वच्छ करण्याचे सौजन्य दाखविले जात नाही. अधीक्षक किंवा इतर कर्मचाऱ्यांकडे याविषयीची तक्रार केल्यास कारवाईचा धाक दाखविला जातो. शिवाय विद्यार्थिनीसाठी असलेल्या कक्षांमधील पंखे तकलादू आहे. काही ठिकाणी तर ही सोयच नाही. शेंगदाणे-हरभरा जाळलापहिली ते बारावीपर्यंत या वसतिगृहांमध्ये विद्यार्थिनी आहे. त्यांच्यासाठी शेंगदाणे, हरभरा आदी वस्तूंचा पुरवठा केला जातो. परंतु कामाठी शाळेमध्ये उपलब्ध राहात नसल्याने विद्यार्थिनींना या वस्तूंचा आस्वाद घेता येत नाही. परिणामी कुजलेल्या या वस्तू जाळून टाकल्याचा प्रकारही आढळून आला. याही परिस्थितीत विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.