शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

२५० विद्यार्थिनींनी भोजन नाकारले

By admin | Updated: August 27, 2015 00:02 IST

आश्रमशाळांमध्ये बेचव जेवण मिळते, ही तक्रार नवीन नाही. पण, शासकीय आश्रमशाळेत पोळीमध्ये सोंडे, भातात अळ्या असाही प्रकार घडत आहे.

शासकीय आदिवासी आश्रमशाळा : पोळीत सोंडे, भातात अळ्या आणि वरण पाण्यासारखेअब्दूल मतीन पारवा आश्रमशाळांमध्ये बेचव जेवण मिळते, ही तक्रार नवीन नाही. पण, शासकीय आश्रमशाळेत पोळीमध्ये सोंडे, भातात अळ्या असाही प्रकार घडत आहे. यामुळेच संतप्त २५० विद्यार्थिनींनी जेवणावर बहिष्कार टाकत संताप व्यक्त केला. घाटंजी तालुक्याच्या जांब येथील शासकीय आश्रमशाळेत घडलेल्या या प्रकारामुळे पालक आणि गावकऱ्यांमध्ये कमालीचा रोष व्यक्त होत आहे. पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जांब येथे मुलींची निवासी आश्रमशाळा आहे. याठिकाणी ३८० विद्यार्थिनी राहतात. शासनाने ठरवून दिलेले जेवणाचे पदार्थ त्यांना कधीच मिळत नाही. याउलट निकृष्ट आणि आरोग्यासाठी घातक अशा प्रकारचे जेवण त्यांना दररोज घ्यावे लागते. बुधवारीही असाच प्रकार झाल्याने विद्यार्थिनींनी जेवणावर बहिष्कार टाकला. दुपारी ३.३० वाजतापर्यंत त्यांनी वसतिगृहाच्या प्रवेशद्वारासमोरच ठिय्या दिला. भातामध्ये आढळलेल्या अळ्या, पोळीमध्ये दृष्टीस पडलेले सोंडे यामुळे त्यांनी जेवण घेणे स्पष्ट नाकारले. वरणाचे पाणीच ताटात होते. वांग्याची भाजी होती. मात्र भाजी तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले तिखटाचे पॅकिंग २०१२-१३ मधील होते. या वस्तूची मुदतही संपली होती, असे सांगण्यात आले. नवीन सत्र सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला. या दिवसांमध्ये विद्यार्थिनींना सकाळच्या नाश्त्यात उसळ कधीही मिळाली नाही.विद्यार्थिनींनी जेवणावर बहिष्कार टाकल्यामुळे पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाचे मानकर आणि ढोले हे दोन कर्मचारी याठिकाणी दाखल झाले. त्यांनी पुढे असा प्रकार होणार नाही, असे सांगून वेळ मारून नेली. मात्र आश्रमशाळेतील हा गोंधळ प्रकल्प कार्यालयाच्या निदर्शनास अनेकदा आणून दिलेला आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. सुरक्षेचा प्रश्न वाऱ्यावर जांब गावापासून अर्धा किलोमीटर दूर अंतरावर जंगलाला लागून ही आश्रमशाळा आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी कुठलीही सोय नाही. महिलांचे वसतिगृह असताना महिला अधीक्षकांची नियुक्ती नाही. कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानांचा वापर अपवादानेच केला जातो. कार्यरत कर्मचाऱ्यांची अरेरावी सुरू असते.आदिवासी विकासमंत्री ३० ला जिल्ह्यात येणारराज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा ३० आॅगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. यावेळी त्यांच्यासमोर शासकीय व खासगी आदिवासी आश्रमशाळांमधील प्रश्न गाजणार आहे. विद्यार्थ्यांना सर्पदंश, निकृष्ट जेवण याकडे लक्ष वेधले जाईल. शौचालय घाणीने माखलेलेया आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या तुलनेत शौचालयांची संख्या अपुरी आहे. स्नानगृहाचीही परिस्थिती तिच आहे. घाणीने माखलेले शौचालय स्वच्छ करण्याचे सौजन्य दाखविले जात नाही. अधीक्षक किंवा इतर कर्मचाऱ्यांकडे याविषयीची तक्रार केल्यास कारवाईचा धाक दाखविला जातो. शिवाय विद्यार्थिनीसाठी असलेल्या कक्षांमधील पंखे तकलादू आहे. काही ठिकाणी तर ही सोयच नाही. शेंगदाणे-हरभरा जाळलापहिली ते बारावीपर्यंत या वसतिगृहांमध्ये विद्यार्थिनी आहे. त्यांच्यासाठी शेंगदाणे, हरभरा आदी वस्तूंचा पुरवठा केला जातो. परंतु कामाठी शाळेमध्ये उपलब्ध राहात नसल्याने विद्यार्थिनींना या वस्तूंचा आस्वाद घेता येत नाही. परिणामी कुजलेल्या या वस्तू जाळून टाकल्याचा प्रकारही आढळून आला. याही परिस्थितीत विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.