शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

२५० कोटी कर्ज पुनर्गठणाची तयारी

By admin | Updated: December 28, 2015 02:48 IST

सततच्या दुष्काळी परिस्थितीने शेतकरी हादरले आहेत. अशा स्थितीत ज्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही,

नवे धोरण ठरतेय : आयुक्तांनी मागितला कर्ज रूपांतराचा अहवाल रूपेश उत्तरवार यवतमाळ सततच्या दुष्काळी परिस्थितीने शेतकरी हादरले आहेत. अशा स्थितीत ज्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही, त्या शेतकऱ्यांना बँकेने कर्ज नाकारले. यामुळे शेतकऱ्यांंना सावकाराकडे धाव घ्यावी लागली. अशा २०१२-१३ च्या थकीत कर्जाचे पुनर्गठण करण्यासाठी सहकार विभागाने अहवाल मागविला आहे. नाबार्डच्या सल्ल्यानुसार राज्य शासन धोरण ठरविणार आहे. सन २०१२-१३ मध्ये जिल्ह्यातील २०४७ गावांची आणेवारी ५० टक्केच्या आत आली होती. यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात नाबार्डच्या धोरणानुसार कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आश्वासन दिले होते. अधिवेशन संपताच सहकार आयुुक्तांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचा हवाला देत २०१२-१३ आणि २०१३-१४ चा अहवाल मागविला आहे. २०१३-१४ मध्ये जिल्ह्याची पैसेवारी ५० टक्केच्या वर आहे. २०१२-१३ मध्ये जिल्ह्याची पैसेवारी ५० टक्केच्या आत आहे. दुष्काळ घोषित झालेल्या वर्षी जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांना २५० कोेटी रूपयांच्या कर्जाची परतफेड करता आली नाही. सहकार विभागाने अहवाल मागविला आहे. यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जाच्या पुनर्गठणाबाबत नाबार्डच्या सल्ल्यानुसार धोरण ठरविले जाणार आहे. यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांपुढील नवीन कर्जाचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे.