शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

चापडोह, बोरगावसह २५ प्रकल्प ओव्हर फ्लो

By admin | Updated: July 27, 2016 00:42 IST

जुलै महिन्यात कोसळलेल्या धुंवाधार पावसाने प्रकल्प ओव्हर फ्लो होत आहेत. हवामान खात्याने बुधवारपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

सतर्कतेचा इशारा : निम्न वर्धाचे नऊ दरवाजे उघडले यवतमाळ : जुलै महिन्यात कोसळलेल्या धुंवाधार पावसाने प्रकल्प ओव्हर फ्लो होत आहेत. हवामान खात्याने बुधवारपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे पाच तालुक्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. निम्न वर्धा प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहे. चापडोह आणि बोरगाव प्रकल्पासह २५ प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याची नोंद पाटबंधारे विभागाने केली आहे. आठ-दहा दिवसांपासून जिल्ह्यात सतत पाऊस सुरू आहे. यामुळे जलाशयाच्या साठवण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जुलैच्या प्रारंभी सायखेडा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला होता. यानंतर १५ दिवसाच्या कालखंडात चापडोह आणि बोरगाव प्रकल्पही ओव्हर फ्लो झाला. यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणारा निळोणा प्रकल्प १२ जुलैला ओव्हर फ्लो झाला होता. यानंतर आठ दिवसाच्या अंतराने चापडोह प्रकल्प ओव्हर फ्लो झाला. यावर्षीच्या उन्हाळ्यात चापडोह प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा झाला. यामुळे चापडोह प्रकल्प उशिरा ओव्हर फ्लो झाला. शहराला पाणी पुरवठा करणारे दोनही प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने यावर्षी यवतमाळकरांना मुबलक पाणी मिळणार आहे. मध्यम प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा सायखेडा आणि बोरगाव प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. गोकी प्रकल्पामध्ये ९१ टक्के पाणी साठा आहे. नवरगाव मध्ये ९५ टक्के, लोअरपूसमध्ये ७७ टक्के, वाघाडी ७० टक्के, मोठा पूस ५४ टक्के, अरूणावती प्रकल्पात ४२ टक्के, अडाण प्रकल्पात ३८ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. लघु प्रकल्पातील जामवाडी, कापरा, सिंगनडोह, पिंपळखुटी, रूई, ईटोळी, किन्ही, मारेगाव, दुधाना, चोरकुंड, पहूर तांडा, पहूर ई, मुरझडा, करंजी, झोटींगधर, म्हैस दोडका, नरसाळा, पोखरी, निंगणूर, सेनद, दराटी, मुडाना, तरोडा आणि पोफाळी या प्रकल्पाचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील इतर ६२ लघु प्रकल्पात सरासरी ७० टक्के जलसाठ निर्माण झाला आहे. यातून मोठ्या प्रमाणात सिंचन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सततच्या पावसाने निम्न वर्धा प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहे. या ठिकाणावरून १३२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे या प्रकल्प पात्राच्या क्षेत्रात येणाऱ्या कळंब, बाभूळगाव, वणी, राळेगाव आणि मारेगाव तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (शहर वार्ताहर)