शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

चापडोह, बोरगावसह २५ प्रकल्प ओव्हर फ्लो

By admin | Updated: July 27, 2016 00:42 IST

जुलै महिन्यात कोसळलेल्या धुंवाधार पावसाने प्रकल्प ओव्हर फ्लो होत आहेत. हवामान खात्याने बुधवारपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

सतर्कतेचा इशारा : निम्न वर्धाचे नऊ दरवाजे उघडले यवतमाळ : जुलै महिन्यात कोसळलेल्या धुंवाधार पावसाने प्रकल्प ओव्हर फ्लो होत आहेत. हवामान खात्याने बुधवारपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे पाच तालुक्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. निम्न वर्धा प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहे. चापडोह आणि बोरगाव प्रकल्पासह २५ प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याची नोंद पाटबंधारे विभागाने केली आहे. आठ-दहा दिवसांपासून जिल्ह्यात सतत पाऊस सुरू आहे. यामुळे जलाशयाच्या साठवण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जुलैच्या प्रारंभी सायखेडा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला होता. यानंतर १५ दिवसाच्या कालखंडात चापडोह आणि बोरगाव प्रकल्पही ओव्हर फ्लो झाला. यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणारा निळोणा प्रकल्प १२ जुलैला ओव्हर फ्लो झाला होता. यानंतर आठ दिवसाच्या अंतराने चापडोह प्रकल्प ओव्हर फ्लो झाला. यावर्षीच्या उन्हाळ्यात चापडोह प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा झाला. यामुळे चापडोह प्रकल्प उशिरा ओव्हर फ्लो झाला. शहराला पाणी पुरवठा करणारे दोनही प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने यावर्षी यवतमाळकरांना मुबलक पाणी मिळणार आहे. मध्यम प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा सायखेडा आणि बोरगाव प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. गोकी प्रकल्पामध्ये ९१ टक्के पाणी साठा आहे. नवरगाव मध्ये ९५ टक्के, लोअरपूसमध्ये ७७ टक्के, वाघाडी ७० टक्के, मोठा पूस ५४ टक्के, अरूणावती प्रकल्पात ४२ टक्के, अडाण प्रकल्पात ३८ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. लघु प्रकल्पातील जामवाडी, कापरा, सिंगनडोह, पिंपळखुटी, रूई, ईटोळी, किन्ही, मारेगाव, दुधाना, चोरकुंड, पहूर तांडा, पहूर ई, मुरझडा, करंजी, झोटींगधर, म्हैस दोडका, नरसाळा, पोखरी, निंगणूर, सेनद, दराटी, मुडाना, तरोडा आणि पोफाळी या प्रकल्पाचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील इतर ६२ लघु प्रकल्पात सरासरी ७० टक्के जलसाठ निर्माण झाला आहे. यातून मोठ्या प्रमाणात सिंचन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सततच्या पावसाने निम्न वर्धा प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहे. या ठिकाणावरून १३२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे या प्रकल्प पात्राच्या क्षेत्रात येणाऱ्या कळंब, बाभूळगाव, वणी, राळेगाव आणि मारेगाव तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (शहर वार्ताहर)