शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

चापडोह, बोरगावसह २५ प्रकल्प ओव्हर फ्लो

By admin | Updated: July 27, 2016 00:42 IST

जुलै महिन्यात कोसळलेल्या धुंवाधार पावसाने प्रकल्प ओव्हर फ्लो होत आहेत. हवामान खात्याने बुधवारपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

सतर्कतेचा इशारा : निम्न वर्धाचे नऊ दरवाजे उघडले यवतमाळ : जुलै महिन्यात कोसळलेल्या धुंवाधार पावसाने प्रकल्प ओव्हर फ्लो होत आहेत. हवामान खात्याने बुधवारपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे पाच तालुक्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. निम्न वर्धा प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहे. चापडोह आणि बोरगाव प्रकल्पासह २५ प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याची नोंद पाटबंधारे विभागाने केली आहे. आठ-दहा दिवसांपासून जिल्ह्यात सतत पाऊस सुरू आहे. यामुळे जलाशयाच्या साठवण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जुलैच्या प्रारंभी सायखेडा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला होता. यानंतर १५ दिवसाच्या कालखंडात चापडोह आणि बोरगाव प्रकल्पही ओव्हर फ्लो झाला. यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणारा निळोणा प्रकल्प १२ जुलैला ओव्हर फ्लो झाला होता. यानंतर आठ दिवसाच्या अंतराने चापडोह प्रकल्प ओव्हर फ्लो झाला. यावर्षीच्या उन्हाळ्यात चापडोह प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा झाला. यामुळे चापडोह प्रकल्प उशिरा ओव्हर फ्लो झाला. शहराला पाणी पुरवठा करणारे दोनही प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने यावर्षी यवतमाळकरांना मुबलक पाणी मिळणार आहे. मध्यम प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा सायखेडा आणि बोरगाव प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. गोकी प्रकल्पामध्ये ९१ टक्के पाणी साठा आहे. नवरगाव मध्ये ९५ टक्के, लोअरपूसमध्ये ७७ टक्के, वाघाडी ७० टक्के, मोठा पूस ५४ टक्के, अरूणावती प्रकल्पात ४२ टक्के, अडाण प्रकल्पात ३८ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. लघु प्रकल्पातील जामवाडी, कापरा, सिंगनडोह, पिंपळखुटी, रूई, ईटोळी, किन्ही, मारेगाव, दुधाना, चोरकुंड, पहूर तांडा, पहूर ई, मुरझडा, करंजी, झोटींगधर, म्हैस दोडका, नरसाळा, पोखरी, निंगणूर, सेनद, दराटी, मुडाना, तरोडा आणि पोफाळी या प्रकल्पाचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील इतर ६२ लघु प्रकल्पात सरासरी ७० टक्के जलसाठ निर्माण झाला आहे. यातून मोठ्या प्रमाणात सिंचन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सततच्या पावसाने निम्न वर्धा प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहे. या ठिकाणावरून १३२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे या प्रकल्प पात्राच्या क्षेत्रात येणाऱ्या कळंब, बाभूळगाव, वणी, राळेगाव आणि मारेगाव तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (शहर वार्ताहर)