शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

दहा समित्यांवर २५ सदस्य निवडीचा तिढा

By admin | Updated: October 30, 2014 22:58 IST

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या सोबतच सभापतींची निवड करण्यात आली. या नव्या फेररचनेमुळे दहा समित्यामध्ये २५ सदस्यांची पदे रिक्त झाली आहे. या जागेवर सदस्य

यवतमाळ : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या सोबतच सभापतींची निवड करण्यात आली. या नव्या फेररचनेमुळे दहा समित्यामध्ये २५ सदस्यांची पदे रिक्त झाली आहे. या जागेवर सदस्य निवडण्यासाठी नेत्यांचा चांगलाच कस लागणार आहे. बदललेल्या राजकीय समीकरणाने तिढा निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेत स्थायी समिती, जलव्यवस्थापन आणि स्वच्छता समिती, बांधकाम, महिला व बाल कल्याण आणि शिक्षण समितीमध्ये प्रत्येकी एक सदस्य, अरोग्य समितीमध्ये दोन, अर्थ समितीमध्ये पाच, कृषी समितीमध्ये दोन, समाजकल्याण समितीमध्ये दोन, मध्ये एक तर पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीमध्ये आठ सदस्यांची नियुक्ती करायची आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, माजी उपाध्यक्ष ययाती नाईक, माजी सभापती प्राजक्ता मानकर, मनमोहनसिंग चव्हाण, प्रभाकर उईके, प्रवीण शिंदे यांची समितीवर निवड करायची आहे. याशिवाय पंचायत समिती सभापतींचीसुध्दा समितीवर नियुक्ती करायची आहे. सभापतींना खातेवाटप करण्यासाठी ७ नोव्हेंबरला सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. या सभेत खातेवाटप झाल्यानंतर समिती सदस्यांची निवड केली जाणार आहे. समितीवर नियुक्तीसाठी निवड करावयाची असलेल्या सदस्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी तीन सदस्य आहेत. पंचायत समिती सभापतींमध्ये काँग्रेस सहा, राष्ट्रवादी काँग्रेस चार, शिवसेना चार आणि अपक्ष एक सभापती आहे. यातूनच विविध समिती सदस्य म्हणून निवड केली जाणार आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. मात्र विधानसभा निवडणूकीपूर्वी घेतलेल्या या निणर्यानुसार खातेवाटप होणार काय याची उत्सुकता आहे. विधानसभेत सर्वच पक्षांनी परस्परा विरोधात दमखम आजमावला आहे. त्यामुळे कालपर्यंत अगदी शहकटशहाचे राजकारण करणारे नेते एकत्र येऊन कोणते समीकरण तयार करतात हेही महत्वाचे ठरणार आहे. जिल्हा परिषदेत सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. या दोन्ही काँग्रेसच्या संर्घषात जिल्हा काँग्रेसचा सफाया झाला आहे. त्यामुळे विषय समित्या निवडीला विशेष महत्व आले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)