शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

२४ हजार एलईडींनी उजळणार शहर

By admin | Updated: July 28, 2016 00:55 IST

विजेची बचत आणि वीज बिलाच्या खर्चात काटकसर करण्याचे धोरण नगरपरिषदेने ठरविले असून

यवतमाळ नगरपरिषद : जीपीआरएस तंत्रज्ञान, मोबाईलवरून आॅपरेट, ६५ लाखांची बचत यवतमाळ : विजेची बचत आणि वीज बिलाच्या खर्चात काटकसर करण्याचे धोरण नगरपरिषदेने ठरविले असून लवकरच यवतमाळ शहरातील रस्ते एलईडीच्या प्रकाशाने उजळणार आहे. २४ हजार एलईडी लाईट शहरात लावले जाणार असून लाईट जीपीआरएस सिस्टीमने कनेक्ट केले जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रणाली मोबाईलवरूनच आॅपरेट करता येणार आहे. यवतमाळ शहरात असलेल्या पथदिव्यांचे वीज बिल वर्षाकाठी २० लाखांच्या घरात असते. तसेच विजेचाही वापर मोठ्या प्रमाणात होतो. हा प्रकार टाळण्यासाठी नगरपरिषदेने आता शहरातील सर्व परंपरागत पथदिव्यांवरील लाईट आणि ट्युब लाईट बदलविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या प्रणालीमुळे वर्षाकाठी देखभालीचा खर्च ५० लाख आहे. तसेच लाईट चालू आणि बंद करण्यासाठी दहा लाखांचे कंत्राट व तपासणीसाठी पाच लाख खर्च होतो. एवढा मोठा खर्च करुनही पथदिवे बंद असल्याची ओरड होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विद्युत अभियंता सुप्रिया रिठे यांनी एलईडी लाईट संदर्भात स्वतंत्र आराखडा तयार केला. तसेच एलईडी लाईट दोन ते तीन वर्ष टिकतात. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी कमी होतील. वीज बिलही आठ लाख रुपयेच येणार असल्याचे त्यांनी आपल्या आराखड्यात सांगितले. या आराखड्याला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. त्यासाठी आता निविदा बोलविण्यात आल्या आहे. बीओटी तत्वावर एलईडी लाईट लावण्याचे कंत्राट दिले जाणार आहे. यामुळे नगरपरिषदेची वार्षिक ६५ लाख रुपयांची बचत होणार आहे. १ आॅगस्टपर्यंत निविदा बोलविण्यात आल्या आहे. यातील सक्षम कंपनीची निविदा मंजूर करण्यात येईल. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात शहर एलईडीच्या प्रकाशाने उजाळून निघणार आहे. त्यासाठी तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिला जात असल्याचे नगरपरिषदेच्या विद्युत अभियंता सुप्रिया रिठे यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)