शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

तस्करी नियंत्रणासाठी रेतीघाटांवर २४ तास ‘वॉच’

By admin | Updated: May 29, 2015 00:11 IST

रेतीचा अवैध उपसा थांबविण्यासाठी १६ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यांची २४ तास या घाटांवर नजर राहणार आहे.

यवतमाळ : रेतीचा अवैध उपसा थांबविण्यासाठी १६ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यांची २४ तास या घाटांवर नजर राहणार आहे. रेती तस्करी नियंत्रणात आणण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या रेती उपस्यावर बंदी घालण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली होती. यानंतर भरारी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.जिल्ह्यातील ८६ रेतीघाटांपैकी ४८ रेतीघाटांचा लिलाव झाला. उर्वरित ३८ रेतीघाटांच्या लिलावासाठी प्रक्रिया पार पडली. तीन वेळा प्रक्रिया राबविल्यानंतरही कुणीही लिलाव घेतला नाही. यामुळे या घाटातील रेती मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. विशेष म्हणजे या भागातील तस्करांनी रेतीघाट रिकामे केले आहेत. यातून पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. सोबतच शासनाच्या तिजोरीतील महसूल पळविला आहे. यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.जिल्ह्यात १६ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये उपविभागीय अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे. हे भरारी पथक २४ तास वॉच ठेवणार आहे. त्यासाठी २५ नाक्यांवर तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. यामुळे रेतीमाफीयांच्या मुसक्या आवळल्या जाणार आहे. विशेष म्हणजे दर आठ दिवसाला खनिकर्म अधिकारी भरारी पथकांचा आढावा घेणार आहे. यातून भरारी पथकांच्या कामगिरीची माहिती प्रशासनाला तत्काळ मिळणार आहे. यापूर्वी अनेक प्रयोग रेती चोरी थांबविण्यासाठी झालेले आहे. (शहर वार्ताहर)