शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

२३७ गावांत पाणीटंचाई

By admin | Updated: April 10, 2017 01:44 IST

दरवर्षी पाणीटंचाईने होरपळून निघणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात यंदा आत्तापर्यंत एकही टँकर सुरू झाला नाही.

तूर्तास एकही टँकर नाही : पुसद, महागाव तालुक्यात भीषण परिस्थितीयवतमाळ : दरवर्षी पाणीटंचाईने होरपळून निघणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात यंदा आत्तापर्यंत एकही टँकर सुरू झाला नाही. पुसद व महागाव तालुक्यालील जनतेला मात्र पाणीटंचाईचे तीव्र चटके बसू लागले आहेत. एप्रिल ते जून दरम्यान जिल्ह्यातील २३७ गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.जिल्हा परिषदेने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन तब्बल दोन कोटी ८८ लाखांचा कृती आराखडा तयार केला. यात सर्वाधिक तरतूद जानेवारी ते मार्च दरम्यान उपाययोजना करण्यावर प्रस्तावीत होती. त्यासाठी एक कोटी ९६ लाखांचा खर्च अपेक्षित होता. प्रत्यक्षात मार्च महिना उलटल्यानंतर जिल्ह्यात कुठेही टँकर लावावा लागला नाही. मात्र एप्रिल ते जून दरम्यान किमान २५ टँकर अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी १८ लाख ३० हजारांचा खर्च अपेक्षित आहे. एप्रिलच्या सुरूवातीपासूनच सूर्य आग ओकत आहे. विदर्भासह जिल्ह्यात पारा वाढला आहे. वाढत्या तापमानाने पाण्याचे बाष्पमीभवनही मोठ्या प्रमाणात होत असल्याने जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांतील पाणीसाठी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे एप्रिल ते जून या तीन महिन्यात जिल्ह्यातील जनतेला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या तीन महिन्यात २३२ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे. त्यावर मात करण्यासाठी २५ टँकर अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. एप्रिल ते जून दरम्यान जिल्ह्यातील २३२ गावांमधील २३७ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. सोबतच जिल्हा परिषदेने नळ योजनांची विशेष दुरूस्ती व दुहेरी हातपंपाच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे २४ प्रस्ताव सादर केले आहे. (शहर प्रतिनिधी)कृती आरखाड्यात असमतोलजिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या कृती आराखड्यात असमतोल दिसून येत आहे. या विभागाने जानेवारी ते मार्च दरम्यान १४ तात्पुरत्या पूरक नळ योजना घेणे, ५२ गावांमध्ये नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तीन गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण आणि एक टँकर सुरू करावा लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यासाठी एक कोटी ९६ लाखांची तरतूद करण्यात आली. मात्र एप्रिल ते जून दरम्यानच्या काळात २५ टँकर व २३७ विहीर अधिग्रहण उपापयोजना सुचविण्यात आल्या. त्यासाठी केवळ ९१ लाख ८६ हजारांची तरतूद केली गेली. वास्तविक या तीन महिन्यातच तीव्र उन्हाळा असतो. मात्र पाणीपुरवठा विभागाने पुरेशा उपाययोजना केल्या नाही. तथापि आता ऐनवेळी तसे २४ प्रस्ताव दाखल केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पाणीटंचाई निवारणार्थ तातडीने उपाययोजना करण्याची ग्वाही दिली होती. आता त्यांनी या संदर्भात ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.