शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

वर्‍हाडातील चार जिल्ह्यांमध्ये २३.४0 टक्के जलसाठा

By admin | Updated: July 6, 2014 23:37 IST

वर्‍हाडातील धरणांची जलपातळी घसरली असून, चारही जिल्हय़ातील धरणांची जलपातळी २३.४0 टक्क्यांवर येऊन ठेपली आहे.

अकोला : पावसाळा लांबल्याने वर्‍हाडातील धरणांची जलपातळी घसरली असून, चारही जिल्हय़ातील धरणांची जलपातळी २३.४0 टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. अकोला जिल्ह्यात १९.५0, वाशिम १९.५७ तर बुलडाणा जिल्ह्यात २५.३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे.यावर्षी प्रचंड तापमान व पावसाला होत असलेल्या विलंबामुळे वर्‍हाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या चार जिल्ह्यातील धरणांमधील जलपातळी घसरत चालली आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात २३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने वर्‍हाडातील पाच जिल्हय़ांतील जलसाठे ओसंडून वाहत होते. यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. अकोला जिल्हय़ातील काटेपूर्णा प्रकल्पात २0.१३ दलघमी म्हणजे २३ टक्के जलसाठा शिल्लक असून, पातूर तालुक्यातील मोर्णा या प्रकल्पात ३0 टक्के व निगरुणा धरणात ३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्पात केवळ ३ टक्के जलसाठा शिलक्क असून, दगडपारवा प्रकल्पाचा जलसाठा शून्यपातळी खाली गेला आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा या मोठय़ा सिंचन प्रकल्पात ३१ टक्के, ज्ञानगंगामध्ये ४१, मस २७ , कोराडी ४९ व पलढग धरणात २0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्हय़ातील पूस या मोठय़ा सिंचन प्रकल्पात १९ टक्के तर याच जिल्हय़ातील लोअरपूस धरणामध्ये ५२, सायखेडा ४३, गोकी २२, वाघाडी २८ व बोरगाव सिंचन प्रकल्पात केवळ २३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्हय़ातील एकबुर्जी व सोनल हे मध्यम प्रकल्प वगळता उर्वरित सात लघु प्रकल्प मिळून केवळ १९.१७ टक्के जलसाठा आहे.