शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
6
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
7
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
8
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
9
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
10
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
11
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
12
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
13
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
14
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
15
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
16
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
17
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
18
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
19
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
20
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी

२३०० कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 02:20 IST

राज्य शासनाने घोषित केल्यानुसार कर्जमाफीचा आदेश अखेर सहकार विभागात धडकला. या आदेशानुसार

तीन लाख शेतकरी : २००९ पासूनच्या थकबाकीदारांना लाभरूपेश उत्तरवार । लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने घोषित केल्यानुसार कर्जमाफीचा आदेश अखेर सहकार विभागात धडकला. या आदेशानुसार जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना तब्बल २३०० कोटींची कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्र्यांनी ५ जूनला राज्य कर्जमाफीची घोषणा केली. मात्र अध्यादेशात १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंतच्याच थकबाकीदार शेतकऱ्यांना माफी देण्याचे नमूद होते. त्यातून २०१२ पूर्वीचे थकबाकीदार शेतकरी वगळण्यात आले होते. यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक होत आंदोलन केले. कर्जमाफीच्या अध्यादेशाची होळी करून संताप व्यक्त केला. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील स्थितीचा संबंधित पालकमंत्र्यांकडून आढावा घेतला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सीच्या माध्यमातून सहकार विभाग व बँक अधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले. नंतर कर्जमाफीचा सुधारित अध्यादेश काढण्यात आला.राज्य शासनाने काढलेल्या नवीन अध्यादेशात आता १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे नमूद करण्यात आले आहे. राज्याच्या सहकार विभागाचे कार्यासन अधिकारी दीपक राणे यांच्या स्वाक्षरीचा हा अध्यादेश येथील सहकार विभागात धडकला आहे. या सुधारित अध्यादेशानुसार जिल्ह्यातील तीन लाख थकबाकीदार शेतकऱ्यांना २३०० कोटींची कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी आता बँकांना याद्या तयार कराव्या लागणार आहे. या यादीत नेमका कुणाचा समावेश होतो, याची आता उत्सुकता आहे. तथापि तीन लाख शेतकऱ्यांना या यादीत स्थान मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. अग्रीम कर्ज वाटपाचे आदेश धडकलेराष्ट्रीयकृत बँकांनी विभागीय कार्यालयाकडून सूचना नसल्याने शेतकऱ्यांना तातडीचे १० हजारांचे कर्ज देण्यास आखडता हात घेतला. आता या बँकांना त्यांच्या विभागीय कार्यालयाकडून तातडीचे कर्ज वाटपाच्या सूचना आल्या. यामुळे पात्र शेतकऱ्यांना ३१ आॅगस्टपर्यंत तातडीचे १० हजार रूपये मिळण्यास मदत होणार आहे.सचिवांच्या संपामुळे याद्या अडकल्यानवीन आदेशानुसार पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार कराव्या लागतील. मात्र ग्राम विविध सहकारी संस्थांचे सचिव विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संपावर आहे. त्यांचा संप अद्याप सुरूच आहे. हा संप मिटल्यानंतरच पात्र लाभार्थ्यांच्या याद्या करण्याची भूमिका त्यांनी घेतली. यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.