शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

२३०० कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 02:20 IST

राज्य शासनाने घोषित केल्यानुसार कर्जमाफीचा आदेश अखेर सहकार विभागात धडकला. या आदेशानुसार

तीन लाख शेतकरी : २००९ पासूनच्या थकबाकीदारांना लाभरूपेश उत्तरवार । लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने घोषित केल्यानुसार कर्जमाफीचा आदेश अखेर सहकार विभागात धडकला. या आदेशानुसार जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना तब्बल २३०० कोटींची कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्र्यांनी ५ जूनला राज्य कर्जमाफीची घोषणा केली. मात्र अध्यादेशात १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंतच्याच थकबाकीदार शेतकऱ्यांना माफी देण्याचे नमूद होते. त्यातून २०१२ पूर्वीचे थकबाकीदार शेतकरी वगळण्यात आले होते. यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक होत आंदोलन केले. कर्जमाफीच्या अध्यादेशाची होळी करून संताप व्यक्त केला. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील स्थितीचा संबंधित पालकमंत्र्यांकडून आढावा घेतला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सीच्या माध्यमातून सहकार विभाग व बँक अधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले. नंतर कर्जमाफीचा सुधारित अध्यादेश काढण्यात आला.राज्य शासनाने काढलेल्या नवीन अध्यादेशात आता १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे नमूद करण्यात आले आहे. राज्याच्या सहकार विभागाचे कार्यासन अधिकारी दीपक राणे यांच्या स्वाक्षरीचा हा अध्यादेश येथील सहकार विभागात धडकला आहे. या सुधारित अध्यादेशानुसार जिल्ह्यातील तीन लाख थकबाकीदार शेतकऱ्यांना २३०० कोटींची कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी आता बँकांना याद्या तयार कराव्या लागणार आहे. या यादीत नेमका कुणाचा समावेश होतो, याची आता उत्सुकता आहे. तथापि तीन लाख शेतकऱ्यांना या यादीत स्थान मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. अग्रीम कर्ज वाटपाचे आदेश धडकलेराष्ट्रीयकृत बँकांनी विभागीय कार्यालयाकडून सूचना नसल्याने शेतकऱ्यांना तातडीचे १० हजारांचे कर्ज देण्यास आखडता हात घेतला. आता या बँकांना त्यांच्या विभागीय कार्यालयाकडून तातडीचे कर्ज वाटपाच्या सूचना आल्या. यामुळे पात्र शेतकऱ्यांना ३१ आॅगस्टपर्यंत तातडीचे १० हजार रूपये मिळण्यास मदत होणार आहे.सचिवांच्या संपामुळे याद्या अडकल्यानवीन आदेशानुसार पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार कराव्या लागतील. मात्र ग्राम विविध सहकारी संस्थांचे सचिव विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संपावर आहे. त्यांचा संप अद्याप सुरूच आहे. हा संप मिटल्यानंतरच पात्र लाभार्थ्यांच्या याद्या करण्याची भूमिका त्यांनी घेतली. यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.