शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
3
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
4
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
5
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
6
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
7
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
8
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
9
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
11
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
12
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
13
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
14
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
15
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
16
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
17
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
18
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
19
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
20
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट

पडिक जमिनीवर २३ लाख वृक्षांची लागवड

By admin | Updated: March 30, 2015 02:00 IST

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्ष लागवडीचा मोठा कार्यक्रम शासनाच्यावतीने हाती घेण्यात आला आहे.

यवतमाळ : पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्ष लागवडीचा मोठा कार्यक्रम शासनाच्यावतीने हाती घेण्यात आला आहे. विविध योजनांच्या माध्यमातून दरवर्षी लाखो वृक्षांची लागवड केली जाते. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात रोजगार हमी योजनेंतर्गत वनेत्तर खासगी पडीक जमिनीवर एक हजार १६९ हेक्टर मध्ये २२ लाख ६५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत सामाजिक वनिकरण विभागाच्यावतीने दरवर्षी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात येतो. गेल्या पाच वर्षात पडीक जमिनी तसेच रस्त्यांच्या काठांवर वृक्ष लागवडीचा व्यापक कार्यक्रम राबविण्यात आल्याने या योजनेतून वाढलेली लाखो झाडे पर्यावरणाला हातभार लावीत आहे. २००८-०९ यावर्षी ४१० हेक्टर खाजगी पडीक जमिनीवर ६ लाख २६ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली होती. २००९-१० मध्ये ३२८ हेक्टरवर ६ लाख ३३ हजार वृक्ष, २०१०-११ मध्ये २२४ हेक्टरवर ५ लाख ४९ हजार वृक्ष, २०११-१२मध्ये १८२ हेक्टरवर ३ लाख २६ हजार वृक्ष तर २०१२-१३ मध्ये ५३ हेक्टरवर १ लाख ३१ हजार वृक्षांची अशी एकूण १ हजार १९७ हेक्टरवर २२ लाख ६५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लागवड केलेली सरासरी ७५ टक्के झाडे जोमाने वाढली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गतच रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याची योजना राबविली जात असून २००८-०९ पासून या योजनेंतर्गत जिल्ह्यात २३३ किलो मिटर लांबीच्या मार्गावर दुतर्फा झाडे लावण्यात आली आहे. त्यात १ लाख ३८ हजार झाडांचा समावेश आहे. गट लागवड योजनेंतर्गत २३ हेक्टरवर ३८ हजार वृक्ष लावले आहे. बांबु मिशन योजनेंतर्गत गेल्या चार वर्षात ६० हेक्टरवर २४ हजार रोपे लावल्या गेली. किसान रोपवाटिके अंतर्गत गेल्या पाच वर्षात ७ लाख ६७ हजार रोपे तयार करण्यात आली आहे. तर लाभार्थ्यांना ६ लाख ५० हजाराचा अग्रीम देण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षात वनमहोत्सव रोपवाटिकेच्या माध्यमातून २९ हजार, मध्यवर्ती रोपवाटिकेव्दारे ३ लाख २४ हजार तर गेल्या दोन वर्षात महात्मा गांधी रोहयोव्दारे ९ लाख ६१ हजार रोपे तयार केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)