शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

पडिक जमिनीवर २३ लाख वृक्षांची लागवड

By admin | Updated: March 30, 2015 02:00 IST

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्ष लागवडीचा मोठा कार्यक्रम शासनाच्यावतीने हाती घेण्यात आला आहे.

यवतमाळ : पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्ष लागवडीचा मोठा कार्यक्रम शासनाच्यावतीने हाती घेण्यात आला आहे. विविध योजनांच्या माध्यमातून दरवर्षी लाखो वृक्षांची लागवड केली जाते. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात रोजगार हमी योजनेंतर्गत वनेत्तर खासगी पडीक जमिनीवर एक हजार १६९ हेक्टर मध्ये २२ लाख ६५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत सामाजिक वनिकरण विभागाच्यावतीने दरवर्षी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात येतो. गेल्या पाच वर्षात पडीक जमिनी तसेच रस्त्यांच्या काठांवर वृक्ष लागवडीचा व्यापक कार्यक्रम राबविण्यात आल्याने या योजनेतून वाढलेली लाखो झाडे पर्यावरणाला हातभार लावीत आहे. २००८-०९ यावर्षी ४१० हेक्टर खाजगी पडीक जमिनीवर ६ लाख २६ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली होती. २००९-१० मध्ये ३२८ हेक्टरवर ६ लाख ३३ हजार वृक्ष, २०१०-११ मध्ये २२४ हेक्टरवर ५ लाख ४९ हजार वृक्ष, २०११-१२मध्ये १८२ हेक्टरवर ३ लाख २६ हजार वृक्ष तर २०१२-१३ मध्ये ५३ हेक्टरवर १ लाख ३१ हजार वृक्षांची अशी एकूण १ हजार १९७ हेक्टरवर २२ लाख ६५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लागवड केलेली सरासरी ७५ टक्के झाडे जोमाने वाढली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गतच रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याची योजना राबविली जात असून २००८-०९ पासून या योजनेंतर्गत जिल्ह्यात २३३ किलो मिटर लांबीच्या मार्गावर दुतर्फा झाडे लावण्यात आली आहे. त्यात १ लाख ३८ हजार झाडांचा समावेश आहे. गट लागवड योजनेंतर्गत २३ हेक्टरवर ३८ हजार वृक्ष लावले आहे. बांबु मिशन योजनेंतर्गत गेल्या चार वर्षात ६० हेक्टरवर २४ हजार रोपे लावल्या गेली. किसान रोपवाटिके अंतर्गत गेल्या पाच वर्षात ७ लाख ६७ हजार रोपे तयार करण्यात आली आहे. तर लाभार्थ्यांना ६ लाख ५० हजाराचा अग्रीम देण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षात वनमहोत्सव रोपवाटिकेच्या माध्यमातून २९ हजार, मध्यवर्ती रोपवाटिकेव्दारे ३ लाख २४ हजार तर गेल्या दोन वर्षात महात्मा गांधी रोहयोव्दारे ९ लाख ६१ हजार रोपे तयार केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)