शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

दारव्हात २३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 05:00 IST

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शहरात प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. पाच प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले. नागरिकांना आरोग्यासह विविध सुविधा पुरविल्या जात आहे. नियम मोडणाऱ्यांविरूद्ध कारवाई केली जात आहे. मात्र कोरोनाला पूर्णपणे रोखण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची नितांत आवश्यकता असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देएकूण संख्या ६२ : तिघांचा मृत्यू, उपाययोजनांना आला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६२ वर पोहोचली. त्यामधील तिघांचा मृत्यू झाला असून ३६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आता अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३ आहे. परंतु दिवसेंदिवस रुग्णांमध्ये भर पडत असल्याने शहरवासीयांची चिंता वाढली आहे.कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शहरात प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. पाच प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले. नागरिकांना आरोग्यासह विविध सुविधा पुरविल्या जात आहे. नियम मोडणाऱ्यांविरूद्ध कारवाई केली जात आहे. मात्र कोरोनाला पूर्णपणे रोखण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची नितांत आवश्यकता असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. सुरुवातीच्या काळात केवळ एक रुग्ण असलेल्या दारव्हा शहरात नंतर वेगवेगळ्या कनेक्शनमधून पाच जणांना लागण झाली. त्यांच्या नजीकच्या संपर्कात येणारे अनेकजण बाधित झाल्याने आत्तापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ६२ वर पोहोचला आहे. त्यामधील तिघांचा मृत्यू झाला.शहरात अचानक ज्या वेगाने रुग्णांची वाढ झाली, त्यामुळे प्रशासन हादरून गेले आहे. कोरोनाला पायबंद घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात दाखल होऊन संपूर्ण मोर्चा आपल्या हातात घेतला. शहरात पाच प्रतिबंधित क्षेत्र तयार केले. पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या घराच्या १00 मीटर अंतरावरील व संपर्कात येणाºयांना तत्काळ संस्थात्मक विलगीकरणात पाठविण्यात येत आहे. सतत आरोग्य सर्वेक्षण सुरू आहे. या सर्व बाबींचा नियमित डाटा तयार करून जिल्हाधिकाºयांना पाठविला जात आहे. त्यानुसार सूचना देऊन नवीन चमूकडून काम करून घेतले जात आहे.जिल्हाधिकारी एम.डी. सिंग शहराला भेट देऊन परिस्थितीचा सतत आढाव घेत आहे. तहसीलदार डॉ.संतोष डोईफोडे, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, मुख्याधिकारी धीरज गोहाड, वैद्यकीय अधीक्षक गजानन खरोडे, ठाणेदार मनोज केदारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.खलील बेग, उपजिल्हाधिकारी दळवी, उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल, प्रभारी तहसीलदार संजय जाधव, नायब तहसीलदार होटे, तुपसुंदरे, कापडे यांच्यासह महसूल प्रशासन, शासकीय रुग्णालय, नगरपरिषद, पोलीस, यासह संबंधित स्थानिक यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी २४ तास परिश्रम घेत आहे.दुकानांच्या वेळात आजपासून बदलशहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता १५ दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. आता पुन्हा रुग्ण वाढल्याने पोलीस ठाण्यात अधिकारी आणि व्यापारी बांधवांच्या बैठकीत रविवारपासून सर्व व्यवहार सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या