शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

१६ वर्षांत २२९ शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: March 17, 2017 02:50 IST

महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या महागाव तालुक्यात गत १६ वर्षांत २२९ शेतकऱ्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.

महागाव तालुक्यात नापिकी : साहेबराव पाटलांच्या आत्महत्येची धग महागाव : महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या महागाव तालुक्यात गत १६ वर्षांत २२९ शेतकऱ्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. चिलगव्हाण येथील साहेबराव पाटलांच्या आत्महत्येनंतरही अद्यापपर्यंत आत्महत्तेचे सत्र थांबले नाही. आता १९ मार्च रोजी शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केले जात आहे. महागाव हा आदिवासीबहुल तालुका असून या तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या ३० हजार आहे. बहुतांश कुटुंब केवळ शेतीवरच उपजीविका करतात. परंतु गत काही वर्षांपासून नापिकीमुळे शेतकऱ्यांची आर्थिकस्थिती खालावली. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी गळफास लावून जीवनयात्रा संपवली. महागाव तालुक्यात एका पाठोपाठ एक २२९ शेतकऱ्यांनी १६ वर्षात मृत्यूला कवटाळले आहे. महागाव तालुक्यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आणि कोरडवाहू आहे. शासकीय योजनांची माहिती मिळत नाही. सिंचनासाठी वेणी प्रकल्प असला तरी अद्यापपर्यंत त्याचे पाणी टेलपर्यंत पोहोचले नाही. अशा परिस्थितीत महागाव तालुक्यावर निसर्गाची अवकृपा असते. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत जातात. त्यातूनच आत्महत्या होत आहे. शासकीयस्तरावर केवळ पॅकेजेस दिले जात असले तरी ठोस उपाययोजना मात्र होत नाही. आता १९ मार्च रोजी होणाऱ्या अन्नत्याग आंदोलनाने महागाव तालुका पुन्हा चर्चेत आला असून शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आहे. महागावसारखीच अवस्था जिल्ह्यातील इतरही तालुक्यांची आहे. दररोज आजही कुठे ना कुठे आत्महत्या होत असल्याने आकडे फुगत चालले आहेत. (शहर प्रतिनिधी)