शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

१६ वर्षांत २२९ शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: March 17, 2017 02:50 IST

महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या महागाव तालुक्यात गत १६ वर्षांत २२९ शेतकऱ्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.

महागाव तालुक्यात नापिकी : साहेबराव पाटलांच्या आत्महत्येची धग महागाव : महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या महागाव तालुक्यात गत १६ वर्षांत २२९ शेतकऱ्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. चिलगव्हाण येथील साहेबराव पाटलांच्या आत्महत्येनंतरही अद्यापपर्यंत आत्महत्तेचे सत्र थांबले नाही. आता १९ मार्च रोजी शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केले जात आहे. महागाव हा आदिवासीबहुल तालुका असून या तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या ३० हजार आहे. बहुतांश कुटुंब केवळ शेतीवरच उपजीविका करतात. परंतु गत काही वर्षांपासून नापिकीमुळे शेतकऱ्यांची आर्थिकस्थिती खालावली. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी गळफास लावून जीवनयात्रा संपवली. महागाव तालुक्यात एका पाठोपाठ एक २२९ शेतकऱ्यांनी १६ वर्षात मृत्यूला कवटाळले आहे. महागाव तालुक्यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आणि कोरडवाहू आहे. शासकीय योजनांची माहिती मिळत नाही. सिंचनासाठी वेणी प्रकल्प असला तरी अद्यापपर्यंत त्याचे पाणी टेलपर्यंत पोहोचले नाही. अशा परिस्थितीत महागाव तालुक्यावर निसर्गाची अवकृपा असते. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत जातात. त्यातूनच आत्महत्या होत आहे. शासकीयस्तरावर केवळ पॅकेजेस दिले जात असले तरी ठोस उपाययोजना मात्र होत नाही. आता १९ मार्च रोजी होणाऱ्या अन्नत्याग आंदोलनाने महागाव तालुका पुन्हा चर्चेत आला असून शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आहे. महागावसारखीच अवस्था जिल्ह्यातील इतरही तालुक्यांची आहे. दररोज आजही कुठे ना कुठे आत्महत्या होत असल्याने आकडे फुगत चालले आहेत. (शहर प्रतिनिधी)