शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

१६ वर्षांत २२९ शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: March 17, 2017 02:50 IST

महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या महागाव तालुक्यात गत १६ वर्षांत २२९ शेतकऱ्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.

महागाव तालुक्यात नापिकी : साहेबराव पाटलांच्या आत्महत्येची धग महागाव : महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या महागाव तालुक्यात गत १६ वर्षांत २२९ शेतकऱ्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. चिलगव्हाण येथील साहेबराव पाटलांच्या आत्महत्येनंतरही अद्यापपर्यंत आत्महत्तेचे सत्र थांबले नाही. आता १९ मार्च रोजी शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केले जात आहे. महागाव हा आदिवासीबहुल तालुका असून या तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या ३० हजार आहे. बहुतांश कुटुंब केवळ शेतीवरच उपजीविका करतात. परंतु गत काही वर्षांपासून नापिकीमुळे शेतकऱ्यांची आर्थिकस्थिती खालावली. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी गळफास लावून जीवनयात्रा संपवली. महागाव तालुक्यात एका पाठोपाठ एक २२९ शेतकऱ्यांनी १६ वर्षात मृत्यूला कवटाळले आहे. महागाव तालुक्यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आणि कोरडवाहू आहे. शासकीय योजनांची माहिती मिळत नाही. सिंचनासाठी वेणी प्रकल्प असला तरी अद्यापपर्यंत त्याचे पाणी टेलपर्यंत पोहोचले नाही. अशा परिस्थितीत महागाव तालुक्यावर निसर्गाची अवकृपा असते. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत जातात. त्यातूनच आत्महत्या होत आहे. शासकीयस्तरावर केवळ पॅकेजेस दिले जात असले तरी ठोस उपाययोजना मात्र होत नाही. आता १९ मार्च रोजी होणाऱ्या अन्नत्याग आंदोलनाने महागाव तालुका पुन्हा चर्चेत आला असून शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आहे. महागावसारखीच अवस्था जिल्ह्यातील इतरही तालुक्यांची आहे. दररोज आजही कुठे ना कुठे आत्महत्या होत असल्याने आकडे फुगत चालले आहेत. (शहर प्रतिनिधी)