शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

२२०० आदिवासी विद्यार्थी अडचणीत

By admin | Updated: June 27, 2015 00:29 IST

आदिवासी प्रकल्प कार्यालयाची भोजन पुरवठा निविदा रखडल्याने १९ वसतिगृहातील २२०० आदिवासी विद्यार्थ्यांच्या भोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

भोजनाचे वांदे : १९ वसतिगृह, पुरवठ्याचा वादप्रवीण पिन्नमवार पांढरकवडा आदिवासी प्रकल्प कार्यालयाची भोजन पुरवठा निविदा रखडल्याने १९ वसतिगृहातील २२०० आदिवासी विद्यार्थ्यांच्या भोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना भोजन कसे द्यावे असा प्रश्न गृहपालांपुढे पडला आहे. येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत १९ शासकीय वसतिगृह चालविले जातात. या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी २२ मे रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. १५ जून रोजी निविदा उघडण्यात येईल, असे सांगण्यात आले. परंतु निविदा उघडली गेली नाही. अधिक माहिती घेतली असता यवतमाळच्या मुंगसाजी सेल्स अ‍ॅन्ड सर्व्हिसेस या जुन्या भोजन पुरवठाधारकाने नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांनी १० एप्रिल २०१३ व ४ मार्च २०१४ रोजीच्या आदिवासी विभागाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे. जोपर्यंत न्यायालयाचा निकाल येत नाही. तोपर्यंत सदर नवीन निविदा प्रक्रिया राबविता येणार नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, २६ जूनपासून शाळांना प्रारंभ झाला. आदिवासी वसतिगृहात विद्यार्थी दाखल झाले. परंतु त्यांना भोजन कसे द्यावे, असा प्रश्न गृहपालांपुढे पडला. विशेष म्हणजे गत काही दिवसांपासून नियमित प्रकल्प अधिकारी नसल्याने कार्यालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. परंतु विद्यार्थ्यांचे भोजनासाठी हाल होऊ नये म्हणून न्यायालयाचा निकाल येईपर्यंत वसतिगृहाच्या गृहपालांना या विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्याचे आदेश दिल्याचे प्रकल्प अधिकारी डाखोरे यांनी सांगितले. पांढरकवडा प्रकल्पाविरुद्ध याचिकाआदिवासी विभागाच्या नवीन निर्णयानुसार प्रति विद्यार्थी प्रतिमाह ३ हजार ६५ रुपये तर प्रति विद्यार्थिनी २ हजार ८०० रुपये भोजन दर निर्धारित करण्यात आला. जुन्या पुरवठाधारकांंना हा दर मान्य नसल्याचे सांगण्यात आले. गतवर्षी प्रति विद्यार्थी ३ हजार ५०० रुपये आणि प्रति विद्यार्थिनी ३ हजार २०० रुपये दर होता. अमरावती विभागात ३ हजार ५०० ते चार हजारपर्यंत भोजन दर असल्याचे सांगण्यात येते आणि हाच येथे कळीचा मुद्दा झाला आहे. आदिवासी व्यक्तींच्या बचत गटांना प्राधान्यक्रमाचा मुद्दाही याचिकेत निर्माण केल्याची माहिती आहे.