शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

घाटंजीतील २२ गावे टंचाईमुक्त होणार

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेले तालुक्यातील २२ गावे लवकरच टंचाईमुक्त होणार आहे.

राजू तोडसाम : आर्णी विधानसभेसाठी आठ कोटी मंजूरघाटंजी : पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेले तालुक्यातील २२ गावे लवकरच टंचाईमुक्त होणार आहे. विविध योजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीमधून कामे हाती घेतली जाणार आहे. आर्णी विधानसभा क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनांकरिता आठ कोटी रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती आमदार राजू तोडसाम यांनी दिली. घाटंजी तालुक्यातील जरुर, कोपरी खु., पार्डी कालेश्वर, सेवादास नगर, अंबेझरी, शिरोली, हेटी तांडा, केळापूर तांडा, तरोडा, माणूसधरी, तिवसाळा, मांडवा, माथनी, राजेगाव, शिवणी, निबर्डा, ससाणी, पाटापांगरा, पंगडी, पांढुर्णा बु., बोधडी, कुर्ली येथे विशेष नळदुरूस्तीची योजना राबविली जाणार आहे. पाणीटंचाई कार्यक्रम सन २०१५-१६ अंतर्गत मंजूर झालेल्या निधीतून ही कामे होणार आहेत. आर्णी विधानसभा क्षेत्रातील विविध गावांना पाणीप्रश्नाला सामोरे जावे लागते. काही गावांना टॅँकरने पाणीपुरवठा केला जातो. हा प्रश्न गांभिर्याने घेत पाठपुरावा करण्यात आला. शासनस्तरावर निधीची मागणी रेटून धरली. यासाठी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही पुढाकार घेतला. त्यामुळे या विधानसभा क्षेत्रासाठी आठ कोटी रुपये मंजूर झाले आहे. केळापूर, घाटंजी, आर्णी तालुक्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी विविध योजना राबविल्या जाणार आहेत. जिल्हा वार्षीक आदिवासी उपयोजना सन २०१५-१६ अंतर्गत एक कोटी ७१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यातून केळापूर तालुक्यातील धरमगोटा पोड, शिवनाळा पोड, वेडद पोड, कारेगाव ब., वळवाट, घाटंजी तालुक्यातील कापशी, कोपरी, कालेश्वर पार्डी आदी गावांमध्ये कामे हाती घेतली जाणार आहे. ठक्करबाप्पा योजनेतून केळापुरातील मांजरी पोड, बोथ अंबोरा, भाडउमरी, बहात्तर तर घाटंजी तालुक्यातील पार्डी कालेश्वर, कोपरी कापशी, रहाटी, मोवाडा, कोप्रा वन, मांडवा येथे कामे केली जाणार आहे. विशेष नळदुरूस्ती योजनेतून केळापूर, घाटंजी आणि आर्णी तालुक्यातील नळयोजनेची कामे होणार आहेत. यात केळापूर येथील पिंप्री पोड, अर्ली, बोरगाव, किन्हाळा, कोठोडा, सुन्ना, उमरी रोड, घुबडी, झुली, चिखलधरा पोड, जिरा, अडणी आणि आर्णी तालुक्यातील भंडारी शिवर, साखरा, काकडदरा, खंडाळा, देऊरवाडी बु., लोणबेहळ, म्हसोला, बोरगाव दा., दहेली, देवगाव, सायखेडा, वरुड भ., नवनगर, शेलू ब्राह्मणवाडा, शेंदुरसनी, कोसदणी, उमरी पठार, अंबोडा, सुधाकरनगर, कुऱ्हातळणी, जवळा, कृष्णनगर आदी गावे टंचाईमुक्त होणार असल्याचे आमदार तोडसाम यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब चावरे, विपीन राठोड, विलास पाटील गरड, राजू शुक्ला, अशोक राठोड, जीवन मुद्दलवार, रमेश उग्गेवार, संतोष सिर्तावार, अरुण देऊळकर, सुबोध काळपांडे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)