शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

घाटंजीतील २२ गावे टंचाईमुक्त होणार

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेले तालुक्यातील २२ गावे लवकरच टंचाईमुक्त होणार आहे.

राजू तोडसाम : आर्णी विधानसभेसाठी आठ कोटी मंजूरघाटंजी : पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेले तालुक्यातील २२ गावे लवकरच टंचाईमुक्त होणार आहे. विविध योजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीमधून कामे हाती घेतली जाणार आहे. आर्णी विधानसभा क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनांकरिता आठ कोटी रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती आमदार राजू तोडसाम यांनी दिली. घाटंजी तालुक्यातील जरुर, कोपरी खु., पार्डी कालेश्वर, सेवादास नगर, अंबेझरी, शिरोली, हेटी तांडा, केळापूर तांडा, तरोडा, माणूसधरी, तिवसाळा, मांडवा, माथनी, राजेगाव, शिवणी, निबर्डा, ससाणी, पाटापांगरा, पंगडी, पांढुर्णा बु., बोधडी, कुर्ली येथे विशेष नळदुरूस्तीची योजना राबविली जाणार आहे. पाणीटंचाई कार्यक्रम सन २०१५-१६ अंतर्गत मंजूर झालेल्या निधीतून ही कामे होणार आहेत. आर्णी विधानसभा क्षेत्रातील विविध गावांना पाणीप्रश्नाला सामोरे जावे लागते. काही गावांना टॅँकरने पाणीपुरवठा केला जातो. हा प्रश्न गांभिर्याने घेत पाठपुरावा करण्यात आला. शासनस्तरावर निधीची मागणी रेटून धरली. यासाठी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही पुढाकार घेतला. त्यामुळे या विधानसभा क्षेत्रासाठी आठ कोटी रुपये मंजूर झाले आहे. केळापूर, घाटंजी, आर्णी तालुक्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी विविध योजना राबविल्या जाणार आहेत. जिल्हा वार्षीक आदिवासी उपयोजना सन २०१५-१६ अंतर्गत एक कोटी ७१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यातून केळापूर तालुक्यातील धरमगोटा पोड, शिवनाळा पोड, वेडद पोड, कारेगाव ब., वळवाट, घाटंजी तालुक्यातील कापशी, कोपरी, कालेश्वर पार्डी आदी गावांमध्ये कामे हाती घेतली जाणार आहे. ठक्करबाप्पा योजनेतून केळापुरातील मांजरी पोड, बोथ अंबोरा, भाडउमरी, बहात्तर तर घाटंजी तालुक्यातील पार्डी कालेश्वर, कोपरी कापशी, रहाटी, मोवाडा, कोप्रा वन, मांडवा येथे कामे केली जाणार आहे. विशेष नळदुरूस्ती योजनेतून केळापूर, घाटंजी आणि आर्णी तालुक्यातील नळयोजनेची कामे होणार आहेत. यात केळापूर येथील पिंप्री पोड, अर्ली, बोरगाव, किन्हाळा, कोठोडा, सुन्ना, उमरी रोड, घुबडी, झुली, चिखलधरा पोड, जिरा, अडणी आणि आर्णी तालुक्यातील भंडारी शिवर, साखरा, काकडदरा, खंडाळा, देऊरवाडी बु., लोणबेहळ, म्हसोला, बोरगाव दा., दहेली, देवगाव, सायखेडा, वरुड भ., नवनगर, शेलू ब्राह्मणवाडा, शेंदुरसनी, कोसदणी, उमरी पठार, अंबोडा, सुधाकरनगर, कुऱ्हातळणी, जवळा, कृष्णनगर आदी गावे टंचाईमुक्त होणार असल्याचे आमदार तोडसाम यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब चावरे, विपीन राठोड, विलास पाटील गरड, राजू शुक्ला, अशोक राठोड, जीवन मुद्दलवार, रमेश उग्गेवार, संतोष सिर्तावार, अरुण देऊळकर, सुबोध काळपांडे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)