शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

वेतनासाठी २२ हजार शिक्षक आक्रमक

By admin | Updated: October 14, 2016 02:54 IST

गेल्या १६ वर्षांपासून बिनपगारी काम करीत असलेल्या विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील २२ हजार शिक्षकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे

अविनाश साबापुरे / यवतमाळगेल्या १६ वर्षांपासून बिनपगारी काम करीत असलेल्या विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील २२ हजार शिक्षकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. शंभर टक्के पगाराच्या मागणीसाठी यंदाच्या दिवाळीत सहकुटुंब उपोषण करण्याचा निर्णय या शिक्षकांनी घेतला असून, त्या आधी मंगळवारपासून आठवडाभर राज्यव्यापी अभिनव मोर्चे काढण्यात येणार आहेत.ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना गावातच किंवा गावाजवळच शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने मोठ्या संख्येने उच्च माध्यमिक विद्यालयांना मान्यता प्रदान केली. ही विद्यालये कायम विनाअनुदान तत्त्वावरच सुरू करण्यात आली होती. मात्र, आघाडी शासनाच्या काळात फेब्रुवारी २०१४मध्ये या उच्च माध्यमिक विद्यालयांचा ‘कायम विनाअनुदानित’ हा शब्द वगळण्यात आला. शासनाच्या या निर्णयानंतर संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांचे मूल्यांकनही करण्यात आले. विशेष म्हणजे, या मूल्यांकनात ७०० उच्च माध्यमिक विद्यालये पात्र ठरली आहेत. मात्र, मूल्यांकन होऊन दोन वर्षे उलटली, तरीही त्यांना वेतनअनुदान देण्यात आलेले नाही.सतत १६ वर्षांपासून येथील शिक्षक एक रुपयाही पगार न घेता काम करीत आहेत. त्यामुळे आता या उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांना १०० टक्के वेतनअनुदान मिळावे, अशी मागणी आहे. त्यासाठीच महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीने आता राज्यव्यापी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मंगळवारपासून २५ आॅक्टोबरपर्यंत सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.