शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारी जिल्ह्यात धावल्या २२ एसटी बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील बस वाहतूक सेवा पूर्ववत होण्यास वेग आला आहे. मात्र अद्यापही परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप कायम आहे. काही कर्मचारी कामावर परत येत असले तरी बहुतांश कर्मचारी महामंडळाच्या शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर ठाम आहे. त्यामुळे महामंडळ प्रशासन पेचात पडले आहे. तर ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या बंद असल्याने प्रवाशांचे हाल अद्यापही सुरूच आहे. दरम्यान गुरुवारी यवतमाळातील एक कर्मचारी बेपत्ता झाल्याची पोस्ट सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपातील काही कर्मचारी कामावर रुजू होत असल्याने एसटी बस मार्गावर सोडण्याची संख्या वाढत चालली आहे. बुधवारी चार आगारांतून २२ बसद्वारे प्रवासी वाहतूक करण्यात आली. दरम्यान, नेर आगाराचा एक निलंबित चालक कामावर हजर झाला आहे. एसटीचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. यातील काही कर्मचाऱ्यांवर निलंबन, सेवासमाप्ती आदी प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. दरम्यान, संपातील काही कर्मचारी कामावर येत आहेत. याच कर्मचाऱ्यांच्या भरवशावर बस सोडल्या जात आहेत. बुधवारी यवतमाळ आगारातून सहा, वणी सात, पांढरकवडा आठ आणि नेर आगारातून एक बस सोडण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.जिल्ह्यातील बस वाहतूक सेवा पूर्ववत होण्यास वेग आला आहे. मात्र अद्यापही परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप कायम आहे. काही कर्मचारी कामावर परत येत असले तरी बहुतांश कर्मचारी महामंडळाच्या शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर ठाम आहे. त्यामुळे महामंडळ प्रशासन पेचात पडले आहे. तर ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या बंद असल्याने प्रवाशांचे हाल अद्यापही सुरूच आहे. दरम्यान गुरुवारी यवतमाळातील एक कर्मचारी बेपत्ता झाल्याची पोस्ट सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. या कर्मचाऱ्याची अन्यायकारकरीत्या पुसद आगारात बदली करण्यात आल्यामुळे तो निराशेने घरातून निघून गेल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची तीव्रता आणखी एकदा सर्वांच्या नजरेपुढे आली. शनिवारी जिल्ह्यात विविध आगारातून २२ बसफेऱ्या सोडल्या गेल्या. त्यामुळे प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळाला. मात्र जिल्ह्यातील प्रवाशांची संख्या बघता या बसफेऱ्या अगदीच तोकड्या ठरल्या. संप कायमचा मिटल्याशिवाय जिल्ह्यातील सर्व आगारातून नियोजित बसफेऱ्या पूर्ण क्षमतेने सोडणे जवळपास अशक्य आहे. शासन स्तरावरून संप मिटविण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी विलीनीकरणाची मागणी मान्य होत नसल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत. 

सोमवारपर्यंत कामावर परतण्याचा ‘अल्टिमेटम’- महिनाभरापासून कर्मचारी संपावर गेल्याने बसफेऱ्यांवर विपरित परिणाम झाला आहे. दरम्यान सोमवारी सायंकाळपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे असा अल्टिमेटम परिवहन मंत्र्यांनी दिला आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत रुजू न झाल्यास गंभीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी किती कर्मचारी या अल्टिमेटमला जुमानतात याकडे नजरा आहे.  

टॅग्स :ST Strikeएसटी संप