शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

जिल्ह्यात तलाठ्यांसाठी २१३ कार्यालये मंजूर

By admin | Updated: December 12, 2015 05:17 IST

जिल्ह्यात ज्या ठिकाणी तलाठी कार्यालये नाहीत, अशा तब्बल २१३ गावांमध्ये कार्यालयासाठी बांधकामे मंजूर झाली

३८ कोटींचे बजेट : पालकमंत्र्यांचा पुढाकार, लवकरच बांधकामयवतमाळ : जिल्ह्यात ज्या ठिकाणी तलाठी कार्यालये नाहीत, अशा तब्बल २१३ गावांमध्ये कार्यालयासाठी बांधकामे मंजूर झाली आहेत. या बांधकामांवर ३७.७२ कोटी रूपए खर्च केले जाणार आहेत. पालकमंत्री संजय राठोड यांनी महसूल राज्यमंत्री पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर स्वत:ची कार्यालये नसलेल्या गावांना हक्काच्या इमारती बांधून देण्याचा निर्धार केला होता. राज्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर तलाठी कार्यालयाची बांधकामे मंजूर झाली असून जिल्ह्यासाठी ही मोठी उपलब्धी आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी तलाठी कार्यालये नाहीत. त्यामुळे भाड्याच्या जागेत कार्यालये चालविली जात आहेत. काही ठिकाणी तर केवळ कार्यालयासाठी जागा नसल्याने तलाठी गावात थांबू शकत नसल्याचे चित्र आहे. यामुळे ग्रामीण भागासाठी अतिशय महत्वाच्या या कार्यालयाच्या कामकाजात अडथळे निर्माण होत होते. पालकमंत्री संजय राठोड यांनी महसूल राज्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर जिल्हास्तरावर वारंवार बैठका घेऊन कार्यालये नसलेल्या गावांच्या याद्या तयार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास केल्या होत्या. त्यानुसार गावनिहाय तपासणी करून कार्यालये नसलेल्या गावांची यादी तयार करण्यात आली होती. त्याप्रमाणे गावनिहाय बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करून प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. तलाठी कार्यालयाच्या बांधकामाचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला असून यासाठी लागणाऱ्या खर्चाचा मंगळवारी विधानसभेत सादर झालेल्या पुरवणी मागण्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात ज्या ठिकाणी शासकीय जमिनी उपलब्ध आहेत, अशा २१३ ठिकाणी तलाठी कार्यालये बांधली जाणार आहे. यावर ३७.७२ कोटी रुपये खर्च येणार असून प्रतितलाठी कार्यालय १२ लाख रूपये खर्चाचे अंदाजपत्रक आहे. विशेष म्हणजे याचवर्षी बांधकामास प्रारंभ होणार असून मंजूर रकमेच्या १० टक्के म्हणजे चार कोटी रुपये जिल्ह्यास उपलब्ध होत आहे. उर्वरित रक्कम पुढील आर्थिक वर्षात प्राप्त होणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)तलाठी कार्यालयांसाठी तालुकानिहाय निधी४ पुसद तालुक्यात १९ तलाठी कार्यालयाची बांधकामे मंजूर झाली असून यावर ३ कोटी ३४ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. झरी जामणी १५ कार्यालये २.७१ कोटी, राळेगाव १८ कार्यालये ३.१६ कोटी, बाभूळगाव १८ कार्यालये ३.१६ कोटी, दारव्हा १७ कार्यालये २.९९ कोटी, दिग्रस २२ कार्यालये ३.७८ कोटी, घाटंजी १३ कार्यालये २.२८ कोटी, उमरखेड २० कार्यालये ३.५२ कोटी, मारेगाव १३ कार्यालये २.३१ कोटी, वणी १८ कार्यालये ३.४४ कोटी, नेर १८ कार्यालये ३.१६ कोटी तर यवतमाळ तालुक्यात २२ तलाठी कार्यालयांसाठी ३.८७ कोटी रुपये मंजूर झाले.महसूल राज्यमंत्री म्हणून आपल्या जिल्ह्यासाठी हक्काची तलाठी कार्यालये व्हावी, असा माझा मानस होता. त्यादृष्टीने वारंवार बैठका व शासनास पाठपुरावा केल्याने ही फार मोठी उपलब्धी जिल्ह्यास प्राप्त झाली आहे. उर्वरित ठिकाणी जागेच्या उपलब्धतेनुसार प्रस्ताव सादर केले जाणार आहे. - संजय राठोड, पालकमंत्री