शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
3
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
4
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
5
₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
6
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
7
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
8
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
9
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
10
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
11
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
12
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
13
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
14
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
15
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
16
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
17
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
18
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
19
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
20
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी

‘बोंडअळी’चे २१ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 22:06 IST

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे वणी तालुक्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठीचा २० कोटी ७१ लाख १४ हजार २४८ रुपयांचा दुसऱ्या टप्प्याचा निधी प्राप्त झाला ....

ठळक मुद्देमदत निधी : १५ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे वणी तालुक्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठीचा २० कोटी ७१ लाख १४ हजार २४८ रुपयांचा दुसऱ्या टप्प्याचा निधी प्राप्त झाला असून येत्या आठ दिवसांत संबंधित शेतकऱ्यांना या निधीचे वाटप केले जाणार आहे.शासनाने बोंडअळीग्रस्तांसाठी मदत जाहीर केल्यानंतर सदर मदत दोन टप्प्यात मिळणार होती. त्यानुसार वणी तालुक्यासाठी पहिल्या टप्प्यात १३ कोटी ८० लाख ७१ हजार २११ रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. हा निधी तालुक्यातील ९२ गावांतील १३ हजार ५८५ शेतकऱ्यांना हेक्टरी सहा हजार ७०० रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत वितरीत करण्यात आला. पहिल्या टप्प्यातील निधी वितरीत झाल्यानंतर तालुक्यातील ७३ गावांतील १४ हजार ७३० बोंडअळीग्रस्त शेतकºयांना मदतीची प्रतीक्षा होती. मात्र बुधवारी दुसऱ्या टप्प्यातील २० कोटी ७१ लाख १४ हजार २४८ रुपयांचा निधी महसूल विभागाला प्राप्त झाला आहे.निधी प्राप्त झाल्यानंतर महसूल विभागाने तपासणी सुरू केली आहे.शासनाने जाहीर केल्याप्रमाणे बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना पुन्हा लाभ मिळू नये, याची खबरदारी महसूल विभागाकडून घेतली जात आहे. पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली, त्या शेतकऱ्यांची नावे दुसऱ्या टप्प्यातील यादीत आहे काय, याची तपासणी महसूल विभागाकडून केली जात आहे. या तपासणीनंतर लाभार्थ्यांची यादी तयार करून ती बँकेकडे धनादेशासह दिली जाणार आहे. त्यानंतर मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.मागील वर्षी पिकांना पोषक असा पाऊस झाल्याने कपाशीचे पीक जोमात वाढले. चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा असताना अचानक कपाशीवर बोंडअळीचा हल्ला झाला. बोंडअळीच्या उद्रेकाने हजारो हेक्टरवरील कपाशी उद्ध्वस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला. बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी नवनवे प्रयोग केले. वेगवेगळ्या औषधांच्या फवारण्या केल्या. त्यातून विषबाधेसारख्या जीवघेण्या घटना घडल्या. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदा शेतकऱ्यांवर असे संकट कोसळले.वणी विभागात अतिपावसाने शेतकऱ्यांचे नुकसानयंदा पावसाने कहर केला आहे. गेल्या १५ दिवसांपासून या भागात सातत्याने पाऊस सुरू आहे. सूर्यदर्शन अभावानेच होत आहे. या वातावरणाचा परिणाम शेती पिकावर होत आहे. सततच्या पावसाने शेतात कचरा झाला असून तो काढण्यासाठीही पाऊस उसंत देत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. अतिपावसामुळे पिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.