शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

‘बोंडअळी’चे २१ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 22:06 IST

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे वणी तालुक्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठीचा २० कोटी ७१ लाख १४ हजार २४८ रुपयांचा दुसऱ्या टप्प्याचा निधी प्राप्त झाला ....

ठळक मुद्देमदत निधी : १५ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे वणी तालुक्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठीचा २० कोटी ७१ लाख १४ हजार २४८ रुपयांचा दुसऱ्या टप्प्याचा निधी प्राप्त झाला असून येत्या आठ दिवसांत संबंधित शेतकऱ्यांना या निधीचे वाटप केले जाणार आहे.शासनाने बोंडअळीग्रस्तांसाठी मदत जाहीर केल्यानंतर सदर मदत दोन टप्प्यात मिळणार होती. त्यानुसार वणी तालुक्यासाठी पहिल्या टप्प्यात १३ कोटी ८० लाख ७१ हजार २११ रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. हा निधी तालुक्यातील ९२ गावांतील १३ हजार ५८५ शेतकऱ्यांना हेक्टरी सहा हजार ७०० रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत वितरीत करण्यात आला. पहिल्या टप्प्यातील निधी वितरीत झाल्यानंतर तालुक्यातील ७३ गावांतील १४ हजार ७३० बोंडअळीग्रस्त शेतकºयांना मदतीची प्रतीक्षा होती. मात्र बुधवारी दुसऱ्या टप्प्यातील २० कोटी ७१ लाख १४ हजार २४८ रुपयांचा निधी महसूल विभागाला प्राप्त झाला आहे.निधी प्राप्त झाल्यानंतर महसूल विभागाने तपासणी सुरू केली आहे.शासनाने जाहीर केल्याप्रमाणे बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना पुन्हा लाभ मिळू नये, याची खबरदारी महसूल विभागाकडून घेतली जात आहे. पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली, त्या शेतकऱ्यांची नावे दुसऱ्या टप्प्यातील यादीत आहे काय, याची तपासणी महसूल विभागाकडून केली जात आहे. या तपासणीनंतर लाभार्थ्यांची यादी तयार करून ती बँकेकडे धनादेशासह दिली जाणार आहे. त्यानंतर मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.मागील वर्षी पिकांना पोषक असा पाऊस झाल्याने कपाशीचे पीक जोमात वाढले. चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा असताना अचानक कपाशीवर बोंडअळीचा हल्ला झाला. बोंडअळीच्या उद्रेकाने हजारो हेक्टरवरील कपाशी उद्ध्वस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला. बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी नवनवे प्रयोग केले. वेगवेगळ्या औषधांच्या फवारण्या केल्या. त्यातून विषबाधेसारख्या जीवघेण्या घटना घडल्या. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदा शेतकऱ्यांवर असे संकट कोसळले.वणी विभागात अतिपावसाने शेतकऱ्यांचे नुकसानयंदा पावसाने कहर केला आहे. गेल्या १५ दिवसांपासून या भागात सातत्याने पाऊस सुरू आहे. सूर्यदर्शन अभावानेच होत आहे. या वातावरणाचा परिणाम शेती पिकावर होत आहे. सततच्या पावसाने शेतात कचरा झाला असून तो काढण्यासाठीही पाऊस उसंत देत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. अतिपावसामुळे पिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.