शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

बाबाजी दाते महिला बॅंक घोटाळ्यातील २०६ आरोपींना तूर्तास अटक नाही

By सुरेंद्र राऊत | Updated: September 8, 2024 19:05 IST

१४२ कर्जदारांचे व्यवहार थांबले : ओटीएससाठी न्यायालयाची हवी पूर्व परवानगी

यवतमाळ : येथील बाबाजी दाते महिला सहकारी बॅंकेत २४२ रुपयांचा अपहार झाल्याचे विशेष लेखा परीक्षणातून पुढे आले. यामध्ये २०६ जणांवर ठपका ठेवण्यात आला. त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले. या अपहाराची चौकशी करण्यासाठी विशेष समिती गठित करण्यात आली. आता या समितीने जेमतेम कामाला सुरुवात केली आहे. अजूनही अपहाराशी संबंधित दस्तावेज ताब्यात घेतलेले नाही. त्यामुळे या घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या आरोपींवर इतक्यात अटकेची कारवाई होण्याची कोणतीच शक्यता नाही. 

सहकार आयुक्त पुणे यांच्या आदेशावरून महिला बॅंकेतील घोटाळ्याची विशेष लेखा परीक्षकांनी चौकशी केली. त्यानंतर यामध्ये सहभाग असणाऱ्यांवर ठपका ठेवत तसा अहवाल तयार केला. या अहवालानुसार गुन्हे दाखल झाले. त्यानंतरही या २४२ कोटींच्या घोटाळ्यात तडकाफडकी कारवाई होताना दिसत नाही. तपास करणाऱ्या विशेष समितीने ४ सप्टेंबर रोजी बॅंक अवसायकांना पत्र देऊन गुन्हा दाखल झालेल्या कर्जदारांची ओटीएस प्रक्रिया थेट करू नये असे निर्देश दिले आहे. आरोपी कर्जदारांना कर्जाची परतफेड करायची असेल तर न्यायालयाची पूर्वपरवानगी घ्यावी, अशी अट घालण्यात आली आहे. ज्या १४२ कर्जदारांकडेन २४२ कोटी अडकले आहेत. ती रक्कम वसुलीसाठी नवा अडथळा निर्माण झाला आहे. फौजदारी कारवाईत गुंतागुंत निर्माण होऊ नये यासाठी एसआयडीकडून ही खबरदारी घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

अपहारात दोषी असणाऱ्यांकडून जामिनासाठी धावाधाव सुरू केली होती.  मात्र पोलिस कारवाई संथगतीने असल्याने आता त्यांनीही जामिनाचा पिच्छा सोडला आहे. बॅंक घोटाळ्यातील सर्वच आरोपी राजरोसपणे शहरात फिरत आहेत. त्यांच्यावर अपहाराचे गंभीर गुन्हे दाखल झाले आहे. मात्र सध्या तरी त्यांना पोलिसांचे कोणतेच भय नाही. 

महिनाभरात १७ कोटी ५० लाखांची वसुली

थकबाकीदारांकडून ऑगस्ट महिन्यात १७ कोटी ५० लाखांची वसुली अवसायकांनी केली आहे. मागील काही महिन्यात जवळपास ६८ कोटी रुपये थकबाकीदार कर्जदारांनी बॅंकेकडे जमा केले आहे. यातून पाच लाखांच्या आतील ठेवीदारांचे पैसे परत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. २७ हजार ८८८ ठेवीदारांना सात कोटी ७० लाख रुपये परत दिले जाणार आहे. त्यासाठी ईकेवायसीची प्रक्रिया अवसायकांनी सुरू केली आहे. 

आरोपींच्या सहभागाची पडताळणी

गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचा अपहारात कितपत सहभाग आहे. याची पडताळणी केली जात आहे. हे ऑडिट झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. या गुन्ह्याच्या संदर्भातील कागदपत्र जप्तीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येत आहे. 

- चिलुमुला रजनिकांत, एसआयटी प्रमुख तथा सहायक पोलिस अधीक्षक.

टॅग्स :Yavatmalयवतमाळbankबँकfraudधोकेबाजी