शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

मुदत संपल्यानंतरही २० हजार शेतकरी प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:47 IST

नाफेडने मुदत संपल्याने मंगळवारपासून जिल्ह्यातील तूर खरेदी बंद केली आहे. परिणामी नोंदणीकृत २० हजार शेतकऱ्यांपुढे आपली तूर आता कुठे विकावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तूर खरेदीला मुदतवाढ द्यावी, या मागणीसाठी जिल्हा प्रशासनाने राज्याकडे प्रस्ताव पाठविला आहे.

ठळक मुद्देतूर खरेदी : मुदतवाढीसाठी जिल्ह्याचा राज्याकडे प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नाफेडने मुदत संपल्याने मंगळवारपासून जिल्ह्यातील तूर खरेदी बंद केली आहे. परिणामी नोंदणीकृत २० हजार शेतकऱ्यांपुढे आपली तूर आता कुठे विकावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तूर खरेदीला मुदतवाढ द्यावी, या मागणीसाठी जिल्हा प्रशासनाने राज्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही तर शेतकऱ्यांना खुल्या बाजारात आपली तूर कवडीमोल भावात विकावी लागेल.खुल्या बाजारात तुरीचे दर गत काही वर्षांपासून कोसळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत होते. हा प्रकार टाळण्यासाठी शासनाने नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदीचा निर्णय घेतला. फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात १४ केंद्रावर खरेदी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आॅनलाईन नोंदणी करण्याचे आदेश पणन विभागाने दिले होते. १८ एप्रिलपर्यंत शेतकºयांना आपल्या तुरीची आॅनलाईन नोंदणी करावयाची होती. जिल्ह्यातील तब्बल ३५ हजार शेतकऱ्यांनी तुरीची आॅनलाईन नोंदणी केली. दरम्यानच्या काळात विविध कारणांमुळे नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर गोंधळ झाला. बारदाणा नाही, गोदाम उपलब्ध नाही, आदी कारणांमुळे ही खरेदी मंदावली. परिणामी मंगळवार १५ मे रोजी मुदत संपल्यानंतरही जिल्ह्यातील २० हजार शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेतच राहिले.खुल्या बाजारात तुरीचे दर घसरले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा ओढा नाफेडच्या केंद्राकडे होता. शासनाचा हमी दर ५४५० आहे. तर खुल्या बाजारात तुरीचा दर ४१०० रुपये आहे. १३५० रुपयांची तफावत असल्याने नाफेडच्या तूर केंद्रावर प्रचंड गर्दी झाली होती. ३५ हजार शेतकºयांपैकी १५ हजार शेतकऱ्यांना आपली तूर विकता आली. आता २० हजार शेतकऱ्यांकडे सुमारे एक लाख क्ंिवटल तूर आहे. ही तूर कुठे विकावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. शासकीय तूर खरेदी बंद झाल्याने या केंद्राला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तूर खरेदीला मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. तूर खरेदीला मुदतवाढ मिळाल्यास शेतकऱ्यांचा प्रश्न सुटू शकतो. परंतु मुदतवाढ मिळाली नाही तर कवडीमोल भावात तूर विकण्याशिवाय पर्याय नाही.३० कोटींचे चुकारे अडलेशेतकºयांनी नाफेडला विकलेल्या तुरीचे आतापर्यंत ७० कोटी रुपयांचे चुकारे दिले आहे. त्यानंतरही तब्बल ३० कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना मिळालेच नाही. तूर खरेदी झालेले चुकारे मिळाले नाही म्हणून आणि तूर खरेदी झाली नाही म्हणून नोंदणीकृत असे शेतकरी अडचणीत सापडले आहे. आता राज्य शासन काय निर्णय घेते यावर भविष्य अवलंबून आहे.